शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
5
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
8
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
9
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
10
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
11
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
12
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
13
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
14
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
15
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
16
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
17
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
18
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
19
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..
20
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर

पोलिसांना छापा टाकण्याचा अधिकार

By admin | Updated: June 8, 2016 03:37 IST

जेथे बेकायदा काम सुरू असेल तेथे पोलिसांना छापा टाकण्याचा अधिकार आहे.

मुंबई : जेथे बेकायदा काम सुरू असेल तेथे पोलिसांना छापा टाकण्याचा अधिकार आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी नागरिकांच्या खासगी आयुष्यात लक्ष घालण्यात येऊ नये, असे निरीक्षण मंगळवारी उच्च न्यायालयाने नोंदवले.गेल्या वर्षी पोलिसांनी मालवणीमधील हॉटेल्सवर छापा मारून अनेक प्रेमी युगुलांना ताब्यात घेत दंड ठोठावला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी बेकायदेशीरपणे व मनमानी कारभार करत छापा घातला. तसेच राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत नागरिकांना बहाल करण्यात आलेल्या खासगीपणा जपण्याच्या अधिकारावर घाला घालण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित पोलिसांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका खार येथील रहिवासी सुमीर सबरवाल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाकडे होती. मंगळवारच्या सुनावणीत मुख्य सरकारी वकील संदीप शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांनी छापा घालण्यासंदर्भात मागदर्शक तत्त्वे आखल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘नागरिकांच्या ‘खासगीपणा’ जपण्याच्या अधिकारावर गदा येणार नाही, अशी सक्त ताकीदच मागदर्शक तत्त्वाद्वारे देण्यात आली आहे,’ असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.‘हॉटेल किंवा लॉजमध्ये ग्राहक म्हणून आलेल्या महिलांची चौकशी करण्यासाठी महिला अधिकारीच असतील किंवा महिला अधिकाऱ्याच्या उपस्थित पुरुष अधिकाऱ्याने महिलेची चौकशी करावी. एखाद्या ग्राहकाने हॉटेलमध्ये खोटी ओळख कागदपत्रे सादर केली असतील किंवा एखाद्या ग्राहकावर पोलिसांना संशय असेल तर पोलिसांनी हॉटेलधील एका कर्मचाऱ्याला बरोबर घेऊन संबंधित रूमवर जावे. तसेच छापा मारताना पोलिसांनी बिल्ला जवळ बाळगावा. तसेच एखाद्याने पोलिसांकडे ओळखपत्र मागितले तर ते त्याला दाखवावे,’ असे मगादर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.मात्र ही मागदर्शक तत्त्वेही नागरिकांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण करणारी आहेत, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. सुनावणी २९ जूनपर्यंत तहकूब करत कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना मागदर्शक तत्त्वांबाबत सूचना करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) >खासगी आयुष्यावर घाला घालू नये‘जर एखाद्या हॉटेलमध्ये काही बेकायदेशीर कृत्य करण्यात येत असेल किंवा अश्लील बाबी होत असतील आणि याची माहिती पोलिसांनी मिळाली, तर त्यांना त्या ठिकाणी नक्की काय घडत आहे, हे पाहण्यासाठी छापा घालणे आवश्यक आहे. पोलिसांना छापा घालण्याचा अधिकार आहे. मात्र छापा घालताना त्यांनी नागरिकांच्या खासगी आयुष्यावर घाला घातला जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.