शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही

By admin | Updated: July 21, 2014 23:04 IST

आतार्पयत राज्य शासनाने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. फक्त निवडणुकापुरता वापर केला. आश्वासने दिली

बारामती : आतार्पयत राज्य शासनाने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. फक्त निवडणुकापुरता वापर केला. आश्वासने दिली. राज्य घटनेतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तरतूद केली आहे. परंतु, ‘धनगर’ आणि ‘धनगड’ अशा शब्दोच्चाराचा गैरफायदा घेऊन समाजाला विकासापासून वंचित ठेवले आहे. आता आरक्षणाचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा सूर आजच्या निर्धारसभेत प्रमुख नेत्यांनी लावला. 
 बारामती येथे झालेल्या निर्धार सभे बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे  म्हणाल्या, ‘‘ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. केंद्र शासनाच्या स्तरावर येणा:या सर्व अडचणी दूर करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहू.’’
राष्ट्रीय समाजपक्षाचे नेते महादेव जानकर म्हणाले, ‘‘ या समाजाच्या नेत्यांना दुय्यम दर्जाची पदे दिली. त्यांच्याकडून मते घेतली. मात्र धनगर समाजाला विकासापासून दूर ठेवले.’’  जानकर यांनी विविध पक्षात काम करणा:या समाजातील नेत्यांवर देखील जोरदार टिका केली. दबाव आणल्याशिवाय आरक्षणाचा मुद्दा निकाली लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.
 ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी आरक्षणाच्या मुद्दय़ावर नेहमी दुटप्पी भूमिका सरकारने घेतल्याचे सांगितले. 
कृती समितीचे नेते बाळासाहेब गावडे म्हणाले, ‘‘  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेतच आरक्षणाची तरतूद केली. परंतु, जाणीवपूर्वक त्याची अंमलबजावणी याच राज्यात झाली नाही. 6क् वर्षापासून शब्दोच्चाराचा फायदा घेतला.  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 8 दिवसाची मुदत मागितली आहे. 24 जुलैर्पयत त्यांना मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र फसवणूक झाल्यास कार्यकर्ते उग्र आंदोलन करतील. त्याची जबाबदारी राज्य शासनावर राहील, असा इशारा दिला. 
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, आमदार राम शिंदे, आमदार प्रकाश शेंडगे, डॉ. विकास महात्मे, आमदार रामदास वडकुते, जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भरणो यांची भाषणो झाली.
 कृती समितीचे नेते हनुमंत सूळ यांनी 25 जुलैर्पयत धरणो आंदोलन, उपोषणाचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर पुढील दिशा ठरणार असल्याचे सांगितले.
 
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नाव घेण्यास विरोध..
4या सभेत धनगर आरक्षणाचाच मुद्दा महत्त्वाचा ठरला. आमदार अनिल गोटे यांनी अन्य राजकीय विषयाला हात घातला. मात्र, कार्यकत्र्यानी त्यांचे भाषण बंद पाडले. 
4पुणो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणो यांनी भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा गुणगौरव करण्याचा प्रयत्न करताच उपस्थित तरुणांनी ‘या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याचे नाव घ्यायचे नाही ’ असे सांगून त्यांचे भाषण बंद पाडले. 
4भरणो यांनी अखेर त्यांचे शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त केली. तेव्हा पुढे भाषण करण्यास संधी दिली. 
 
बारामतीत लाखोंच्या संख्येने धनगर बांधव
बारामतीत निर्धार सभेच्या निमित्ताने राज्यभरातून 2 लाखांहून अधिक जनसमूदाय उपस्थित राहिला. शहरातील इंदापूर चौकाला अहिल्यादेवी चौक असे नामकरण करण्यात आले. 
 
काटेवाडीत मेंढय़ांचे रिंगण..
आरक्षण दिंडी भवानीनगर वरून बारामतीकडे येताना काटेवाडीत अहिल्यादेवींच्या रथाभोवती मेंढय़ांचे वैशिष्टय़पुर्ण रिंगण पार पडले. आरक्षण दिंडीने सकाळी भवानीनगर येथून बारामतीकडे प्रस्थान केले.