शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

किरकोळ विक्रेते बंदवर ठाम

By admin | Updated: July 20, 2016 00:23 IST

खरेदीदार व्यापारी आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन यांच्यात आज झालेल्या बैठकीतही तोडगा निघाला नाही.

पुणे : खरेदीदार व्यापाऱ्यांच्या बंदबाबत खरेदीदार व्यापारी आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन यांच्यात आज झालेल्या बैठकीतही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शहरातील खरेदीदार व्यापाऱ्यांनी शेतमाल खरेदी न करण्याचा बंद कायम सुरू ठेवला आहे. दरम्यान, मुंबईत पणनमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत बंद मागे घेण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, बंद मिटत नाही तोपर्यंत पुणेकरांना फळभाज्यांसह पालेभाज्या खरेदीसाठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत.राज्य सरकारने शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून आडत वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास विरोध करून आडत ही शेतकऱ्यांकडूनच घ्यावी, या मागणीसाठी खरेदीदारांनी रविवारपासून अचानकपणे खरेदी बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर झालेच आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांनाही भाजीपाला खरेदीसाठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर खरेदीदार व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांची भेट घेतली. खरेदीदारांकडून आडत घेऊ नये अथवा आडत घ्यायची असेल तर शेतकरी आणि खरेदीदार यांच्यात आडत विभागून द्यावी, अशी मागणी खरेदीदारांनी केली. मात्र, याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार बाजार समिती प्रशासनाला नसल्याने ही बैठक निर्णयाविनाच संपली.याबाबत मुख्य प्रशासक दिलीप खैरे म्हणाले, उद्या (दि.२०) मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत बाजार समिती प्रशासन खरेदीदारांच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत बंद मागे घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यताही असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा फु ले मंडई स्वामी समर्थ शेतीमाल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ कासुर्डे म्हणाले, की खरेदीदारांकडून आडत वसुलीमुळे खरेदीदारांसह शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांचे नुकसान होत आहे. यामध्ये कष्टाचा मोबदला फक्त आडते कमवत आहेत. खरेदीदार व्यापारी मार्केट यार्डातून शेतमाल आणणे, मालाची प्रतवारी करणे, विकणे आदी सर्व व्यवहार रोखीने करीत असतो. याशिवाय व्यापाऱ्यांना प्रवासभाडे, गाळाभाडे, वीजबिल आदी खर्चही असतात. तर नियमानुसार ६ टक्के आडत असली तरी आडतदार सेस, लेव्ही आदी करानुसार ती १० ते १२ टक्के आडत वसूल करतात. त्यामुळे आडतदार पद्धतच बंद करावी. आम्हाला आडत्यांची मध्यस्थी नको आहे. शेतकऱ्यांनी महात्मा फुले मंडई येथे शेतमाल आणल्यास शेतकऱ्यांकडून रोख माल खरेदी करण्यात येईल. यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांशी चर्चा झाली आहे. बंदबाबत आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.>मंडईला उपबाजाराचा दर्जा द्यावापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने महात्मा फुले मंडईला उपबाजार म्हणून मान्यता द्यावी. मंडई आवारात येणाऱ्या मालावर सेस भरण्याची येथील व्यापाऱ्यांची तयारी आहे. याचा फायदा सुमारे ७ ते ८ हजार खरेदीदार व्यापाऱ्यांना होणार आहे. शहर आणि परिसरातील २९ शेतीमाल व्यापारी संघटनांची ही मागणी आहे. या मागणीसाठी मुख्यमंत्री पणनमंत्र्यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचेही राजाभाऊ कासुर्डे यांनी सांगितले.