शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

आराखड्याचे साडेबारा कोटी पाण्यात

By admin | Updated: April 22, 2015 04:24 IST

शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी तयार होत असलेल्या आराखड्याची १० टक्केही अंमलबजावणी होत नसल्याचे उजेडात आल्यामुळे यंदा पहिल्यांदाच नागरिकांनाही या

शेफाली परब-पंडित, मुंबईशहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी तयार होत असलेल्या आराखड्याची १० टक्केही अंमलबजावणी होत नसल्याचे उजेडात आल्यामुळे यंदा पहिल्यांदाच नागरिकांनाही या आराखड्यात सामावून घेण्याचा निर्णय झाला़ शहराची गरज, उपलब्ध जागा आणि नागरिकांच्या मागण्यांनुसार शहरास पूरक व पोषक आराखडा तयार करण्याचा निर्धार करण्यात आला़ मात्र २००९ पासून सुरू झालेले आराखड्याचे काम लांबतच गेले. रडतखडत तयार झालेल्या या आराखड्यातील त्रुटींमळेच तो गाजला. या आराखड्यावर ३० हजाराहून अधिक हरकती दाखल झाल्या होत्या. तीन वेळा मुदतवाढ मिळत अंतिम प्रारूप तयार होईपर्यंत या आराखड्याचा खर्च साडेबारा कोटी रुपयांपर्यंत पोहोचला़१९९१ ते २०११ या विकास आराखड्याची मुदत संपत आल्यामुळे नवीन आराखड्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया २००९ मध्ये सुरू झाली़ त्यानुसार एससीई इंडिया या कंपनीला सल्लागार म्हणून नेमण्यात आले़ नियोजन खात्याचे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कंपनी आराखडा तयार करणार होती़ यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च दाखविण्यात आला़ मात्र आर्थिक समस्येमुळे आराखडा तयार करण्याची डेडलाइन वाढविण्याची विनंती सल्लागाराने २०११ मध्ये केली़ त्यानुसार सुधार समितीने मुदतवाढ देत डिसेंबर २०१३ पर्यंत आराखडा तयार करण्यास बजावले़ परंतु आराखडा तयार होण्यास विलंब होत असल्याने २०११ ते २०३१ ऐवजी २०१४ ते २०३४ या २० वर्षांचा आराखडा तयार करण्याचे निश्चित झाले़