शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

आराखड्याचे साडेबारा कोटी पाण्यात

By admin | Updated: April 22, 2015 04:24 IST

शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी तयार होत असलेल्या आराखड्याची १० टक्केही अंमलबजावणी होत नसल्याचे उजेडात आल्यामुळे यंदा पहिल्यांदाच नागरिकांनाही या

शेफाली परब-पंडित, मुंबईशहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी तयार होत असलेल्या आराखड्याची १० टक्केही अंमलबजावणी होत नसल्याचे उजेडात आल्यामुळे यंदा पहिल्यांदाच नागरिकांनाही या आराखड्यात सामावून घेण्याचा निर्णय झाला़ शहराची गरज, उपलब्ध जागा आणि नागरिकांच्या मागण्यांनुसार शहरास पूरक व पोषक आराखडा तयार करण्याचा निर्धार करण्यात आला़ मात्र २००९ पासून सुरू झालेले आराखड्याचे काम लांबतच गेले. रडतखडत तयार झालेल्या या आराखड्यातील त्रुटींमळेच तो गाजला. या आराखड्यावर ३० हजाराहून अधिक हरकती दाखल झाल्या होत्या. तीन वेळा मुदतवाढ मिळत अंतिम प्रारूप तयार होईपर्यंत या आराखड्याचा खर्च साडेबारा कोटी रुपयांपर्यंत पोहोचला़१९९१ ते २०११ या विकास आराखड्याची मुदत संपत आल्यामुळे नवीन आराखड्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया २००९ मध्ये सुरू झाली़ त्यानुसार एससीई इंडिया या कंपनीला सल्लागार म्हणून नेमण्यात आले़ नियोजन खात्याचे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कंपनी आराखडा तयार करणार होती़ यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च दाखविण्यात आला़ मात्र आर्थिक समस्येमुळे आराखडा तयार करण्याची डेडलाइन वाढविण्याची विनंती सल्लागाराने २०११ मध्ये केली़ त्यानुसार सुधार समितीने मुदतवाढ देत डिसेंबर २०१३ पर्यंत आराखडा तयार करण्यास बजावले़ परंतु आराखडा तयार होण्यास विलंब होत असल्याने २०११ ते २०३१ ऐवजी २०१४ ते २०३४ या २० वर्षांचा आराखडा तयार करण्याचे निश्चित झाले़