शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

आदिवासी जातींच्या फेरसर्वेक्षणास विरोध

By admin | Updated: November 10, 2015 02:38 IST

धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणात समाविष्ट करण्यास आदिवासींचा तीव्र विरोध असून, फेरसर्वेक्षणास येणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना

नाशिक : धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणात समाविष्ट करण्यास आदिवासींचा तीव्र विरोध असून, फेरसर्वेक्षणास येणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी पत्रकार परिषदेत दिली.आदिवासी समाजातील १७ जातींच्या फेरसर्वेक्षणास विरोध नोंदविण्यासाठी आदिवासी विकास परिषदेतर्फे ११ डिसेंबरला नागपूरला विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, पद्माकर वळवी यांच्यासह आजी-माजी खासदार व आमदार मोर्चात सहभागी होणार असल्याचे पिचड यांनी सांगितले.आदिवासी समाजाला वनबंधू किंवा वनवासी म्हणून संबोधण्यात येऊ नये. ते कायद्याने गैर ठरविण्यासाठी कायदा करावा. केंद्र सरकारने आदिवासींच्या ४२ पैकी १७ जातींचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून, पुणे विद्यापीठाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना १७ जातींचे फेरसर्वेक्षण करण्याचे काम दिले आहे. केंद्र सरकारचा या १७ जातींना आदिवासी समाजातून काढण्याचा हा कट असून, त्यात प्रामुख्याने महादेव कोळी, महादेव कोकणा, पारधी यांसह अन्य जातींचा समावेश आहे, असे पिचड म्हणाले. केळकर शिफारशीनुसार आदिवासी समाजातील तरुणांसाठी गोंडवण (नागपूर) व नाशिकला स्वतंत्र विद्यापीठ तयार करण्याची शिफारस करावी व पारधी, बर्डे भिल्ल व कातकरी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)