शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही

By admin | Updated: July 21, 2014 23:04 IST

आतार्पयत राज्य शासनाने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. फक्त निवडणुकापुरता वापर केला. आश्वासने दिली

बारामती : आतार्पयत राज्य शासनाने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. फक्त निवडणुकापुरता वापर केला. आश्वासने दिली. राज्य घटनेतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तरतूद केली आहे. परंतु, ‘धनगर’ आणि ‘धनगड’ अशा शब्दोच्चाराचा गैरफायदा घेऊन समाजाला विकासापासून वंचित ठेवले आहे. आता आरक्षणाचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा सूर आजच्या निर्धारसभेत प्रमुख नेत्यांनी लावला. 
 बारामती येथे झालेल्या निर्धार सभे बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे  म्हणाल्या, ‘‘ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. केंद्र शासनाच्या स्तरावर येणा:या सर्व अडचणी दूर करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहू.’’
राष्ट्रीय समाजपक्षाचे नेते महादेव जानकर म्हणाले, ‘‘ या समाजाच्या नेत्यांना दुय्यम दर्जाची पदे दिली. त्यांच्याकडून मते घेतली. मात्र धनगर समाजाला विकासापासून दूर ठेवले.’’  जानकर यांनी विविध पक्षात काम करणा:या समाजातील नेत्यांवर देखील जोरदार टिका केली. दबाव आणल्याशिवाय आरक्षणाचा मुद्दा निकाली लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.
 ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी आरक्षणाच्या मुद्दय़ावर नेहमी दुटप्पी भूमिका सरकारने घेतल्याचे सांगितले. 
कृती समितीचे नेते बाळासाहेब गावडे म्हणाले, ‘‘  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेतच आरक्षणाची तरतूद केली. परंतु, जाणीवपूर्वक त्याची अंमलबजावणी याच राज्यात झाली नाही. 6क् वर्षापासून शब्दोच्चाराचा फायदा घेतला.  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 8 दिवसाची मुदत मागितली आहे. 24 जुलैर्पयत त्यांना मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र फसवणूक झाल्यास कार्यकर्ते उग्र आंदोलन करतील. त्याची जबाबदारी राज्य शासनावर राहील, असा इशारा दिला. 
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, आमदार राम शिंदे, आमदार प्रकाश शेंडगे, डॉ. विकास महात्मे, आमदार रामदास वडकुते, जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भरणो यांची भाषणो झाली.
 कृती समितीचे नेते हनुमंत सूळ यांनी 25 जुलैर्पयत धरणो आंदोलन, उपोषणाचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर पुढील दिशा ठरणार असल्याचे सांगितले.
 
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नाव घेण्यास विरोध..
4या सभेत धनगर आरक्षणाचाच मुद्दा महत्त्वाचा ठरला. आमदार अनिल गोटे यांनी अन्य राजकीय विषयाला हात घातला. मात्र, कार्यकत्र्यानी त्यांचे भाषण बंद पाडले. 
4पुणो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणो यांनी भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा गुणगौरव करण्याचा प्रयत्न करताच उपस्थित तरुणांनी ‘या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याचे नाव घ्यायचे नाही ’ असे सांगून त्यांचे भाषण बंद पाडले. 
4भरणो यांनी अखेर त्यांचे शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त केली. तेव्हा पुढे भाषण करण्यास संधी दिली. 
 
बारामतीत लाखोंच्या संख्येने धनगर बांधव
बारामतीत निर्धार सभेच्या निमित्ताने राज्यभरातून 2 लाखांहून अधिक जनसमूदाय उपस्थित राहिला. शहरातील इंदापूर चौकाला अहिल्यादेवी चौक असे नामकरण करण्यात आले. 
 
काटेवाडीत मेंढय़ांचे रिंगण..
आरक्षण दिंडी भवानीनगर वरून बारामतीकडे येताना काटेवाडीत अहिल्यादेवींच्या रथाभोवती मेंढय़ांचे वैशिष्टय़पुर्ण रिंगण पार पडले. आरक्षण दिंडीने सकाळी भवानीनगर येथून बारामतीकडे प्रस्थान केले.