शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

समृद्ध महाराष्ट्र कुपोषित - हायकोर्ट

By admin | Updated: February 16, 2017 04:51 IST

कुपोषणाने दरवर्षी १८ हजार बालमृत्यू होत आहेत. त्यामुळे समृद्ध महाराष्ट्राची स्वयंघोषित संकल्पना निराधार आहे, असे खडेबोल

मुंबई : कुपोषणाने दरवर्षी १८ हजार बालमृत्यू होत आहेत. त्यामुळे समृद्ध महाराष्ट्राची स्वयंघोषित संकल्पना निराधार आहे, असे खडेबोल उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला सुनावले. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाने हे खडेबोल सुनावले. देशाच्या एकूण लोकसंख्येत ४३ दशलक्ष बालक आहेत. यातील ५० टक्के आर्थिक दुर्बल आहेत. अशा परिस्थितीत बालकांचा कुपोषणाने मृत्यू होत असल्यास ते दुर्दैवी आहे. ही गंभीर समस्या आहे. त्यावर तोडगा काढणे आवश्यकच आहे. तेव्हा राज्य शासनाने आगामी अर्थसंकल्पात कुपोषण निवारण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करावा. हा निधी कसा वापरला जाणार याचा आराखडा तयार करावा. आरखड्यात बाल मृत्यू रोखण्यासाठी विशेष योजना तयार कराव्यात. हा आराखडा पुढील सुनावणीत न्यायालयात सादर करावा, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. आराखडा तयार करण्यासाठी पुन्हा न्यायालयाच्या आदेशाची वाट बघू नका. स्वत:हून तयार करा, असेही खंडपीठाने शासनाला बजावले. कुपोषणाचे वाढते बळी रोखण्यासाठी. यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी न्यायालयात डझनभर याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांची दखल घेत न्यायलायाने कुपोषण निवारण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षततेखाली स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)