शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

‘त्यां’च्या कार्यतत्परतेमुळे सामान्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 01:22 IST

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम शंकर कोल्हे यांनी हजारो कुटुंबांच्या ठेवी वाचविण्याचे काम केल्याने पोलीस खात्यात त्यांचा नावलौकिक वाढला

टाकळी हाजी : पारनेर तालुक्यातील; परंतु सध्या पोलीस खात्यात नाशिक शहरात असणाऱ्या सरकारवाडा पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम शंकर कोल्हे यांनी हजारो कुटुंबांच्या ठेवी वाचविण्याचे काम केल्याने पोलीस खात्यात त्यांचा नावलौकिक वाढला असून, त्यांच्या कार्यक्षम कार्यतत्परतेमुळे तालुक्याची नावलौकिकात भर पडली आहे.एका खासगी मैत्रीय कंपनीने ठेवीदारांना व्याज व एजंट लोकांना कमिशन वाढ, अशी भुरळ पाडून तब्बल २ लाख कुटुंबांना १४०० कोटी रुपयांचा चुना लावण्याचा प्रयत्न केला; मात्र याबाबत सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये या गरीब ठेवीदारांनी कोल्हे यांच्याकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. कोल्हे यांनी लगेच त्यांची फिर्याद संबंधित कंपनीच्या विरोधात घेऊन योग्य पद्धतीने तपास करीत कंपनीच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या कंपनीच्या संचालकांना त्वरित अटक करून, सन १९७८ चे कलम ३, ४, ५ व ६ अन्वये दाखल करून, अत्यंत महत्त्वाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना शिक्षा देण्याचे काम केले आहे; तसेच गुन्ह्याचा तपास उत्कृष्टपणे करीत न्यायालयात मुदतीत दोषारोपपत्रा दाखल केले. ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत म्हणून न्यायालयाच्या आदेशाने एस्क्रो खाते उघडून त्यात रक्कम जमा करण्याची कारवाई केली. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात ठेवीदारांना त्यांच्या रकमेचा परतावा सहा महिन्यांच्या आत मिळण्याचा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाकडून मिळविला. (वार्ताहर)>शिरूर तालुक्यातील जनतेला न्याय मिळण्याची गरज शिरूर तालुक्यातील बहुतांश जनतेने अशाच प्रकारे खासगी कंपन्यांमधील ठेव योजनेमध्ये जास्त व्याजाच्या आमिषाने पैसे गुंतवले आहे. कंपन्यांनी लोकांची गुंतवणूक करताना काही कमिशन एजंटची नियुक्ती करून मध्यस्थीना भरपूर कमिशन दिलेले असल्याने या कमिशन एजंटचा सुळसुळाट झाला आहे. या माध्यमातून शिरूर व पारनेर तालुक्यातील जनतेने खासगी कंपन्यांमध्ये ठेव योजनेच्या माध्यमातून पन्नास कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. आज मात्र या कंपन्या गायब झाल्या आहेत, काही कमिशन एजंटसुद्धा फरार झाले आहेत, याची सक्षम पोलीस अधिकारी नेमून चौकशी करण्यात यावी. तसेच, ज्या लोकांनी या ठेवी खासगी कंपन्यांकडे गुंतवल्या आहेत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये संबधितांच्या विरोधात फिर्याद नोंदवावी, असे आवाहन नागरिकांना केले आहे.