शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

‘आॅनलाइन’ लॉटरीप्रकरणी मागविला अहवाल

By admin | Updated: September 18, 2016 00:41 IST

राज्यात सुरू असलेल्या ‘आॅनलाईन’ लॉटरीवर बंदी आणण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे.

बारामती : राज्यात सुरू असलेल्या ‘आॅनलाईन’ लॉटरीवर बंदी आणण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. या ‘आॅनलाईन’ लॉटरीच्या माध्यमातून राज्य सरकारला कोट्यवधी रुपयांचा कर मिळतो. लॉटरी बंद केल्यास काय परिणाम होईल, याचा अहवाल राज्याच्या गृह खात्याने सर्व पोलीस ठाण्यांकडून मागवला आहे. आॅनलाईन लॉटरीवर अर्थ, महसूल आणि गृह या खात्यांचे नियंत्रण असते. महाराष्ट्रासह सिक्कीम, मिझोराम, गोवा, नागालँड या राज्यांच्या ‘आॅनलाईन’ सोडती होतात. मटका, जुगार या अवैध व्यवसायातून जनसामान्यांची फसगत टाळण्यासाठी राज्य सरकाराने यापूर्वी महाराष्ट्र राज्य लॉटरी अर्थ विभागाच्या मान्यतेने सुरू केली. या लॉटरीच्या सोडती सणांच्या काळात होत. त्याचबरोबर बंपर सोडती काढल्या जात. त्याचा कालावधी आठवड्याचा होता. महाराष्ट्र राज्य लॉटरीला सिक्कीम, मिझोराम, गोवा, नागालँड या राज्य सरकारांनी सुरू केलेल्या ‘आॅनलाईन’ लॉटरी सोडतीमुळे फटका बसला. ‘आॅनलाईन’ लॉटरीमुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीला स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीचे महत्त्व कमी झाल्याने राज्य शासनानेदेखील ‘आॅनलाईन’ लॉटरी सुरू केली. सध्या संपूर्ण राज्यात ‘आॅनलाईन’ लॉटरीचा व्यवसाय तेजीत आहे. त्यावर सरकारचे नियंत्रण असल्यामुळे व्यवहारदेखील पारदर्शी होतो.याच पार्श्वभूमीवर, अनेकांना रोजगारदेखील मिळाला आहे. राज्य सरकारला कराच्या रूपाने मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो; परंतु ‘आॅनलाईन’ लॉटरीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद केली तर काय परिणाम होईल, याबाबतचा अहवाल गृह खात्याने राज्यातील पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांकडून मागवला आहे. त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या गोपनीय विभागाकडून अहवाल घेतला आहे. ‘आॅनलाईन’ लॉटरी सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत खेळली जाते. दर १५ मिनिटांना निकाल असतो. त्यामुळे ‘आॅनलाईन’ लॉटरी खेळणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. तर, अनेक बेरोजगारांनादेखील व्यवसाय मिळाला आहे. आता ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती मिळत आहे. ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद केली, तर काय परिणाम होईल? किती जण बेरोजगार होतील? राज्याच्या महसुलावर परिणाम होईल का? याबाबत गृह खात्याने विचारणा केली आहे. गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे खरोखरच ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद होणार का, या विवंचनेत व्यावसायिक आहेत. ‘आॅनलाईन’ लॉटरीचे अहवाल मागवण्यात आले आहेत, याला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)>‘आॅनलाईन’ लॉटरी सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत खेळली जाते. दर १५ मिनिटांना निकाल असतो. त्यामुळे ‘आॅनलाईन’ लॉटरी खेळणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. तर, अनेक बेरोजगारांनादेखील व्यवसाय मिळाला आहे. आता ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती मिळत आहे.