शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पवई तलाव होणार पुनरुज्जीवित

By admin | Updated: October 20, 2016 06:02 IST

मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी यांना दिले, तर महापालिकेने तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उपाययोजना आखल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.

मुंबई : पवई तलावाचे हरवलेले सौदर्य परत मिळवून देण्याकरिता प्रभावी उपाययोजना आखा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी यांना दिले, तर महापालिकेने तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उपाययोजना आखल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी येत्या सहा महिन्यांत अल्पकालीन उपाययोजनांची मालिका सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेने न्या. व्ही. एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले. ८ सप्टेंबर रोजी महापालिकेचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पवई तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी थांबवण्यासाठी व तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी एखाद्या सल्लागाराची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या वकिलांनी खंडपीठाला दिली.पवई तलावात विनाप्रक्रिया सांडपाणी सोडण्यात येते, त्याशिवाय कचराही टाकण्यात येतो. विकासक टेकडीवर अतिक्रमण करून इमारती उभारत आहेत, तरीही महापालिका संबंधितांवर काहीही कारवाई करत नाही. राज्य सरकार व महापालिकेला संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर जोशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काय पावले उचलणार, अशी विचारणा गेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने जिल्हाधिकारी व महापालिकेकडे केली होती.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जिल्हाधिकारी आणि महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर केले. एप्रिल २०१७ ते फेबु्रवारी २०१९ पर्यंत तलाव स्वच्छ करण्यासाठी पावले उचलण्यात येतील. याच कालावधीत पाण्याचा दर्जाही सुधारण्यात येईल. नागरिकांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जाईल आणि नागरिकांमध्ये जागरूकताही निर्माण करण्यात येईल, असे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)