शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दंगामस्ती करणाऱ्या मुलांच्या पालकांना दिलासा

By admin | Updated: November 16, 2015 02:56 IST

‘मुले अभ्यास करत नाही’, ‘शाळेत मस्ती करतात’, ‘मुले उगाचच चिडचिड करतात’ अशा अनेक समस्यांनी अनेकदा पालक हैराण झाल्याचे आपण पाहतो.

पूजा दामले, मुंबई‘मुले अभ्यास करत नाही’, ‘शाळेत मस्ती करतात’, ‘मुले उगाचच चिडचिड करतात’ अशा अनेक समस्यांनी अनेकदा पालक हैराण झाल्याचे आपण पाहतो. अनेक वेळा समजावूनसुद्धा ही मुले ऐकत नाहीत. त्यामुळे आता नेमके काय करायचे? असा प्रश्न पालकांसमोर असतो. पाल्यांमुळे त्रस्त पालकांसाठी मुंबईत एक खास ‘हेल्पलाइन’ सुरूकरण्यात आली आहे. या हेल्पलाइनद्वारे पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन आता विभक्त कुटुंबेच दिसून येतात. त्यामुळे अनेक पालकांना मुलांच्या समस्या सोडवताना नाकीनऊ येतात. त्यांना योग्य पर्यायदेखील मिळत नाही. पर्यायाने पालक आणि मुलांमधील संवादात दरी निर्माण होत जाते. या सर्वांवर पर्याय म्हणून पालकांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचे ‘परिसर आशा’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सवूर यांनी सांगितले.अभ्यास करणारा मुलगा किंवा मुलगी अचानक अभ्यास करेनाशी होते. एखादी गोष्ट मिळाली नाही, तर ही मुले चिडचिड करतात. अशा वेळी पालकांना मुलांशी कसे वागावे, हे समजत नाही, पण अजूनही अशा प्रश्नांसाठी मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे पालक टाळतात. हा पर्याय सहसा निवडला जात नाही. पाल्यामुळे त्रस्त असलेल्या पालकांना आधार म्हणून पालकांसाठी ही खास हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. शिक्षक दिनापासून ही हेल्पलाइन प्रायोगिक तत्त्वावर सुरूकरण्यात आली असून, आत्तापर्यंत ६० ते ६५ कॉल्स हेल्पलाइनवर आल्याचे आरती यांनी सांगितले. अनेकदा पालकांना समोरासमोर बोलणे शक्य नसते, वेळेच्याही मर्यादा असतात, पण फोनवर पालकांची ओळख उघड होत नाही. त्यामुळे पालक फोनवर दिलखुलासपणे बोलतात. सगळ््या समस्या सविस्तरपणे सांगतात. मग फोनवरच पालकांचे समुपदेशन केले जाते, पालकांना मार्गदर्शनही केले जाते, पण प्रश्न खूपच जटिल असल्यास पालकांना कार्यालयात बोलावून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात येते. याद्वारे पालकांना नवीन दिशा मिळते, असे आरती यांचे म्हणणे आहे.