शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कारवाईची जबाबदारी ‘एफडीए’चीच

By admin | Updated: September 30, 2016 02:59 IST

नार्कोटिक्स ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांची आहे, असे कायद्यात म्हटले असले तरी,

- अतुल कुलकर्णी,  मुंबईनार्कोटिक्स ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांची आहे, असे कायद्यात म्हटले असले तरी, राज्याच्या औषध प्रशासन विभागाने हात झटकून ही जबाबदारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या खांद्यावर टाकली आहे. सोलापुरात पकडल्या गेलेल्या कथित दोन हजार कोटींच्या डिइफेड्रीनच्या साठ्यातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी ही पळवाट शोधल्याची चर्चा आहे. कारवाई टाळ्ण्यासाठी एफडीएचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल डॉ. जी. एन. सिंग आणि राज्याच्या एफडीएने स्वत: वेळोवेळी काढलेले आदेश केराच्या टोपलीत टाकले गेले आहेत. ५ आॅगस्ट २००९ रोजी आयुक्त धनराज कामतकर, २८ मे २०१० रोजी सहआयुक्त वि. ज्ञा. साळुंखे, १५ जुलै २०१० रोजी सहआयुक्त प्र.रा. उत्तरवार, ८ सप्टेंबर २०१० रोजी आयुक्त सीमा व्यास, १५ फेब्रुवारी २०१३ रोजी आयुक्त महेश झगडे यांनी इफेड्रीन किंवा ‘इफेड्रीन विथ सॉल्ट’ (डिइफेड्रीन) च्या नियंत्रणाची जबाबदारी एफडीएच्या इन्स्पेक्टर्सची आहे, असे आदेश काढले.एवढेच नव्हे तर सोलापूर प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेल्या ओ. शो. साधवानी यांनी भारताचे एफडीएचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांच्या पत्राचा आधार घेत १७ एप्रिल २०१४ रोजी एक आदेश राज्यातल्या अधिकाऱ्यांना जारी केला होता. ज्यात त्यांनी म्हटले होते की, ‘आपल्या कार्यक्षेत्रातील नार्कोटिक औषधांच्या उत्पादकांनी आपल्याकडून परवानगी घेतली आहे की नाही याची खात्री करावी, तसेच अशा उत्पादकांद्वारे नार्कोटिक कमिशनर यांच्याकडून आवश्यक त्या परवानग्या घेतल्यानंतरच उत्पादन केले जाईल याची दक्षता घ्यावी,’ असे कळवणारे साधवानीच आता आरोपी झाल्याने एफडीएमध्ये खळबळ उडाली व हे सगळे प्रकरण कसे दाबून टाकता येईल याची जोरात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.या प्रकरणातील सातही अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ नये म्हणून एका मंत्र्याने पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘वर्षा’वर नेले. मात्र चर्चेचा विषय समजताच मुख्यमंत्र्यांनी भेटच नाकारल्याचे समजते. जर अधिकाऱ्यांवर कारवाई केली तर संघटना नाराज होईल, असे सांगत दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाल्याचे समजते.विधि व न्याय विभागाचा सल्ला!- या प्रकरणात सगळीकडून ओरड सुरू झाल्यानंतर ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे, अशी विचारणा करत हा विषय विधी व न्याय विभागाकडे पाठविण्याची शक्कल काही अधिकाऱ्यांनी लढवली व हे प्रकरण आता त्यांच्या सल्ल्यासाठी तिकडे गेले आहे. एखादा विषय संपवायचा असेल तर विधी व न्याय विभागाकडे सल्ला मागायचा आणि सुटका करून घ्यायची, अशीही रणनीती यामागे असल्याचे सांगितले जात आहे.