शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
4
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
5
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
6
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
7
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
9
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
10
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
11
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
12
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
13
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
15
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
16
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ
17
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
18
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
19
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
20
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा

वाढत्या तापमानाचा निसर्गावर परिणाम

By admin | Updated: April 19, 2017 00:45 IST

गेल्या सुमारे वीस वर्षांत प्रथमच विक्रमी तापमानाची अनुभूती सध्या रायगडवासीयांना येत असून वाढत्या तापमानाचे विपरीत परिणाम आता निसर्ग आणि सजीवांवर होताना दिसून येत आहेत

अलिबाग : गेल्या सुमारे वीस वर्षांत प्रथमच विक्रमी तापमानाची अनुभूती सध्या रायगडवासीयांना येत असून वाढत्या तापमानाचे विपरीत परिणाम आता निसर्ग आणि सजीवांवर होताना दिसून येत आहेत, असा निष्कर्ष भूगोल अभ्यासक तथा पोलादपूर येथील एस.एम.कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.समीर बुटाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे. डॉ.बुटाला सातत्याने महाड पोलादपूर परिसरातील वाढत्या तपामानाची नोंद घेवून त्या अनुषंगाने वातावरणातील बदलाचा सातत्यपूर्ण अभ्यास करीत आहेत. मंगळवारी पोलादपूर-महाडमधील दुपारी बारा वाजताचे तापमान ३८ ते ४२ अंश सेल्सिअस इतके आढळले असून, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण २२ टक्के निष्पन्न झाले आहे.वाढत्या तापमानाचे भौगोलिक परिणाम विषद करताना डॉ.बुटाला म्हणाले, अपेक्षित तापमानापेक्षा अधिक तापमान वाढल्याने पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या ‘वातावरण’ नामक आवरणातील अनेक वायू अधिक प्रमाणात प्रसरित होऊन, त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम प्राणिमात्रांसह भूभागावर देखील होतो. तो परिणाम आता हळूहळू दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे विशेष: सह्याद्री रांगातील खडकातील मूलद्रव्ये प्रसरण पावतात, परिणामी खडक फुटतात. याची प्रचिती महाड तालुक्यातील माझेरी घाटातील भूस्खलनानंतर आली आहे. खडकांप्रमाणेच माती, तिच्या उष्णता ग्रहण करण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक तापत असल्याने तिच्यातील नैसर्गिक मूलद्रवे ऱ्हास पावतात. मातीमध्ये अनेक सूक्ष्म जीवांचा अधिवास असतो. हे जीव अतिउष्णतेमुळे नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. माणसासह निसर्गातील प्रत्येक सजिवाची कार्यक्षमता त्याच्यामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. शरीरातील पाण्याच्या प्रमाणात घट होत असल्याने कार्यक्षमता कमी होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.वाढते तापमान व हवेत सोडला जाणारा कार्बन डायआॅक्साईड वायू याचा विशिष्ट परिणाम होत आहे. मुळात कार्बन डायआॅक्साईड हा वायू वातावरणावरच्या स्तरावर राहतो व एखाद्या भांड्यासारखी उष्णता वातावरणातील खालच्या थरात थोपवून धरतो त्यामुळे तापमान अधिक वाढते. याचीही प्रचिती सध्या येत असल्याचा निष्कर्ष डॉ.बुटाला यांनी व्यक्त केला आहे. (विशेष प्रतिनिधी)