शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित विरार-अलिबाग कॉरिडोरची रखडपट्टी

By admin | Updated: March 6, 2017 02:59 IST

विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोरमुळे अलिबागसह रायगड जिल्हा विकासाच्या टप्प्यात येणार आहे.

नवी मुंबई : रस्तेवाहतुकीला नवा आयाम देणाऱ्या प्रस्तावित विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोरमुळे अलिबागसह रायगड जिल्हा विकासाच्या टप्प्यात येणार आहे. त्यामुळे १२६ कि.मी. लांबीच्या या मार्गालगत व परिसरात मागील काही वर्षांत हजारो कोटींची गुंतवणूक झाली आहे. मात्र, विविध कारणांमुळे या कॉरिडोरच्या कामाला खीळ बसल्याने नियोजित विकास रखडला आहे. तसेच त्यामुळे हजारो कोटींची गुंतवणूक धूळखात पडून आहे. या पार्श्वभूमीवर या बहुद्देशीय कॉरिडोरचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २0१२मध्ये विरार-अलिबाग कॉरिडोरची घोषणा केली होती. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून या मार्गिकेचा विकास करण्याची योजना आहे. २0१४ पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते; परंतु पाच वर्षे उलटली तरी त्यादृष्टीने कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. परिणामी, या क्षेत्रातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.१२६ कि.मी. लांबीच्या हा कॉरिडोर प्रस्तावित मुंबई ट्रान्स हार्बर एक्स्प्रेस वे (एमटीएचएल) व नागपूर समृद्धी एक्स्प्रेस मार्गासह जवळच्या जेएनपीटीला जोडला जाणार आहे. नवी मुंबई, कल्याण, ठाणे, डोंबिवली, मीरा-भार्इंदर, कर्जत, खोपोली, पनवेल, उरण, पेण, वसई, विरार, नालासोपारा,नवघर या शहरांसह अलिबाग, माथेरान आदी ९९६ गावांचा विचार करून एमएमआरडीएने वाहतुकीचा अहवाल तयार केला आहे. विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कोरिडोर हा याच प्रयोजनाचा भाग आहे. त्यामुळे अलिबाग आणि विरार या दरम्यानचा प्रवास काही तासांनी कमी होणार आहे. विकासाला गती मिळणार आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. या कॉरिडोरमुळे विरार, भिंवडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरण आणि अलिबाग ही विकास केंद्रे तयार होणार आहेत. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी, रेवस पोर्ट, सिडकोचा नैना प्रकल्प आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी हा मार्ग नवसंजीवनी देणारा ठरणारा आहे. विरार-अलिबाग कॉरिडोरमुळे दळणवळणाचे अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. राज्य सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे मत इन्फ्राटेक या कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक के. डी. राठोड यांनी व्यक्त केले आहे.विरार-अलिबाग कॉरिडोरमुळे दळणवळणाचे अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या परिसरात परवडणाऱ्या घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे मत इन्फ्राटेक या कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक के. डी. राठोड यांनी व्यक्त केले आहे.विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कोरिडोर हा याच प्रयोजनाचा भाग आहे. त्यामुळे अलिबाग आणि विरार या दरम्यानचा प्रवास काही तासांनी कमी होणार आहे. विकासाला गती मिळणार आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. या कॉरिडोरमुळे विरार, भिंवडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरण आणि अलिबाग ही विकास केंद्रे तयार होणार आहेत.