शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

धार्मिक उन्माद लोकच खवपून घेणार नाहीत

By admin | Updated: October 19, 2015 03:15 IST

देशात सध्या काही लोक धार्मिक उन्माद घडवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

विचारपूर्वक राज्य करा : सुशीलकुमार शिंदे यांचा सरकारला इशारानागपूर : देशात सध्या काही लोक धार्मिक उन्माद घडवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु हा धार्मिक उन्माद देशात चालू शकत नाही. लोकही तो खपवून घेणार नाहीत, तेव्हा राज्यकर्त्यांनी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यांचा विचार करून राज्य करावे, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे दिला. मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार सोहळ्यासाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, हा देश धर्मनिरपेक्ष आहे. डॉ. आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली असून ती धर्मनिरपेक्ष व लोकतांत्रिक आहे. या धर्मनिरपेक्ष देशात धार्मिक उन्माद चालू देणार नाही. लोकही ते चालू देणार नाही. या धार्मिक उन्मादाच्या विरोधात देशभरातील साहित्यिक त्यांना मिळालेले पुरस्कार परत करीत आहेत. त्याबाबत ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याच्या आणि एकूणच चळवळीमध्ये साहित्यिकांची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. तेव्हा देशातील साहित्यिक याप्रकारे आपला विरोध प्रकट करीत असतील तर ती साधीसुधी बाब नाही. पुरस्कार परत करणे, राजीनामा देणे हे सरकारसाठी चांगले संकेत नाहीत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. सनातन वरील बंदीबाबत विचारले असता यापूर्वीच आपण यावर प्रतिक्रिया दिली असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.(प्रतिनिधी)