शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीवर पुन्हा संवर्धन प्रक्रिया

By admin | Updated: June 2, 2017 15:41 IST

रासायनिक संवर्धनामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर पडत असलेल्या डागांची आणि मूर्तीची शुक्रवारी पुरातत्व खात्याचे उपाधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी पाहणी केली.

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 2 - रासायनिक संवर्धनामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर पडत असलेल्या डागांची आणि मूर्तीची शुक्रवारी पुरातत्व खात्याचे उपाधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी पाहणी केली. यानंतर त्यांनी मूर्ती सुस्थितीत आहे. पूजेतील घटकांमुळे व आर्द्रतेमुळे मूर्तीवर पांढरे डाग पडले असून ते घालवण्यासाठी व झीज थांबवण्यासाठी मूर्तीचे पुन्हा संवर्धन करावे लागेल अशी माहिती त्यांनी दिली.
 
रासायनिक संवर्धनानंतर अवघ्या दोनच वर्षात अंबाबाई मूर्तीवर पांढरे डाग पडल्याचे मागील शुक्रवारी निदर्शनास आले. याची दखल घेत जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांनी तातडीने औरंगाबाद येथील पुरातत्व कार्यालयाशी संपर्क साधला व अधिका-यांना मूर्ती पाहण्याची विनंती केली. 
 
त्यानुसार शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुरात्तत्व खात्याचे उपाधीक्षक  श्रीकांत मिश्रा यांनी जवळपास एक तास अंबाबाई मूर्तीची पाहणी केली. तसेच महाकाली, महासरस्वती आणि देवीच्या डोक्यावरील मातृलिंगादेखील पाहणी केली. यावेळी आर्द्रता समितीचे सदस्य उदय गायकवाड, संगीता खाडे, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार उपस्थित होते. 
या पाहणीनंतर शिवसेनेच्या पदाधिका-यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पुरातत्व अधिका-यांकडून मूर्तीचे व्यवस्थित संवर्धन झाले आहे. धार्मिक विधी, पूजेसाठी जे द्रव्य वापरले जातात त्यातील घटकांमुळे मूर्तीतील भेगांमध्ये थर साचून पांढरे डाग पडले आहेत. 
 
आर्द्रतेचाही मूर्तीवर फार मोठा परिणाम होत आहे. मूर्तीचे सौंदर्य अबाधीत राखून हे डाग घालवण्यासाठी मूर्तीवर पुन्हा एकदा संवर्धन प्रक्रिया करावी लागेल त्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागेल. या प्रक्रियेमध्ये पहिले दोन दिवस मूर्ती स्वच्छ केली जाते. त्यानंतर त्यावर संवर्धनाचा थर दिला जातो त्यासाठी पुन्हा तीन दिवस लागतील. 
 
या कालावधीत मूर्ती कोरडी ठेवावी लागते. कोणतेही धार्मिक विधी करता येणार नाहीत.  यासंबंधीचा अहवाल आम्ही लवकरच देवस्थान समितीला देवू. त्यांच्याशी व श्रीपूजकांशी चर्चा करुन संवर्धनाची तारीख ठरवली जाईल. 
 
गरजेनुसार संवर्धन
अजिंठा, वेरुळ, राजस्थान सारख्या अन्य पुरातन वास्तूंपेक्षा देवतांच्या मूर्तीचा दगड वेगळा असतो. त्यावर धार्मिक विधी केले जातात त्यामुळे त्यांची झिज लवकर होते. एकदा कोटींग केले म्हणजे ते दर सहा महिन्यांनी वर्षानी, दोन वर्षांनी संवर्धन करावेच लागेल असे नाही. तुम्ही मूर्तीची काळजी कशी घेता यावर ते आधारित आहे.
 
अनेक मूर्तीना संवर्धनाच्या २० वर्षांनंतरही संवर्धनाची गरज भासलेली नाही. काही ठिकाणी वारंवार कोटींग करावे लागते. पूजेच्या पद्धतीत बदल करुन मूर्तीची नियमित स्वच्छता राखली, नियमांचे पालन केले आणि आर्द्रता नियंत्रणात राखली गेली तर मूर्तीवर पून्हा कोणताही परिणाम होणार नाही.