शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

राजकारणापायी दंगली घडवल्या जातात - शिवसेना

By admin | Updated: October 11, 2015 11:55 IST

निवडणूक जिंकायची असेल हिंदू - मुस्लिम दंगली घडवायच्या आणि त्या आगीवर राजकीय भाकरी भाजायची हे गणितच बनले आहे असे परखड मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडले आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ -  देशात राजकीय कारणासाठी धार्मिक तेढ निर्माण केली जात असून निवडणूक जिंकायची असेल हिंदू - मुस्लिम दंगली घडवायच्या आणि त्या आगीवर राजकीय भाकरी भाजायची हे गणितच बनले आहे असे परखड मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडले आहे. दादरीसारख्या घटनांमध्ये कठोर कारवाई करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिली असली तरी मुळात धार्मिक तेढ कोण वाढवतंय असा सवालही त्यांनी भाजपाला उद्देशून विचारला आहे. 

रविवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संजय राऊत यांनी गोमांस वादावर 'रोखठोक' मतं मांडली आहे. १९९१ मध्ये भाजपाच्या अयोध्या आंदोलनानंतर देश मनाने दुभंगला आणि अजूनही ही दरी रुंदावतच आहे. नोएडीतील दादरी येथे गोमांसच्या वादावरुन एका मुस्लिम तरुणाची झालेली हत्या हे त्याचे उदाहरण आहे. गोमांसाच्या तुकड्यावर देशातील धार्मिक तेढ शिगेला पोहोचली आहे असे राऊत यांनी म्हटले आहे. देशाला नव्या आगीत ढकलणारे हे चित्र असून दादरीतील गोमांस हत्येचा वापर बिहारच्या  निवडणुकीत कसा करता येईल यासाठी सेक्यूलरवाद्यांकडून राजकीय डावपेच आखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मुंबईत जैन धर्मीयांच्या पर्युषणादरम्यान मांसविक्रीवर बंदी टाकण्याची मागणी करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही मागणी केली गेली असे सांगत राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर आझम खान यांनी दादरीप्रकरणानंतर संयुक्त राष्ट्राला केलेली तक्रार हादेखील धार्मिक तेढ वाढवण्याचा भाग आहे अशी टीकाही त्यांनी केली. शेतकरी आत्महत्या करतोय, भ्रष्टाचार, महागाईमुळे माणूसच माणसाला खातोय. यावरुन कोणाचे धर्म खवळत नाही पण गोमांसच्या अफवेवरुन देश दुभंगतो अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.