शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाइन’ लॉटरीप्रकरणी मागविला अहवाल

By admin | Updated: September 18, 2016 00:41 IST

राज्यात सुरू असलेल्या ‘आॅनलाईन’ लॉटरीवर बंदी आणण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे.

बारामती : राज्यात सुरू असलेल्या ‘आॅनलाईन’ लॉटरीवर बंदी आणण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. या ‘आॅनलाईन’ लॉटरीच्या माध्यमातून राज्य सरकारला कोट्यवधी रुपयांचा कर मिळतो. लॉटरी बंद केल्यास काय परिणाम होईल, याचा अहवाल राज्याच्या गृह खात्याने सर्व पोलीस ठाण्यांकडून मागवला आहे. आॅनलाईन लॉटरीवर अर्थ, महसूल आणि गृह या खात्यांचे नियंत्रण असते. महाराष्ट्रासह सिक्कीम, मिझोराम, गोवा, नागालँड या राज्यांच्या ‘आॅनलाईन’ सोडती होतात. मटका, जुगार या अवैध व्यवसायातून जनसामान्यांची फसगत टाळण्यासाठी राज्य सरकाराने यापूर्वी महाराष्ट्र राज्य लॉटरी अर्थ विभागाच्या मान्यतेने सुरू केली. या लॉटरीच्या सोडती सणांच्या काळात होत. त्याचबरोबर बंपर सोडती काढल्या जात. त्याचा कालावधी आठवड्याचा होता. महाराष्ट्र राज्य लॉटरीला सिक्कीम, मिझोराम, गोवा, नागालँड या राज्य सरकारांनी सुरू केलेल्या ‘आॅनलाईन’ लॉटरी सोडतीमुळे फटका बसला. ‘आॅनलाईन’ लॉटरीमुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीला स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीचे महत्त्व कमी झाल्याने राज्य शासनानेदेखील ‘आॅनलाईन’ लॉटरी सुरू केली. सध्या संपूर्ण राज्यात ‘आॅनलाईन’ लॉटरीचा व्यवसाय तेजीत आहे. त्यावर सरकारचे नियंत्रण असल्यामुळे व्यवहारदेखील पारदर्शी होतो.याच पार्श्वभूमीवर, अनेकांना रोजगारदेखील मिळाला आहे. राज्य सरकारला कराच्या रूपाने मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो; परंतु ‘आॅनलाईन’ लॉटरीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद केली तर काय परिणाम होईल, याबाबतचा अहवाल गृह खात्याने राज्यातील पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांकडून मागवला आहे. त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या गोपनीय विभागाकडून अहवाल घेतला आहे. ‘आॅनलाईन’ लॉटरी सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत खेळली जाते. दर १५ मिनिटांना निकाल असतो. त्यामुळे ‘आॅनलाईन’ लॉटरी खेळणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. तर, अनेक बेरोजगारांनादेखील व्यवसाय मिळाला आहे. आता ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती मिळत आहे. ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद केली, तर काय परिणाम होईल? किती जण बेरोजगार होतील? राज्याच्या महसुलावर परिणाम होईल का? याबाबत गृह खात्याने विचारणा केली आहे. गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे खरोखरच ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद होणार का, या विवंचनेत व्यावसायिक आहेत. ‘आॅनलाईन’ लॉटरीचे अहवाल मागवण्यात आले आहेत, याला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)>‘आॅनलाईन’ लॉटरी सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत खेळली जाते. दर १५ मिनिटांना निकाल असतो. त्यामुळे ‘आॅनलाईन’ लॉटरी खेळणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. तर, अनेक बेरोजगारांनादेखील व्यवसाय मिळाला आहे. आता ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती मिळत आहे.