शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

पारदर्शकतेसाठी रस्त्यावर

By admin | Updated: March 6, 2017 04:01 IST

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सुचविलेल्या कामांवरच नगरसेवकांनी आपला निधी खर्च करावा, असा निर्णय घेतला

डोंबिवली : भाजपाने मुंबई महापालिकेत पारदर्शक कारभाराचा मुद्दा लावून धरला असतानाच ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सुचविलेल्या कामांवरच नगरसेवकांनी आपला निधी खर्च करावा, असा निर्णय घेतला आहे. याच पारदर्शकतेचे अनुकरण कल्याण-डोंबिवली महापालिकेतही करावे, यासाठी भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी-लेनीनवादी) पक्षाने रविवारी डोंबिवलीतील दत्तनगर चौकात स्वाक्षरी मोहीम राबवली. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर राबविलेल्या या उपक्रमाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाणे महापालिकेतील नगरसेवकांना यापुढे आपला नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा आणि मागासवर्गीय निधी नागरिकांनी सुचविलेल्या कामांवरच खर्च करावा लागेल असा निर्णय आयुक्त जयस्वाल यांनी नुकताच घेतला. यामुळे नगरसेवक निधीच्या नावाने होणाऱ्या कोटयवधीच्या भ्रष्टाचाराला चाप बसणार आहे. असा निर्णय केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनीही घ्यावा अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालायचा असेल तर ठाणे महापालिका आयुक्तांप्रमाणे रवींद्रन यांनीही कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे पक्षाचे पदाधिकारी महेश साळुंखे आणि सुनील नायक यांनी सांगितले. महापालिकेच्या अर्थसंकल्पात नगरसेवक निधीसाठी कोटयवधी रूपये ठेवले जातात. यंदा १४ कोटी ३५ लाखांची तरतूद केली आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या कराच्या रूपात हा निधी दिला जातो. गटार, पायवाटा बांधण्यावर हा खर्च केला जातो. परंतु त्याला लागणारा विलंब आणि कामांचा दर्जा पाहता यात भ्रष्टाचार होत असल्याकडे नायक यांनी लक्ष वेधले. कंत्राटदाराला पैसे कामांचा दर्जा तपासून नागरिकांच्या संमती शिवाय देऊ नयेत, अशीही मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)>निर्णय घेईपर्यंत राबवणार मोहीमस्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अशी माहिती साळुंखे यांनी दिली. सोमवारी स्वाक्षरीचे निवेदन आयुक्त रवींद्रन यांना सादर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढच्या रविवारी डोंबिवली पश्चिमेत ही मोहीम राबविली जाणार आहे. जोपर्यंत आयुक्त निर्णय घेत नाही तोपर्यंत डोंबिवली शहरात हा उपक्रम सुरूच राहणार असल्याचे साळुंखे म्हणाले.‘लोकमत’च्या वृत्ताचे कात्रणदरम्यान, दत्तनगर चौकात राबविलेल्या मोहिमेच्या ठिकाणी ‘लोकमत’मध्ये आलेल्या वृत्ताचे कात्रण लावले होते. तेथील सूचना फलकावरील ‘नगरसेवकांचा निधी ठाणेकरांच्या हाती’ हे वृत्त लक्षवेधी ठरले.