शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यां’च्या कार्यतत्परतेमुळे सामान्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 01:22 IST

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम शंकर कोल्हे यांनी हजारो कुटुंबांच्या ठेवी वाचविण्याचे काम केल्याने पोलीस खात्यात त्यांचा नावलौकिक वाढला

टाकळी हाजी : पारनेर तालुक्यातील; परंतु सध्या पोलीस खात्यात नाशिक शहरात असणाऱ्या सरकारवाडा पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम शंकर कोल्हे यांनी हजारो कुटुंबांच्या ठेवी वाचविण्याचे काम केल्याने पोलीस खात्यात त्यांचा नावलौकिक वाढला असून, त्यांच्या कार्यक्षम कार्यतत्परतेमुळे तालुक्याची नावलौकिकात भर पडली आहे.एका खासगी मैत्रीय कंपनीने ठेवीदारांना व्याज व एजंट लोकांना कमिशन वाढ, अशी भुरळ पाडून तब्बल २ लाख कुटुंबांना १४०० कोटी रुपयांचा चुना लावण्याचा प्रयत्न केला; मात्र याबाबत सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये या गरीब ठेवीदारांनी कोल्हे यांच्याकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. कोल्हे यांनी लगेच त्यांची फिर्याद संबंधित कंपनीच्या विरोधात घेऊन योग्य पद्धतीने तपास करीत कंपनीच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या कंपनीच्या संचालकांना त्वरित अटक करून, सन १९७८ चे कलम ३, ४, ५ व ६ अन्वये दाखल करून, अत्यंत महत्त्वाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना शिक्षा देण्याचे काम केले आहे; तसेच गुन्ह्याचा तपास उत्कृष्टपणे करीत न्यायालयात मुदतीत दोषारोपपत्रा दाखल केले. ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत म्हणून न्यायालयाच्या आदेशाने एस्क्रो खाते उघडून त्यात रक्कम जमा करण्याची कारवाई केली. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात ठेवीदारांना त्यांच्या रकमेचा परतावा सहा महिन्यांच्या आत मिळण्याचा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाकडून मिळविला. (वार्ताहर)>शिरूर तालुक्यातील जनतेला न्याय मिळण्याची गरज शिरूर तालुक्यातील बहुतांश जनतेने अशाच प्रकारे खासगी कंपन्यांमधील ठेव योजनेमध्ये जास्त व्याजाच्या आमिषाने पैसे गुंतवले आहे. कंपन्यांनी लोकांची गुंतवणूक करताना काही कमिशन एजंटची नियुक्ती करून मध्यस्थीना भरपूर कमिशन दिलेले असल्याने या कमिशन एजंटचा सुळसुळाट झाला आहे. या माध्यमातून शिरूर व पारनेर तालुक्यातील जनतेने खासगी कंपन्यांमध्ये ठेव योजनेच्या माध्यमातून पन्नास कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. आज मात्र या कंपन्या गायब झाल्या आहेत, काही कमिशन एजंटसुद्धा फरार झाले आहेत, याची सक्षम पोलीस अधिकारी नेमून चौकशी करण्यात यावी. तसेच, ज्या लोकांनी या ठेवी खासगी कंपन्यांकडे गुंतवल्या आहेत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये संबधितांच्या विरोधात फिर्याद नोंदवावी, असे आवाहन नागरिकांना केले आहे.