शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

महापालिकेचा रणसंग्राम, कोल्हापूर जोमात, कल्याण डोंबिवलीत वाढता प्रतिसाद

By admin | Updated: November 1, 2015 13:29 IST

सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेतील वाकयुद्धामुळे रंगलेल्या कल्याण डोंबिवली व कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

डोंबिवली/कोल्हापूर, दि. १ -  सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेतील वाकयुद्धामुळे रंगलेल्या कल्याण डोंबिवली व कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. कल्याण डोंबिवलीत ११.३० पर्यंत १८ टक्के तर कोल्हापूरमध्ये १२ पर्यंत ३० टक्के मतदान झाले आहे. 

महापालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेले वाकयुद्ध गाजले. वाघाचा पंजा, वाघाच्या तोंडातील दात, सरकार तडीपार करण्याचे इशारे अशा अनेक विधानांमुळे वातावरण चांगलेच तापले होते. राज ठाकरे यांनी नाशिकमधील विकास कामांचा हवाला देत मतदारांना साकडे घातले. कोल्हापूरमधील ८१ तर कल्याण डोंबिवलीतील १२२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. रविवारी सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात कल्याण - डोंबिवली आणि कोल्हापूरमध्ये मतदानाला सुरुवात झाली. कोल्हापूरमधील सदर बाजारमध्ये ताराराणीचे उमेदवार आणि अधिका-यांमध्ये वाद झाला होता. उमेदवाराचे प्रतिनिधी येण्यापूर्वीच मतदान यंत्र सुरु केल्याने ताराराणीचे कार्यकर्ते संतापले होते. तर डोंबिवलीतही भाजपा आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचे वृत्त आहे. 

कल्याण डोंबिवलीतील २७ गावांमध्येही मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भालेगावमधील ग्रामस्थांनी मात्र बहिष्काराचा पवित्रा कायम ठेवला आहे. मतदार याद्यांमधील घोळामुळे नाव शोधताना मतदारांची तारांबळ झाली आहे. कोल्हापूरमध्ये भाजपा - ताराराणीची युती असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. तर कल्याण डोंबिवलीत भाजपा - आरपीआयची युती असून शिवसेना व मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व व काँग्रेसची आघाडीही निवडणुकीत कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.