शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

दंगामस्ती करणाऱ्या मुलांच्या पालकांना दिलासा

By admin | Updated: November 16, 2015 02:56 IST

‘मुले अभ्यास करत नाही’, ‘शाळेत मस्ती करतात’, ‘मुले उगाचच चिडचिड करतात’ अशा अनेक समस्यांनी अनेकदा पालक हैराण झाल्याचे आपण पाहतो.

पूजा दामले, मुंबई‘मुले अभ्यास करत नाही’, ‘शाळेत मस्ती करतात’, ‘मुले उगाचच चिडचिड करतात’ अशा अनेक समस्यांनी अनेकदा पालक हैराण झाल्याचे आपण पाहतो. अनेक वेळा समजावूनसुद्धा ही मुले ऐकत नाहीत. त्यामुळे आता नेमके काय करायचे? असा प्रश्न पालकांसमोर असतो. पाल्यांमुळे त्रस्त पालकांसाठी मुंबईत एक खास ‘हेल्पलाइन’ सुरूकरण्यात आली आहे. या हेल्पलाइनद्वारे पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन आता विभक्त कुटुंबेच दिसून येतात. त्यामुळे अनेक पालकांना मुलांच्या समस्या सोडवताना नाकीनऊ येतात. त्यांना योग्य पर्यायदेखील मिळत नाही. पर्यायाने पालक आणि मुलांमधील संवादात दरी निर्माण होत जाते. या सर्वांवर पर्याय म्हणून पालकांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचे ‘परिसर आशा’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सवूर यांनी सांगितले.अभ्यास करणारा मुलगा किंवा मुलगी अचानक अभ्यास करेनाशी होते. एखादी गोष्ट मिळाली नाही, तर ही मुले चिडचिड करतात. अशा वेळी पालकांना मुलांशी कसे वागावे, हे समजत नाही, पण अजूनही अशा प्रश्नांसाठी मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे पालक टाळतात. हा पर्याय सहसा निवडला जात नाही. पाल्यामुळे त्रस्त असलेल्या पालकांना आधार म्हणून पालकांसाठी ही खास हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. शिक्षक दिनापासून ही हेल्पलाइन प्रायोगिक तत्त्वावर सुरूकरण्यात आली असून, आत्तापर्यंत ६० ते ६५ कॉल्स हेल्पलाइनवर आल्याचे आरती यांनी सांगितले. अनेकदा पालकांना समोरासमोर बोलणे शक्य नसते, वेळेच्याही मर्यादा असतात, पण फोनवर पालकांची ओळख उघड होत नाही. त्यामुळे पालक फोनवर दिलखुलासपणे बोलतात. सगळ््या समस्या सविस्तरपणे सांगतात. मग फोनवरच पालकांचे समुपदेशन केले जाते, पालकांना मार्गदर्शनही केले जाते, पण प्रश्न खूपच जटिल असल्यास पालकांना कार्यालयात बोलावून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात येते. याद्वारे पालकांना नवीन दिशा मिळते, असे आरती यांचे म्हणणे आहे.