शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीवर पुन्हा संवर्धन प्रक्रिया

By admin | Updated: June 2, 2017 15:41 IST

रासायनिक संवर्धनामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर पडत असलेल्या डागांची आणि मूर्तीची शुक्रवारी पुरातत्व खात्याचे उपाधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी पाहणी केली.

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 2 - रासायनिक संवर्धनामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर पडत असलेल्या डागांची आणि मूर्तीची शुक्रवारी पुरातत्व खात्याचे उपाधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी पाहणी केली. यानंतर त्यांनी मूर्ती सुस्थितीत आहे. पूजेतील घटकांमुळे व आर्द्रतेमुळे मूर्तीवर पांढरे डाग पडले असून ते घालवण्यासाठी व झीज थांबवण्यासाठी मूर्तीचे पुन्हा संवर्धन करावे लागेल अशी माहिती त्यांनी दिली.
 
रासायनिक संवर्धनानंतर अवघ्या दोनच वर्षात अंबाबाई मूर्तीवर पांढरे डाग पडल्याचे मागील शुक्रवारी निदर्शनास आले. याची दखल घेत जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांनी तातडीने औरंगाबाद येथील पुरातत्व कार्यालयाशी संपर्क साधला व अधिका-यांना मूर्ती पाहण्याची विनंती केली. 
 
त्यानुसार शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुरात्तत्व खात्याचे उपाधीक्षक  श्रीकांत मिश्रा यांनी जवळपास एक तास अंबाबाई मूर्तीची पाहणी केली. तसेच महाकाली, महासरस्वती आणि देवीच्या डोक्यावरील मातृलिंगादेखील पाहणी केली. यावेळी आर्द्रता समितीचे सदस्य उदय गायकवाड, संगीता खाडे, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार उपस्थित होते. 
या पाहणीनंतर शिवसेनेच्या पदाधिका-यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पुरातत्व अधिका-यांकडून मूर्तीचे व्यवस्थित संवर्धन झाले आहे. धार्मिक विधी, पूजेसाठी जे द्रव्य वापरले जातात त्यातील घटकांमुळे मूर्तीतील भेगांमध्ये थर साचून पांढरे डाग पडले आहेत. 
 
आर्द्रतेचाही मूर्तीवर फार मोठा परिणाम होत आहे. मूर्तीचे सौंदर्य अबाधीत राखून हे डाग घालवण्यासाठी मूर्तीवर पुन्हा एकदा संवर्धन प्रक्रिया करावी लागेल त्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागेल. या प्रक्रियेमध्ये पहिले दोन दिवस मूर्ती स्वच्छ केली जाते. त्यानंतर त्यावर संवर्धनाचा थर दिला जातो त्यासाठी पुन्हा तीन दिवस लागतील. 
 
या कालावधीत मूर्ती कोरडी ठेवावी लागते. कोणतेही धार्मिक विधी करता येणार नाहीत.  यासंबंधीचा अहवाल आम्ही लवकरच देवस्थान समितीला देवू. त्यांच्याशी व श्रीपूजकांशी चर्चा करुन संवर्धनाची तारीख ठरवली जाईल. 
 
गरजेनुसार संवर्धन
अजिंठा, वेरुळ, राजस्थान सारख्या अन्य पुरातन वास्तूंपेक्षा देवतांच्या मूर्तीचा दगड वेगळा असतो. त्यावर धार्मिक विधी केले जातात त्यामुळे त्यांची झिज लवकर होते. एकदा कोटींग केले म्हणजे ते दर सहा महिन्यांनी वर्षानी, दोन वर्षांनी संवर्धन करावेच लागेल असे नाही. तुम्ही मूर्तीची काळजी कशी घेता यावर ते आधारित आहे.
 
अनेक मूर्तीना संवर्धनाच्या २० वर्षांनंतरही संवर्धनाची गरज भासलेली नाही. काही ठिकाणी वारंवार कोटींग करावे लागते. पूजेच्या पद्धतीत बदल करुन मूर्तीची नियमित स्वच्छता राखली, नियमांचे पालन केले आणि आर्द्रता नियंत्रणात राखली गेली तर मूर्तीवर पून्हा कोणताही परिणाम होणार नाही.