शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली
2
९४३ पुल, ३६ बोगदे, ३० वर्षांनी काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; ६ तासांचा प्रवास ३ तासात शक्य!
3
Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?
4
CA ला 'बाय बाय'! आता घरबसल्या भरा तुमचा ITR, 'या' ८ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा टॅक्स फ्री!
5
५ जूनला मंदिरात येऊ नका, आयोध्या राम मंदिर प्रशासनाचं भक्तांना आवाहन; नेमकं कारण काय?
6
वयाच्या ७९व्या वर्षी घरात एकट्या राहतात उषा नाडकर्णी, रडून सांगितलं दुःख, म्हणाल्या- "कधी पडले तर..."
7
Career Astro Tips: मुलांचे करिअर निवडताना त्यांची आवड आणि व्यवसायाला पूरक ग्रहदशा अवश्य बघा!
8
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
9
Astrology: एखादी जोडी 'मेड फॉर इच अदर' आहे की नाही, हे पाहण्यासाठी गुण आणि ग्रह मिलन महत्त्वाचे!
10
Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या
11
दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटक...., भारतातील कुठल्या राज्यात सर्वाधिक सेक्स वर्कर, धक्कादायक माहिती समोर  
12
दर्शनासाठी गेलेली भावंडं परत आलीच नाहीत; २४ तासांनी शेततळ्यात सापडले तिघांचेही मृतदेह
13
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
14
Video - बुद्धिबळाची 'राणी'! ८ वर्षांच्या मराठमोळ्या लेकीचा जगभरात डंका; विमानात जंगी स्वागत
15
आर्चीचा आज वाढदिवस, किती वर्षाची झाली रिंकू? बॉयकट लूकमधील शाळेतल्या फोटोने वेधलं लक्ष
16
पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू
17
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
18
गुगल-फेसबुकनंतर आता 'डिस्ने'ची नोकरकपात! 'या' कारणामुळे मनोरंजन क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार
19
शेजाऱ्याशी झालेला वाद टोकाला गेला, थेट गोळीच झाडली; प्रसिद्ध अभिनेत्याचा जागीच मृत्यू
20
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज

कारवाईची जबाबदारी ‘एफडीए’चीच

By admin | Updated: September 30, 2016 02:59 IST

नार्कोटिक्स ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांची आहे, असे कायद्यात म्हटले असले तरी,

- अतुल कुलकर्णी,  मुंबईनार्कोटिक्स ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांची आहे, असे कायद्यात म्हटले असले तरी, राज्याच्या औषध प्रशासन विभागाने हात झटकून ही जबाबदारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या खांद्यावर टाकली आहे. सोलापुरात पकडल्या गेलेल्या कथित दोन हजार कोटींच्या डिइफेड्रीनच्या साठ्यातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी ही पळवाट शोधल्याची चर्चा आहे. कारवाई टाळ्ण्यासाठी एफडीएचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल डॉ. जी. एन. सिंग आणि राज्याच्या एफडीएने स्वत: वेळोवेळी काढलेले आदेश केराच्या टोपलीत टाकले गेले आहेत. ५ आॅगस्ट २००९ रोजी आयुक्त धनराज कामतकर, २८ मे २०१० रोजी सहआयुक्त वि. ज्ञा. साळुंखे, १५ जुलै २०१० रोजी सहआयुक्त प्र.रा. उत्तरवार, ८ सप्टेंबर २०१० रोजी आयुक्त सीमा व्यास, १५ फेब्रुवारी २०१३ रोजी आयुक्त महेश झगडे यांनी इफेड्रीन किंवा ‘इफेड्रीन विथ सॉल्ट’ (डिइफेड्रीन) च्या नियंत्रणाची जबाबदारी एफडीएच्या इन्स्पेक्टर्सची आहे, असे आदेश काढले.एवढेच नव्हे तर सोलापूर प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेल्या ओ. शो. साधवानी यांनी भारताचे एफडीएचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांच्या पत्राचा आधार घेत १७ एप्रिल २०१४ रोजी एक आदेश राज्यातल्या अधिकाऱ्यांना जारी केला होता. ज्यात त्यांनी म्हटले होते की, ‘आपल्या कार्यक्षेत्रातील नार्कोटिक औषधांच्या उत्पादकांनी आपल्याकडून परवानगी घेतली आहे की नाही याची खात्री करावी, तसेच अशा उत्पादकांद्वारे नार्कोटिक कमिशनर यांच्याकडून आवश्यक त्या परवानग्या घेतल्यानंतरच उत्पादन केले जाईल याची दक्षता घ्यावी,’ असे कळवणारे साधवानीच आता आरोपी झाल्याने एफडीएमध्ये खळबळ उडाली व हे सगळे प्रकरण कसे दाबून टाकता येईल याची जोरात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.या प्रकरणातील सातही अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ नये म्हणून एका मंत्र्याने पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘वर्षा’वर नेले. मात्र चर्चेचा विषय समजताच मुख्यमंत्र्यांनी भेटच नाकारल्याचे समजते. जर अधिकाऱ्यांवर कारवाई केली तर संघटना नाराज होईल, असे सांगत दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाल्याचे समजते.विधि व न्याय विभागाचा सल्ला!- या प्रकरणात सगळीकडून ओरड सुरू झाल्यानंतर ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे, अशी विचारणा करत हा विषय विधी व न्याय विभागाकडे पाठविण्याची शक्कल काही अधिकाऱ्यांनी लढवली व हे प्रकरण आता त्यांच्या सल्ल्यासाठी तिकडे गेले आहे. एखादा विषय संपवायचा असेल तर विधी व न्याय विभागाकडे सल्ला मागायचा आणि सुटका करून घ्यायची, अशीही रणनीती यामागे असल्याचे सांगितले जात आहे.