शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एमएमआरडीए’च्या आराखड्याला विरोध

By admin | Updated: March 27, 2017 04:19 IST

‘प्रकल्पांचा जिल्हा’ अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात आता आणखीन प्रकल्पांची भर पडणार आहे; परंतु जिल्ह्यातील

आविष्कार देसाई /अलिबाग‘प्रकल्पांचा जिल्हा’ अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात आता आणखीन प्रकल्पांची भर पडणार आहे; परंतु जिल्ह्यातील आंदोलनांचा इतिहास पाहिल्यास सरकारचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही. यासाठी सरकारने मुंबई महानगर प्रदेश (एमएमआरडीए) विकास आराखडा २०१६-३६ च्या माध्यमातून नवीन शक्कल लढविली आहे. नवीन आराखड्याप्रमाणे सात औद्योगिक झोन ठेवण्यात आले आहेत. विशेष करून अलिबाग आणि पेण तालुक्यांतील उपलब्ध असणाऱ्या मुबलक पाण्यावर डोळा ठेवूनच सरकारने हे धाडस केल्याचे उघड आहे. सरकारचे मनसुबे धुळीला मिळविण्यासाठी अलिबाग आणि पेण तालुक्यात आंदोलन होणार आहे.नागरीकरण आणि औद्योगिकरण वाढत आहे. मुंबई बंदरावर कंपासचे टोक ठेऊन सुमारे १०० कि.मी. अंतरावरील वसईपासून कर्जत,पनवेल, उरण, पेण आणि अलिबागपर्यंत अर्धवर्तुळाकार एमएमआरडीए आराखडा २०१६-३६ आखला आहे. विरार, आणगाव, सापे, तळोजा, कर्जत, खालापूर आणि अलिबाग-आंबाखोरे येथे औद्योगिक झोन ठेवण्यात आला आहे. गोंधळपाडा, पेझारी ही विकास केंद्र निर्माण केली आहेत. विकास आराखडा सप्टेंबर २०१६ साली प्रथम इंग्रजीत त्यानंतर आवाज उठविल्यानंतर २३ जानेवारी, २०१७ ला मराठीत प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावर हरकती घेण्यासाठी १५ एप्रिल, २०१७ शेवटची तारीख आहे. सुमारे ६६७ हरकती २४ मार्च रोजी घेतल्या आहेत. विकास आराखड्यात अलिबाग तालुक्यातील १२ गावे आणि पेण तालुक्यातील ५२ गावे बाधित होणार आहेत. येथील आंबा खोऱ्यातील ३१७ द.ल.घ.मी. आणि हेटवण्याचे १४७.४९ द.ल.घ.मी. पाण्यावर सरकारचा डोळा आहे. हेटवण्याचे सहा हजार ६६६ हेक्टर लाभ क्षेत्र आहे. पैकी नारवेलमधील ४४४ हेक्टर क्षेत्र सर्वात मोठे आहे. लाभ क्षेत्रामध्ये ५२ गावांचा समावेश होतो. २.५० द.ल.घ.मी. पाणी पेण शहरासाठी, तर सिडको ३६.५० द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करते. आंबाखोऱ्याचे लाभ क्षेत्र चार हजार ८२६ आहे. त्यामध्ये खारेपाट विभागातील १५ गावांचा समावेश होतो. रायगड जिल्ह्यात प्रकल्पांविरोधात विविध यशस्वी आंदोलने झाली आहेत. त्यामुळे येथील जमीन ताब्यात घेण्यासाठी काही ठिकाणी औद्योगिक झोन टाकल्यास आंदोलनाची धार कमी होईल, असा सरकारचा समज असावा. खोटा आराखडाआंबा खोरे येथील धेरंड-शहापूर येथील आरक्षण हे मूळ प्रादेशिक योजनेत हरित क्षेत्र-२ (ग्रीन झोन-२) असे आहे. एमआरटीपी कायदा १९६६ कलम २० (१), (२),(३) या तरतुदीनुसार झोन बदल करताना, अथवा हे क्षेत्र औद्योगिक करण्यापूर्वी नोटीस देणे बंधनकारक आहे. तशी नोटीस अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्याचप्रमाणे हे क्षेत्र खारभूमी लाभ क्षेत्र आहे. त्याला खारभूमी कायदा १९७९चे कलम ११,१२,१३ लागू होतात. खारभूमीच्या सुपीक क्षेत्राचे रूपांतर शेतीव्यतिरिक्त कोणत्याही क्षेत्रात करता येत नाही. त्यामुळे एमएमआरडीएचा विकास आराखडा बेकायदेशीर ठरतो, असे मुंबई भूगोल अध्यापक मंडळाचे माजी कार्यवाह रवींद्र छोटू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.एमएमआरडीएच्या विकास आराखड्याबाबत आंदोलनाला दिशा देण्यासाठी अलिबाग तालुक्यातील बांधण येथे २ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता बैठक पार पडणार आहे.औद्योगिक क्षेत्र जाहीर करताना प्रथम पडिक व माळरान जमिनींचे सर्वेक्षण करून त्या जमिनींचा वापर औद्योगिक क्षेत्रासाठी करावा, असे महाराष्ट्र सरकारच्या औद्योगिक, तसेच राष्ट्रीय पुनर्वसन धोरणात नमूद केले आहे. कमीत कमी विस्थापन केवळ गावांचेच नव्हे, तर तेथील उपजीविकेच्या साधनांचे कसे होईल, हेही पाहिले पाहिजे. सरकारचे हे धोरण म्हणजे आगरी, कोळी, कुणबी समाजाचा सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास पुसण्यासारखेच आहे. शेतकऱ्यांना जमिनीपासून दूर करून उद्योजकांना रान मोकळे करण्यात येत असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा संघटक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.