शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित विरार-अलिबाग कॉरिडोरची रखडपट्टी

By admin | Updated: March 6, 2017 02:59 IST

विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोरमुळे अलिबागसह रायगड जिल्हा विकासाच्या टप्प्यात येणार आहे.

नवी मुंबई : रस्तेवाहतुकीला नवा आयाम देणाऱ्या प्रस्तावित विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोरमुळे अलिबागसह रायगड जिल्हा विकासाच्या टप्प्यात येणार आहे. त्यामुळे १२६ कि.मी. लांबीच्या या मार्गालगत व परिसरात मागील काही वर्षांत हजारो कोटींची गुंतवणूक झाली आहे. मात्र, विविध कारणांमुळे या कॉरिडोरच्या कामाला खीळ बसल्याने नियोजित विकास रखडला आहे. तसेच त्यामुळे हजारो कोटींची गुंतवणूक धूळखात पडून आहे. या पार्श्वभूमीवर या बहुद्देशीय कॉरिडोरचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २0१२मध्ये विरार-अलिबाग कॉरिडोरची घोषणा केली होती. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून या मार्गिकेचा विकास करण्याची योजना आहे. २0१४ पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते; परंतु पाच वर्षे उलटली तरी त्यादृष्टीने कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. परिणामी, या क्षेत्रातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.१२६ कि.मी. लांबीच्या हा कॉरिडोर प्रस्तावित मुंबई ट्रान्स हार्बर एक्स्प्रेस वे (एमटीएचएल) व नागपूर समृद्धी एक्स्प्रेस मार्गासह जवळच्या जेएनपीटीला जोडला जाणार आहे. नवी मुंबई, कल्याण, ठाणे, डोंबिवली, मीरा-भार्इंदर, कर्जत, खोपोली, पनवेल, उरण, पेण, वसई, विरार, नालासोपारा,नवघर या शहरांसह अलिबाग, माथेरान आदी ९९६ गावांचा विचार करून एमएमआरडीएने वाहतुकीचा अहवाल तयार केला आहे. विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कोरिडोर हा याच प्रयोजनाचा भाग आहे. त्यामुळे अलिबाग आणि विरार या दरम्यानचा प्रवास काही तासांनी कमी होणार आहे. विकासाला गती मिळणार आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. या कॉरिडोरमुळे विरार, भिंवडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरण आणि अलिबाग ही विकास केंद्रे तयार होणार आहेत. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी, रेवस पोर्ट, सिडकोचा नैना प्रकल्प आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी हा मार्ग नवसंजीवनी देणारा ठरणारा आहे. विरार-अलिबाग कॉरिडोरमुळे दळणवळणाचे अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. राज्य सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे मत इन्फ्राटेक या कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक के. डी. राठोड यांनी व्यक्त केले आहे.विरार-अलिबाग कॉरिडोरमुळे दळणवळणाचे अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या परिसरात परवडणाऱ्या घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे मत इन्फ्राटेक या कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक के. डी. राठोड यांनी व्यक्त केले आहे.विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कोरिडोर हा याच प्रयोजनाचा भाग आहे. त्यामुळे अलिबाग आणि विरार या दरम्यानचा प्रवास काही तासांनी कमी होणार आहे. विकासाला गती मिळणार आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. या कॉरिडोरमुळे विरार, भिंवडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरण आणि अलिबाग ही विकास केंद्रे तयार होणार आहेत.