शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पवई तलाव होणार पुनरुज्जीवित

By admin | Updated: October 20, 2016 06:02 IST

मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी यांना दिले, तर महापालिकेने तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उपाययोजना आखल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.

मुंबई : पवई तलावाचे हरवलेले सौदर्य परत मिळवून देण्याकरिता प्रभावी उपाययोजना आखा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी यांना दिले, तर महापालिकेने तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उपाययोजना आखल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी येत्या सहा महिन्यांत अल्पकालीन उपाययोजनांची मालिका सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेने न्या. व्ही. एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले. ८ सप्टेंबर रोजी महापालिकेचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पवई तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी थांबवण्यासाठी व तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी एखाद्या सल्लागाराची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या वकिलांनी खंडपीठाला दिली.पवई तलावात विनाप्रक्रिया सांडपाणी सोडण्यात येते, त्याशिवाय कचराही टाकण्यात येतो. विकासक टेकडीवर अतिक्रमण करून इमारती उभारत आहेत, तरीही महापालिका संबंधितांवर काहीही कारवाई करत नाही. राज्य सरकार व महापालिकेला संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर जोशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काय पावले उचलणार, अशी विचारणा गेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने जिल्हाधिकारी व महापालिकेकडे केली होती.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जिल्हाधिकारी आणि महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर केले. एप्रिल २०१७ ते फेबु्रवारी २०१९ पर्यंत तलाव स्वच्छ करण्यासाठी पावले उचलण्यात येतील. याच कालावधीत पाण्याचा दर्जाही सुधारण्यात येईल. नागरिकांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जाईल आणि नागरिकांमध्ये जागरूकताही निर्माण करण्यात येईल, असे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)