शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

वकील ठरविण्याचा अधिकार पोलिसांना!

By admin | Updated: August 15, 2015 01:10 IST

संवेदनशील व महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायालयात दोषारोप सिद्ध होण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस आयुक्त व अधीक्षकांना विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याचा

- हिनाकौसर खान-पिंजार,  पुणेसंवेदनशील व महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायालयात दोषारोप सिद्ध होण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस आयुक्त व अधीक्षकांना विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याचा अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे महत्त्वाचे खटले रेंगाळणार नाहीत आणि निपटाराही तातडीने होईल.अनेकदा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने संवेदनशील व महत्त्वाचे खटले असतात. मात्र, सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी त्या खटल्यायोग्य विशेष सरकारी वकिलाची आवश्यकता असते. विशेष सरकारी वकील नेमण्यासाठी शासनाची परवानगी लागते. मात्र या प्रक्रियेत बराच अवधी उलटतो. यामुळे शासनाने हे अधिकार क्षेत्रीय पातळीवर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांनी त्याच्या कार्यक्षेत्रासाठी वकिलांचे पॅनल तयार करावे, असे आदेश आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम २४(८) प्रमाणे संवेदनशील व महत्त्वाचे खटल्यांसाठी या पॅनलमधून विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करता येईल.सरसकट कोणत्याही खटल्यासाठी विशेष सरकारी वकील नेमला जाऊ नये, याचीही दक्षता या अध्यादेशात घेण्यात आली आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने संवेदनशील व महत्त्वाचा खटला आहे, याची खातरजमा केल्यानंतरच संबंधित प्राधिकाऱ्याने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावयाची आहे. तसेच, या प्राधिकाऱ्याने दोषारोप सिद्ध होतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावयाचे आहेत, असेही निर्देश आहेत.