शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अंड्यावर वाढत्या तापमानाचा परिणाम

By admin | Updated: April 28, 2017 02:40 IST

गेल्या काही वर्षांत वातावरणात अनेक बदल झाले आहेत. त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नैसर्गिक गोष्टींवर झालेला पाहायला मिळतो.

मुंबई : गेल्या काही वर्षांत वातावरणात अनेक बदल झाले आहेत. त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नैसर्गिक गोष्टींवर झालेला पाहायला मिळतो. वाढत्या तापमानामुळे अन्नधान्याचा दर्जा खालावलेला पाहायला मिळतो. याचेच अजून एक उदाहरण म्हणजे सध्याचा चर्चेतला विषय कृत्रिम अंडी. बाजारात कृत्रिम प्लॅस्टिकची अंडी आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यामुळे घबराट पसरली. पण, बाजारात कृत्रिम अंडी आलेली नसून वाढत्या तापमानाचा परिणाम अंड्यावर होत असून, त्यामुळे त्यात बदल झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी कोलकाता, डोंबिवली, भांडुप, विक्रोळी आणि चीनमध्येही कृत्रिम अंडी बाजारात आल्याचे वृत्त पसरले. नेहमीच्या अंड्यापेक्षा ही अंडी वेगळी दिसतात. तसेच ती लवकर फुटत नाहीत, आतला पांढरा आणि पिवळा बलक प्लॅस्टिकसारखा दिसतो. ही अंडी प्लॅस्टिकसारखी दिसत असल्याने बाजारात प्लॅस्टिकची अंडी आली आहेत, या वृत्ताने अनेक जण घाबरले. प्रत्यक्षात मात्र असे अजून सिद्ध झालेले नाही. त्यामुळे ही कृत्रिम अंडी नसून वाढत्या तापमानामुळे अंड्यामध्ये बदल होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (ग्रेटर मुंबई) सुरेश अन्नपुरे यांनी सांगितले. अन्नपुरे यांनी पुढे सांगितले, मुंबईसह राज्यातील तापमानात वाढ झालेली आहे. या वाढीचा परिणाम अंड्यावर झालेला असू शकतो. लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कारण, या वृत्तानंतर एफडीएने मुंबईतून दोन नमुने घेतले आहेत. या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत सुरू आहे. अद्याप अहवाल आलेला नाही. अंड्याचे कवच सच्छिद्र असते, अंड्यामध्ये पोकळी असते. कवचाला असलेल्या छिद्रांमधून बाहेरील हवा अंड्याच्या पोकळीत जाते. हवेमुळे अंड्यातील पांढरा बलक आणि पिवळा बलक यांच्यासह अंड्याच्या आवरणातील पातळ आवरण चिकटते. छिद्र मोठी झाल्यास ही प्रक्रिया वाढते. अंड्यामध्ये प्रोटीन, फॅट असतात. हवा आत गेल्याने हे खराब होऊ शकतात. त्यामुळे हे बलक आणि आवरण चिकटते. यामुळेच अंडी प्लॅस्टिकसदृश दिसू लागतात. एका तज्ज्ञ व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृत्रिम अंडी तयार करण्याची प्रक्रिया इतकी सोपी नाही. तसेच असे अंडे तयार करण्यासाठी येणारा खर्च हा साधारण ५०० ते हजार रुपये इतका येईल. इतकी महाग अंडी विकली जाणार नाहीत. कृत्रिम आणि इतकी महाग अंडी का तयार करण्यात येतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे तापमानवाढीचा परिणाम होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)