शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

पवई तलाव होणार पुनरुज्जीवित

By admin | Updated: October 20, 2016 06:02 IST

मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी यांना दिले, तर महापालिकेने तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उपाययोजना आखल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.

मुंबई : पवई तलावाचे हरवलेले सौदर्य परत मिळवून देण्याकरिता प्रभावी उपाययोजना आखा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी यांना दिले, तर महापालिकेने तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उपाययोजना आखल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी येत्या सहा महिन्यांत अल्पकालीन उपाययोजनांची मालिका सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेने न्या. व्ही. एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले. ८ सप्टेंबर रोजी महापालिकेचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पवई तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी थांबवण्यासाठी व तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी एखाद्या सल्लागाराची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या वकिलांनी खंडपीठाला दिली.पवई तलावात विनाप्रक्रिया सांडपाणी सोडण्यात येते, त्याशिवाय कचराही टाकण्यात येतो. विकासक टेकडीवर अतिक्रमण करून इमारती उभारत आहेत, तरीही महापालिका संबंधितांवर काहीही कारवाई करत नाही. राज्य सरकार व महापालिकेला संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर जोशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काय पावले उचलणार, अशी विचारणा गेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने जिल्हाधिकारी व महापालिकेकडे केली होती.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जिल्हाधिकारी आणि महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर केले. एप्रिल २०१७ ते फेबु्रवारी २०१९ पर्यंत तलाव स्वच्छ करण्यासाठी पावले उचलण्यात येतील. याच कालावधीत पाण्याचा दर्जाही सुधारण्यात येईल. नागरिकांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जाईल आणि नागरिकांमध्ये जागरूकताही निर्माण करण्यात येईल, असे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)