शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

रिपाइं ऐक्यासाठी राजीनामा द्यायला तयार

By admin | Updated: May 28, 2017 00:38 IST

रिपब्लिकन पक्षाची एकजूट ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य टिकविण्याची जबाबदारी घेतल्यास मी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा

- लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रिपब्लिकन पक्षाची एकजूट ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य टिकविण्याची जबाबदारी घेतल्यास मी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी रिपाइंचे ऐक्य करण्यापूर्वी आठवले यांनी राजीनामा द्यावा, असे सांगितले होते. त्याकडे लक्ष वेधल्यावर आठवले म्हणाले की, गेल्या ७० वर्षात जे झाले नाही, ते गेल्या तीन वर्षात करण्याचा प्रयत्न झाला. काही लोक संविधान बदलण्यात येणार असल्याचा आरोप करतात परंतु भारताचे संविधान बदलले जाणार नाही. तसेच आरक्षणही कायम राहील.सहारनपूर येथील घटना ही चुकीचीच आहे. परंतु केवळ भाजपा सत्तेवर आली म्हणून दलितांवर अत्याचार सुरू झाले असे म्हणता येणार नाही. उत्तर प्रदेशात दलितांवर अत्याचार हे यापूर्वीही होत होते. दलित अत्याचारात उत्तर प्रदेश हा नेहमीच पुढे राहिला आहे. असे असले तरी ही घटना घडायला नको होती, असेही आठवले यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी आमच्या पक्षाचीही मागणी आहे. परंतु कर्जमाफीपेक्षा कर्जातून मुक्ती आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, अशी यंत्रणा निर्माण करावी. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठून निधी उभा करता येईल, यासाठी विरोधी पक्षानेही सुद्धा बसून चर्चा करावी, केवळ विरोध करू नये, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम लोकांना आवडत आहेत. त्यांच्या नेतृत्वात देश नक्कीच प्रगती करेल असा विश्वास लोकांमध्ये असल्याने२०१९ च्या निवडणुकासुद्धा आम्हीच जिंकू.- रामदास आठवले, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री