शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

रिपाइं ऐक्यासाठी राजीनामा द्यायला तयार

By admin | Updated: May 28, 2017 00:38 IST

रिपब्लिकन पक्षाची एकजूट ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य टिकविण्याची जबाबदारी घेतल्यास मी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा

- लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रिपब्लिकन पक्षाची एकजूट ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य टिकविण्याची जबाबदारी घेतल्यास मी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी रिपाइंचे ऐक्य करण्यापूर्वी आठवले यांनी राजीनामा द्यावा, असे सांगितले होते. त्याकडे लक्ष वेधल्यावर आठवले म्हणाले की, गेल्या ७० वर्षात जे झाले नाही, ते गेल्या तीन वर्षात करण्याचा प्रयत्न झाला. काही लोक संविधान बदलण्यात येणार असल्याचा आरोप करतात परंतु भारताचे संविधान बदलले जाणार नाही. तसेच आरक्षणही कायम राहील.सहारनपूर येथील घटना ही चुकीचीच आहे. परंतु केवळ भाजपा सत्तेवर आली म्हणून दलितांवर अत्याचार सुरू झाले असे म्हणता येणार नाही. उत्तर प्रदेशात दलितांवर अत्याचार हे यापूर्वीही होत होते. दलित अत्याचारात उत्तर प्रदेश हा नेहमीच पुढे राहिला आहे. असे असले तरी ही घटना घडायला नको होती, असेही आठवले यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी आमच्या पक्षाचीही मागणी आहे. परंतु कर्जमाफीपेक्षा कर्जातून मुक्ती आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, अशी यंत्रणा निर्माण करावी. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठून निधी उभा करता येईल, यासाठी विरोधी पक्षानेही सुद्धा बसून चर्चा करावी, केवळ विरोध करू नये, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम लोकांना आवडत आहेत. त्यांच्या नेतृत्वात देश नक्कीच प्रगती करेल असा विश्वास लोकांमध्ये असल्याने२०१९ च्या निवडणुकासुद्धा आम्हीच जिंकू.- रामदास आठवले, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री