शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

अडत व्यापाऱ्यांची नरमाईची भुमिका!

By admin | Updated: July 17, 2016 17:34 IST

राज्य शासनाकडून जोपर्यंत बाजार समितीतील व्यापाऱ्यांबाबत निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत व्यापारी बाजार शुल्कासह सहा टक्के अडत घेतील, असा निर्णय घेत सोमवारपासून बाजार

धुळे : राज्य शासनाकडून जोपर्यंत बाजार समितीतील व्यापाऱ्यांबाबत निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत व्यापारी बाजार शुल्कासह सहा टक्के अडत घेतील, असा निर्णय घेत सोमवारपासून बाजार समितीचा कारभार सुरळीत करण्यात आला़ तत्पूर्वी बैठकीत ‘शासनाचे आदेश माना, अन्यथा प्रवेशव्दारावरूनच परत पाठवू’ असा सज्जड दम उपसभापती रितेश पाटील यांनी व्यापाऱ्यांना दिला़ बाजार समिती शेतकऱ्यांचेच हित जोपासेल, असेही ते म्हणाले़शेतकऱ्यांकडून अडत न घेता ती खरेदीदार व्यापाऱ्यांकडून घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ त्यावरून जोरदार गोंधळ सुरू असून बाजार समितीत सातत्याने वादविवाद होत आहेत़ शुक्रवार व शनिवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या वादांमुळे बाजार समितीच्या व्यवहारांवर परिणाम झाला होता़ त्यामुळे या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी रविवारी सकाळी दहा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़अडत व्यापाऱ्यांच्या वतीने महादेव परदेशी यांनी बैठकीत बाजू मांडली़ बाजार शुल्क वसुली केल्याने अडतीवरून वाद झाला होता़ त्यामुळे बाजार शुल्क आम्ही भरू न सहा टक्के अडत वसुल करू ़ मात्र हा निर्णय शासनाचे नवीन आदेश होईपर्यंतच राहील असे परदेशी यांनी स्पष्ट केले़ त्यावेळी उपसभापती व अडत व्यापाऱ्यांमध्ये किरकोळ शाब्दिक चकमक झाल्याचेही दिसून आले़ शासनाकडून ६ आॅगस्टला नवीन शासन निर्णय जाहीर केला जाणार असून तोपर्यंत ६ टक्के अडत घेण्याचे व्यापारी प्रतिनिधींनी मान्य केले़ किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनीही हा निर्णय मान्य केला़ यावेळी गंगाराम कोळेकर, अप्पा खताळ, व्यापारी प्रल्हाद कापडणेकर, विजय चिंचोलेकर, गंगाधर माळी, किरकोळ विक्रेते शिवाजी पंडीत, राहूल चौधरी, प्रशांत मराठे, जयशंकर परदेशी धर्मराज जयस्वाल, प्रशांत चोळके, सतीश मेकले, रामलाल चौधरी, भुवन जाधव, बंटी धात्रक, प्रमोद चौधरी, राजेंद्र खोडकर, नितीन वराडे हे उपस्थित होते