शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

पातलीपाड्यातील त्या रहिवाशांना दिलासा

By admin | Updated: October 20, 2016 03:56 IST

४० वर्षांपासून शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांनी केलेल्या अर्जावर तत्काळ निर्णय घ्यावा

ठाणे : घोडबंदर भागातील पातलीपाडा येथे सुमारे ४० वर्षांपासून शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांनी केलेल्या अर्जावर तत्काळ निर्णय घ्यावा, असे आदेश कोकण विभागाच्या अप्पर आयुक्तांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहेत. त्यामुळे आता येथील रहिवाशांच्या कित्येक वर्षांच्या लढ्याला यश मिळणार आहे.ठाणे महापालिकेचाच भाग असलेल्या परंतु शासनाच्या विविध योजनांपासून मागील अनेक वर्षांपासून वंचित असलेल्या पातलीपाडा, डोंगरीपाडा, इंदिरानगर, समतानगर हा भाग शासनाच्या जागेवर वसला आहे. यामध्ये मागासवर्गीय, आदिवासी आणि इतर समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने आहेत. १९५७-५८ च्या ग्रामपंचायतीच्या काळापासून या जागेवर त्यांचे वास्तव्य आहे. मात्र, जमीन शासनाची असल्याने त्यांना शासनाच्या कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नव्हता. शासनाच्या जागेवरील ही घरे नियमित करण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज केले होते. या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनेही झाली आहेत. मात्र, केवळ आश्वासनाच्या पलीकडे यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे यासंदर्भात थेट उच्च न्यायालयात येथील रहिवासी संजय मोरे, डी.जे. बक्षी, बाळाराम पागी, सुधाकर उपाध्याय, वसव, काशिराम चौधरी, विष्णू कायडी, रवी भालेराव, नारायण शेट्टी यांच्यासह इतर रहिवाशांनी धाव घेतली होती. न्यायालयाने हे प्रकरण कोकण विभागीय आयुक्तांकडे वर्ग केले. त्यानंतर, हे रहिवासी जर १९९५ पूर्वीचे असतील, तर त्यांचा विचार केला जावा, किंबहुना त्यांनी पुरावे सादर करावेत, असे सांगण्यात आले होते. तसेच १९९५ नंतरचे बांधकाम असेल तर त्यावर कारवाई केली जाईल, असेही संबंधित विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार, तसे पुरावे सादर केल्याने या रहिवाशांच्या अर्जाचा विचार करून त्यानुसार पुढील कार्यवाही करावी, असे आदेश कोकण विभागीय अतिरिक्त आयुक्तांनी दिल्याची माहिती संजय मोरे यांनी दिली. (प्रतिनिधी)>हक्काचा निवारा मिळणारयासंदर्भात येथील रहिवाशांना खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर, पालकमंत्र्यांनी फोनद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून रहिवाशांच्या अर्जावर तत्काळ नियमानुसार अंमलबजावणी करावी, असे सांगितल्याची माहिती मोरे यांनी दिली. त्यानुसार, आता येथील रहिवाशांना त्याच ठिकाणी हक्काचा निवारा मिळणार आहे.