शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

आरएसएस दहशतवादी संघटना

By admin | Updated: October 5, 2015 01:13 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही देशातील सर्वांत मोठी दहशतवादी संघटना असून, स्वातंत्र्यलढ्याला विरोध करण्यासाठी आणि अराजक माजविण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली होती.

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही देशातील सर्वांत मोठी दहशतवादी संघटना असून, स्वातंत्र्यलढ्याला विरोध करण्यासाठी आणि अराजक माजविण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली होती. त्यामुळे आरएसएसमुक्त भारत झाल्याशिवाय ‘अच्छे दिन’ येणार नाहीत, असा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रविवारी केला. तसेच देशाला मनुवादी विचारांच्या विळख्यातून सोडविण्यासाठी दलित, आदिवासी, मुस्लिम यांनी एकत्रित येण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा, शिवसेना या राजकीय पक्षांना पर्यायी व्यवस्था म्हणून पुरोगामी विचारसरणीच्या संस्था, संघटना व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन देश बचाव आघाडी स्थापन केली असून, या आघाडीच्या वतीने शनिवारवाड्यावर जाहीर सभा घेण्यात आली़ या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत, निवृत्त पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ, आमदार जितेंद्र आव्हाड, समाजवादी नेते सुभाष वारे, प्रतिमा परदेशी, श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, मुकुंद काकडे, मौलाना अब्दुल महीद अझरी, मारुती भापकर, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. केंद्र व राज्य शासन घटनेतील मूलतत्त्वे पायदळी तुडवत आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. घटनेत बदल करता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी घटना बाजूला सारून देशात हुकूमशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू केला आहे, असे नमूद करून पी. बी. सावंत म्हणाले, की राज्यातील फडणवीस सरकार बेकायदेशीरपणे स्थापन झालेले आहे. आव्हाड यांनी मोदींच्या वागणुकीतून हिटलर दिसून येत असल्याचा आरोप केला.