शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

आर.आर. पाटील १०० मीटर तरी पळतील का - राज ठाकरे

By admin | Updated: June 15, 2014 18:15 IST

पोलिस भरतीमध्ये धावण्यासाठी तरुणांना ५ किलोमीटरचे अंतर दिले जात असले तरी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील १०० मीटर तरी पळतील का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १५-  पोलिस भरतीसाठी ग्रामीण भागातील तरुण मुंबईत येतात. एसटीने मुंबई गाठणारी ही मुलं उपाशी पोटी असतात. अशा स्थितीत या तरुणांना धावण्यासाठी ५ किलोमीटरचे अंतर ठेवले जाते. राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील १०० मीटर तरी पळू शकतील असा खोचक सवाल मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. पोलिस भरती मुंबईत घेण्याऐवजी जिल्हा जिल्ह्यात का घेतली जात नाही असा सवालही त्यांनी गृहमंत्रालयाला विचारला आहे. 
आमदार प्रवीण दरेकर यांच्या विधानसभेतील भाषणांचे 'राजगर्जना' हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. रविवारी बोरिवलीत मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. या प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरेंनी पोलिस भरतीवरुन गृहमंत्रालयावर जोरदार टीका केली. पोलिस भरतीसाठी आलेले तरुण धावल्याने मृत्यूमुखी पडतात ही दुर्दैवी घटना आहे. पोलिस भरतीतील जाचक नियम बदलण्याची गरज असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. आर. आर. पाटलांना खाकीतील पोस्टमन आणि पोलिस यातील फरकच कळत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ
विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केली होती. राज ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील याबाबत कमालीची उत्सुकता आहे. याविषयी ठाकरे म्हणाले, २८८ पैकी एकही मतदार संघ माझा नसून महाराष्ट्र राज्य हाच माझा मतदारसंघ आहे. मला फक्त आमदार होण्यात रस नसून मला महाराष्ट्राचा विकास घडवायचा आहे.  जुलै- ऑगस्टमध्ये मी राज्याची विकास योजना जनतेसमोर मांडणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 
नेत्यांनी काळानुसार बदलावे
विधानसभा ही जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याची जागा आहे. मोजक्या शब्दात प्रश्न मांडून त्यावर मोजक्या शब्दात उत्तर देऊन जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने विधानसभेत काही नेते लांबच लांब भाषण करतात. त्यामुळे वेळ खर्ची होतो अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. नेत्यांनी काळानुसार बदलणे गरजेचे असून त्यासाठी भाषा सुधरवावी असा सल्लाही त्यांनी पक्षातील आमदारांना दिला.