शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

दारूविक्री सुरू ठेवण्यासाठी रस्त्यांची बदलतेय मालकी !

By admin | Updated: April 1, 2017 04:37 IST

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दोन्ही बाजूंना असलेल्या दारूच्या दुकानांबरोबरच बार, रेस्टॉरन्ट, पब बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देण्याआधीच

यदु जोशी / मुंबईराष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दोन्ही बाजूंना असलेल्या दारूच्या दुकानांबरोबरच बार, रेस्टॉरन्ट, पब बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देण्याआधीच त्यांच्या बचावासाठी सरकारी पातळीवर धडपड सुरू झाली असून, हे दोन्ही महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करण्याची धावपळ सुरू झाली आहे. त्यासाठी मुख्यत्वे आधार घेतला जातोय तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २००१ मधील एका परिपत्रकाचा. ‘ज्या शहरांमध्ये वळण रस्त्यांची बांधकामे झालेली असतील तेथे शहराच्या हद्दीत असलेले दोन्ही महामार्ग अवर्गीकृत (डिनोटीफाइड) करून स्थानिक महापालिका वा नगरपालिकांकडे हस्तांतरित करता येतील, असे या परिपत्रकात म्हटले होते. महामार्गांवरील दारूविक्रीवर बंदी आणणारा पहिला निकाल सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर २०१६ रोजी दिला होता. त्यामुळे महामार्गांलगत असलेल्या रेस्टॉरण्ट्स व बार, पब तसेच दारू दुकानमालकांमध्ये खळबळ माजली होती. त्यानंतर लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे २००१ चे परिपत्रक बाहेर काढण्यात आले. बांधकाम विभागाच्या विविध कार्यालयांना ते तत्परतेने पाठविण्यात आले आणि त्या नुसार काही शहरांमध्ये (सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जालना, जळगाव, यवतमाळ) महामार्गांचा शहरातील हिस्सा हा स्थानिक पालिकांना हस्तांतरितही करण्यात आला. आता नांदेडसह काही अन्य महापालिकांमध्येही अशी प्रक्रिया सुरू आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र सांगितले की दारू दुकानांच्या बचावासाठी हे परिपत्रक नव्याने काढण्यात आलेले नाही. ते पूर्वीपासूनचेच आहे. तथापि, दारूबंदीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या मते एखादे परिपत्रक १६ वर्षांनंतर पुनरुज्जीवित होण्यामागील कारण हे महामार्गांवर आडवी झालेली बाटली उभी करण्यासाठीच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबरच्या निकालानंतर अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी केरळ सरकारला दिलेल्या कायदेशीर सल्ल्याचा आधार घेत महाराष्ट्र सरकारनेही हायवेजवळील बार, दारूविक्री करणारी रेस्टॉरण्ट्स व पब यांच्या परवान्यांचे नुतनीकरण सुरू केले होते. तसे आदेश काढण्यात आले होते आणि उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ती माहिती देताना बंदी केवळ दारू दुकानांपुरतीच मर्यादित असल्याचा दावा केला होता. तसेच परवाने दिल्यामुळे राज्य सरकारचा दारूतून मिळणारा ९ हजार कोटींचा महसूल बुडणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. पण आता बार, पब, दारूविक्री करणारी रेस्टॉरण्ट्स या सर्र्वावरच बंदी आली आहे.तर १५००० बार, दुकाने बंद राज्यातील १५ हजार ५०० दारु दुकाने/बार बंद पडण्याची शक्यता आहे. राज्यात सुमारे १४ हजार बीअरबार, ४,५०० देशी दारू दुकाने, १८०० विदेशी दारू विक्रीची दुकाने आणि ४,२०० बीअर शॉपी आहेत. त्यातील १५ हजार ५०० महामार्गांपासून ५०० मीटरच्या आत आहेत.महाराष्ट्रात 2015-16 मध्ये उत्पादन शुल्काची वसुली 12500कोटी रुपये इतकी झालेली होती.२०१६-१७ मध्ये ही वसुली जवळपास 1500 कोटी रुपयांनी घटून ११ हजार कोटींपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.१५०० कोटी रुपयांचा फटकानोटाबंदी व मुख्यत्वे गेल्या डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे हा फटका बसला. कारण, महामार्गांलगत असलेल्या बारनी पुढच्या वर्षीसाठीचे परवाना नूतनीकरणाचे शुल्कच भरले नाही. त्यामुळे अंदाज एक हजार कोटींचा फटका बसला.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे घाऊक विक्रेत्यांनी किरकोळ विक्रेत्यांना दारू विकणेच एकतर बंद केले वा कमी केले. कारण, दुकानेच बंद होणार असतील तर वसुली कशी होणार हा प्रश्न त्यांच्यासमोर होता.62% दुकाने बंदच पडणारसर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे२०१७ - २०१८ या आर्थिक वर्षात जवळपास ६२ टक्के दुकाने बंदच पडणार असल्याने उत्पादन शुल्काची वसुली ही साडेसहा ते ७ हजार कोटी रुपयांनी कमी होईल, असा अंदाज उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.