शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीवर पुन्हा संवर्धन प्रक्रिया

By admin | Updated: June 2, 2017 15:41 IST

रासायनिक संवर्धनामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर पडत असलेल्या डागांची आणि मूर्तीची शुक्रवारी पुरातत्व खात्याचे उपाधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी पाहणी केली.

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 2 - रासायनिक संवर्धनामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर पडत असलेल्या डागांची आणि मूर्तीची शुक्रवारी पुरातत्व खात्याचे उपाधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी पाहणी केली. यानंतर त्यांनी मूर्ती सुस्थितीत आहे. पूजेतील घटकांमुळे व आर्द्रतेमुळे मूर्तीवर पांढरे डाग पडले असून ते घालवण्यासाठी व झीज थांबवण्यासाठी मूर्तीचे पुन्हा संवर्धन करावे लागेल अशी माहिती त्यांनी दिली.
 
रासायनिक संवर्धनानंतर अवघ्या दोनच वर्षात अंबाबाई मूर्तीवर पांढरे डाग पडल्याचे मागील शुक्रवारी निदर्शनास आले. याची दखल घेत जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांनी तातडीने औरंगाबाद येथील पुरातत्व कार्यालयाशी संपर्क साधला व अधिका-यांना मूर्ती पाहण्याची विनंती केली. 
 
त्यानुसार शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुरात्तत्व खात्याचे उपाधीक्षक  श्रीकांत मिश्रा यांनी जवळपास एक तास अंबाबाई मूर्तीची पाहणी केली. तसेच महाकाली, महासरस्वती आणि देवीच्या डोक्यावरील मातृलिंगादेखील पाहणी केली. यावेळी आर्द्रता समितीचे सदस्य उदय गायकवाड, संगीता खाडे, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार उपस्थित होते. 
या पाहणीनंतर शिवसेनेच्या पदाधिका-यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पुरातत्व अधिका-यांकडून मूर्तीचे व्यवस्थित संवर्धन झाले आहे. धार्मिक विधी, पूजेसाठी जे द्रव्य वापरले जातात त्यातील घटकांमुळे मूर्तीतील भेगांमध्ये थर साचून पांढरे डाग पडले आहेत. 
 
आर्द्रतेचाही मूर्तीवर फार मोठा परिणाम होत आहे. मूर्तीचे सौंदर्य अबाधीत राखून हे डाग घालवण्यासाठी मूर्तीवर पुन्हा एकदा संवर्धन प्रक्रिया करावी लागेल त्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागेल. या प्रक्रियेमध्ये पहिले दोन दिवस मूर्ती स्वच्छ केली जाते. त्यानंतर त्यावर संवर्धनाचा थर दिला जातो त्यासाठी पुन्हा तीन दिवस लागतील. 
 
या कालावधीत मूर्ती कोरडी ठेवावी लागते. कोणतेही धार्मिक विधी करता येणार नाहीत.  यासंबंधीचा अहवाल आम्ही लवकरच देवस्थान समितीला देवू. त्यांच्याशी व श्रीपूजकांशी चर्चा करुन संवर्धनाची तारीख ठरवली जाईल. 
 
गरजेनुसार संवर्धन
अजिंठा, वेरुळ, राजस्थान सारख्या अन्य पुरातन वास्तूंपेक्षा देवतांच्या मूर्तीचा दगड वेगळा असतो. त्यावर धार्मिक विधी केले जातात त्यामुळे त्यांची झिज लवकर होते. एकदा कोटींग केले म्हणजे ते दर सहा महिन्यांनी वर्षानी, दोन वर्षांनी संवर्धन करावेच लागेल असे नाही. तुम्ही मूर्तीची काळजी कशी घेता यावर ते आधारित आहे.
 
अनेक मूर्तीना संवर्धनाच्या २० वर्षांनंतरही संवर्धनाची गरज भासलेली नाही. काही ठिकाणी वारंवार कोटींग करावे लागते. पूजेच्या पद्धतीत बदल करुन मूर्तीची नियमित स्वच्छता राखली, नियमांचे पालन केले आणि आर्द्रता नियंत्रणात राखली गेली तर मूर्तीवर पून्हा कोणताही परिणाम होणार नाही.