शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआरबी’चे रस्ते २३९ कोटींचेच

By admin | Updated: July 24, 2015 00:53 IST

मूल्यांकनाचा अहवाल सादर : निकृष्ट कामांचे ६० कोटी वगळा - राजेंद्र सावंत

कोल्हापूर : आयआरबी कंपनीने कोल्हापूर शहरात केलेल्या रस्ते प्रकल्पामध्ये एकूण २३९ कोटी ६२ लाख रुपये रस्त्यांच्या कामावर खर्च केल्याचा दावा नोबेल कंपनीने अहवालात केला आहे. रस्ते विकास महामंडळाने नियुक्त केलेल्या नोबेल कंपनीने तयार केलेल्या रस्त्यांच्या मूल्यांकनाचा अहवाल तसेच कोल्हापूर महापालिका आणि असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट इंजिनिअर्स यांनी केलेला निकृष्ट कामाचा अहवाल गुरुवारी मुंबईत फेरमूल्यांकन समितीकडे सादर झाला. त्यातून ही माहिती स्पष्ट झाली.आयआरबी कंपनीने केलेल्या खराब कामांचे ६० कोटी रुपये या मूल्यांकनातून वगळावेत, अशी मागणी आर्किटेक्ट असोसिएशनचे व समितीचे सदस्य राजेंद्र सावंत यांनी केली आहे. मुंबईतील राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात सहव्यवस्थापक रामचंदानी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीस आमदार चंद्रदीप नरके, मुख्य अभियंता बी. एन. ओहोळ, कार्यकारी अभियंता सुपेकर, आवटी, नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत, आर्किटेक्ट असोसिएशनचे राजेंद्र सावंत उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीला नोबेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील रस्ते, त्याचा कामाचा दर्जा आणि एकू ण खर्चाचे आकडे याचे सादरीकरण केले. ‘आयआरबी’ने शहरातील केलेल्या रस्त्यांवर २३९ कोटी ६२ लाख रुपये खर्च केले आहेत. त्यापैकी १८२ कोटी ८८ लाख रुपये प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामावर, तर ५६ कोटी ६४ लाख हे इतर कामांवर खर्च झाले आहेत, असे ‘नोबेल’तर्फे सांगण्यात आले. महानगरपालिका व आर्किटेक्ट असोसिएशन यांनी ‘आयआरबी’ने केलेल्या चुकीच्या कामांचा अहवाल सादर केला. कराराप्रमाणे न झालेल्या कामांचे मूल्य ५८ कोटी ७३ लाख इतके आहे. अर्धवट राहिलेल्या कामांची किंमत २१ कोटी ३४ लाख इतकी आहे. १५६ कोटी इतक्या खर्चाच्या सेवावाहिन्या स्थलांतर करण्यात आलेल्या नाहीत तसेच प्रत्यक्ष जागेवर निकृष्ट झालेल्या कामांचे मूल्य ६० कोटी इतके असल्याचा दावा चुकीच्या कामांच्या अहवालात करण्यात आला आहे. निकृष्ट झालेल्या कामांचे ६० कोटी रुपये ‘नोबेल’ने केलेल्या मूल्यांकनातून वगळण्यात यावेत, अशी मागणी आर्किटेक्ट असोसिएशनचे सावंत यांनी यावेळी केली. कारण ही निकृष्ट कामे वापरात असूनही उपयोगाची नाहीत हे सावंत यांनी पटवून दिले. इतर खर्चात ‘आयआरबी’ने महानगरपालिकेला दिलेले निगेटिव्ह ग्रॅँटचे २७ कोटी मूल्यांकनात धरण्यात येऊ नयेत, कारण ही ग्रँट मूल्यांकनाचा भाग बनू शकत नाही, असेही सावंत यांनी सुचविले. कामगार विम्याची रक्कम पूर्ण तपासणी झाल्यावरच धरली जावी, असेही त्यांनी सुचविले. महानगरपालिका व आर्किटेक्ट असोसिएशनने तांत्रिक माहिती तसेच प्रत्यक्ष झालेल्या निकृष्ट कामांची छायाचित्रे अहवालासोबत सादर केली आहेत. आमदार चंद्रदीप नरके यांनी मनपा व आर्किटेक्ट असोसिएशनचे अहवालाचा बैठकीच्या इतिवृत्तात समावेश करून मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मूल्यांकन समितीकडे सादर करावा, अशी सूचना केली. राज्य रस्ते विकास मंडळातर्फे हे दोन्ही अहवाल सूचना व दुरुस्तीसह ३१ जुलैपर्यंत राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एकनाथ शिंदे समितीकडे पाठविण्यात येतील, असे रामचंदानी यांनी सांगितले. त्यामुळे आता मूल्यांकनाबाबतचा विषय व कोल्हापूरच्या टोलचे पुढे काय करायचे याचा निर्णय या समितीसह राज्य सरकारच्या कोर्टात पोहोचला आहे. (प्रतिनिधी)कृती समिती समाधानी नोबेल कंपनीने केलेला मूल्यांकनाचा अहवाल तसेच मनपा व आर्किटेक्ट असोसिएशनने दिलेला चुकीच्या कामांचा अहवाल यावर कृती समितीने समाधान व्यक्त केले आहे. राज्य रस्ते विकास मंडळाने हे अहवाल उपसमितीकडे सादर करून सरकारने लवकर टोलमुक्तीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी केले. पुढे काय...?गुरुवारी जो अहवाल सादर झाला त्यामध्ये किरकोळ काही त्रुटी आहेत. त्या दुरुस्त करण्यात येणार आहेत. महापालिकेने केलेला अहवालही मूल्यांकनाच्या अहवालामध्ये समाविष्ट करून तो एकत्रित अहवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा सहभाग असलेल्या समितीपुढे सादर होईल. त्यांनी या मूल्यांकनास मंजुरी दिल्यानंतर आयआरबीला हे पैसे कसे द्यायचे यासंबंधीचे पर्याय शासन निश्चित करेल. या मूल्यांकनास आयआरबी मान्यता देणार की न्यायालयात पुन्हा आव्हान देणार यावरही बऱ्याच गोष्टी अवंलबून असतील. टोलचा तिढा नक्का सुटणार कधी हे त्यावरच ठरणार आहे.