शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांकडून होणार कोट्यवधींची वसुली ?

By admin | Updated: September 16, 2015 01:02 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या १ हजार ५९६ कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानीत दोषी आढळल्यास तत्कालीन संचालक मंडळातील दिग्गज नेत्यांवर कारवाई होऊ शकते.

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या १ हजार ५९६ कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानीत दोषी आढळल्यास तत्कालीन संचालक मंडळातील दिग्गज नेत्यांवर कारवाई होऊ शकते. ज्यांच्याविरोधात आरोप आहेत ते दोषी आढळल्यास त्यांच्याकडून तोट्याची वसुली होऊ शकते. तसेच त्यांना सहकार क्षेत्रातील निवडणुका लढविण्यास सहा वर्षे प्रतिबंध करण्यात येऊ शकतो.राज्य शिखर बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अतिरिक्त सहकार आयुक्त शिवाजीपाहिनकर यांनी बँकेच्या संचालक मंडळाचे तत्कालीन सदस्य असणाऱ्या नेत्यांना आरोपपत्र पाठविले आहे. या प्रकरणाची सुनावणी २८ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, सर्वांना उलट तपासणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)निष्क्रियतेवर ताशेरेमहाराष्ट्र सहकार कायद्यांतर्गत चौकशी अधिकाऱ्याला न्यायालयाप्रमाणे अधिकार आहेत. त्यामुळे त्याला केवळ मुंबई उच्च न्यायालयातच आव्हान देता येऊ शकते. महाराष्ट्र सहकार आयुक्तांनी दिलेल्या अहवालात बँकेतील अनियमितता आणि १ हजार ५९६ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान याबद्दल तत्कालीन संचालक मंडळाच्या निर्णय, कृती आणि निष्क्रियता यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. साखर कारखान्यांवर वरदहस्त संचालक मंडळाने पाच वर्षांच्या काळात राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने व सूतगिरण्यांना नियम डावलून कर्ज दिले आहेत. जवळपास ८ कारखान्यांना वितरित केलेले २९६ कोटी रुपयांचे कर्जही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. यामध्ये नंदुरबारमधील सातपुडा कारखान्याकडे १२९ कोटी, नांदेडमधील जयवंत पाटील कारखान्याला २८.५४ कोटी, स्वामी समर्थला ६.४४ कोटी, संत भोगावती ३.९९ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. नियमबाह्य कर्जवाटपतत्कालीन संचालक मंडळावर एकूण १० आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यात साखर कारखाने आणि सूत गिरण्यांना कर्ज देताना नाबार्डच्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करून नियमबाह्य कर्जवाटप करणे, विनातारण व अपात्र संस्थांना कर्जपुरवठा करणे आदी आरोपांचा समावेश आहे.दोषींवर तीन महिन्यांत फौजदारी गुन्हेसहकार कायद्याच्या कलम ८८नुसार राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याची चौकशी सुरू झाली असून, जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता ज्या ७७ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. त्याची सुनावणी पुढील तीन महिन्यांत पूर्ण करून फौजदारी गुन्हे दाखल करू.- चंद्रकांत पाटील, सहकार मंत्रीसंचालकनिहाय नुकसानीची निश्चित केलेली जबाबदारी ...नाव ..........रक्कमअजित पवार २३,५६,४९,६१४विजयसिंह मोहिते पाटील५,६१,९०,६०६हसन मुश्रीफ१,७४,५१,०८३पांडुरंग फुंडकर४,२८,८४,८००आनंदराव आडसूळ२०,८५,५८,०९३माणिकराव कोकाटे४,२८,८४,८००मधुकर चव्हाण२०,३५,२२,६२९यशवंतराव गडाख६,८१,६०,८५९विजय वडेट्टीवार४,२८,८४,८००दिलीपराव सोपल१,७६,५१,०८३हसन मुश्रीफ१,७४,५१,०८३मदन पाटील १७,३२,५७,७५९जगन्नाथ पाटील१९,४७,२४,०९६जयवंतराव आवळे१६,१९,१९,८८२रामप्रसाद बोर्डीकर३,७९,२९,८२०राजेंद्र शिंगणे१६२४४४७९८रजनीताई पाटील३,६०,३६,५७६चंद्रशेखर घुले पाटील७५,३२,०७०जयंत पाटील२२,१२,५५,१९७मीनाक्षी पाटील१,१९,८६,६९४विलासराव जगताप४,२८,८४,८००देवीदास पिंगळे१९,८६,१२,७०७गुलाबराव शेळके२०,१६,८९,२४६माणिकराव पाटील२,४६,४९,९९१अमरसिंह पंडित४,२८,८४,८००शिवाजी नलावडे३,३९,०८,८५४डॉ. वसंत पवार २६,६२,०३०सदाशिव मंडलिक१५,८०,७४०राजन तेली४,२८,८४,८००राहुल मोटे४,२८,८४,८००राजवर्धन कदमबांडे२,४६,४७,४२९पृथ्वीराज देशमुख१९,९५,६८,२२८प्रसाद तनपुरे१,९६,३२,९१०बाळासाहेब सरनाईक२४ कोटी ६४ लाख