शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

अंड्यावर वाढत्या तापमानाचा परिणाम

By admin | Updated: April 28, 2017 02:40 IST

गेल्या काही वर्षांत वातावरणात अनेक बदल झाले आहेत. त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नैसर्गिक गोष्टींवर झालेला पाहायला मिळतो.

मुंबई : गेल्या काही वर्षांत वातावरणात अनेक बदल झाले आहेत. त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नैसर्गिक गोष्टींवर झालेला पाहायला मिळतो. वाढत्या तापमानामुळे अन्नधान्याचा दर्जा खालावलेला पाहायला मिळतो. याचेच अजून एक उदाहरण म्हणजे सध्याचा चर्चेतला विषय कृत्रिम अंडी. बाजारात कृत्रिम प्लॅस्टिकची अंडी आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यामुळे घबराट पसरली. पण, बाजारात कृत्रिम अंडी आलेली नसून वाढत्या तापमानाचा परिणाम अंड्यावर होत असून, त्यामुळे त्यात बदल झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी कोलकाता, डोंबिवली, भांडुप, विक्रोळी आणि चीनमध्येही कृत्रिम अंडी बाजारात आल्याचे वृत्त पसरले. नेहमीच्या अंड्यापेक्षा ही अंडी वेगळी दिसतात. तसेच ती लवकर फुटत नाहीत, आतला पांढरा आणि पिवळा बलक प्लॅस्टिकसारखा दिसतो. ही अंडी प्लॅस्टिकसारखी दिसत असल्याने बाजारात प्लॅस्टिकची अंडी आली आहेत, या वृत्ताने अनेक जण घाबरले. प्रत्यक्षात मात्र असे अजून सिद्ध झालेले नाही. त्यामुळे ही कृत्रिम अंडी नसून वाढत्या तापमानामुळे अंड्यामध्ये बदल होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (ग्रेटर मुंबई) सुरेश अन्नपुरे यांनी सांगितले. अन्नपुरे यांनी पुढे सांगितले, मुंबईसह राज्यातील तापमानात वाढ झालेली आहे. या वाढीचा परिणाम अंड्यावर झालेला असू शकतो. लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कारण, या वृत्तानंतर एफडीएने मुंबईतून दोन नमुने घेतले आहेत. या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत सुरू आहे. अद्याप अहवाल आलेला नाही. अंड्याचे कवच सच्छिद्र असते, अंड्यामध्ये पोकळी असते. कवचाला असलेल्या छिद्रांमधून बाहेरील हवा अंड्याच्या पोकळीत जाते. हवेमुळे अंड्यातील पांढरा बलक आणि पिवळा बलक यांच्यासह अंड्याच्या आवरणातील पातळ आवरण चिकटते. छिद्र मोठी झाल्यास ही प्रक्रिया वाढते. अंड्यामध्ये प्रोटीन, फॅट असतात. हवा आत गेल्याने हे खराब होऊ शकतात. त्यामुळे हे बलक आणि आवरण चिकटते. यामुळेच अंडी प्लॅस्टिकसदृश दिसू लागतात. एका तज्ज्ञ व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृत्रिम अंडी तयार करण्याची प्रक्रिया इतकी सोपी नाही. तसेच असे अंडे तयार करण्यासाठी येणारा खर्च हा साधारण ५०० ते हजार रुपये इतका येईल. इतकी महाग अंडी विकली जाणार नाहीत. कृत्रिम आणि इतकी महाग अंडी का तयार करण्यात येतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे तापमानवाढीचा परिणाम होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)