शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

...हा तर पोरकटपणा

By admin | Updated: December 6, 2015 02:55 IST

नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्यावर मागील तीन महिन्यांच्या कालावधीत ८ प्रकारच्या कारवाया करण्यात

मुंबई : नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्यावर मागील तीन महिन्यांच्या कालावधीत ८ प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी म्हणजे तद्दन पोरकटपणा असल्याचा टोला भाजपा प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी लगावला आहे. मुनगंटीवार यांचे नातलग असल्यामुळेच लैंगिक छळाचे आरोप होऊनही डॉ. व्यवहारे यांना संरक्षण दिले जात आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी मुनगंटीवार व तावडे यांच्यावर ताशेरे ओढल्याने दोघांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी केली होती. डॉ. व्यवहारे यांच्यावर ८ प्रकारच्या कारवाया गेल्या आहेत. भाजपा सरकार कोणालाही कोणत्याही कारणाने संरक्षण देणार नाही हेच या कारवाईतून सिद्ध झाल्याचा दावा भांडारी यांनी केला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर काँग्रेस कार्यकर्त्याने याचिका दाखल केली. या याचिकेमध्ये ज्या दोन मंत्र्यांना प्रतिवादी केले आहे त्यांना त्याविषयीच्या नोटिसाही मिळालेल्या नाहीत. संबंधित प्रतिवादींना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळालेली नाही. याची नोंद न्यायमूर्तींनीदेखील घेतलेली आहे व अंतरिम आदेशातही तसे स्पष्ट केले आहे. ज्या याचिकेच्या सुनावणीची रीतसर प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही, ज्या याचिकेची पूर्ण छाननी अद्याप न्यायालयाने केलेली नाही तिचा निकाल काँग्रेसचे नेते व प्रवक्ते जाहीर करत आहेत ! काँग्रेसची ही कृती म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भांडारी यांनी केला.

हास्यास्पद दावा - सावंतउच्च न्यायालयाने प्राथमिक स्वरूपात मुनगंटीवार व तावडे यांना दोषी ठरवून नोटीस बजावल्या आहेत. नोटीस न मिळाल्याचे भाजपाचे म्हणणे हास्यास्पद असून, त्या कोणत्याही क्षणी त्यांना प्राप्त होऊ शकतात. विभागाने मध्यावधी बदलीचे अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना असताना डीनची बेकायदेशीरपणे केलेली बदली न्यायालयाने रद्द करणे, ही शासनाला चपराकच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. स्वत:कडे पाहाभाजपा मंत्र्यांचे राजीनामे मागणाऱ्या काँग्रेसने गेल्या १५ वर्षांतील स्वत:चा व्यवहार तपासून पाहावा. दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख ते गुलाबराव देवकर यांच्यापर्यंत अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप न्यायालयाने ठेवले. गुलाबराव देवकर यांना तर अटकही झाली. तरीसुद्धा त्यांचे राजीनामे काँग्रेसने मागितले नाहीत. आता काँग्रेसने अशा रीतीने सुनावणी झाली नसलेल्या याचिकेच्या आधारे मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी करणे हास्यास्पद आहे.