शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

नायब तहसीलदारांना मृत्युपूर्व बयाणाच्या कामातून मुक्त करा!

By admin | Updated: August 4, 2016 23:53 IST

तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेचे शासनाला साकडे.

संतोष येलकरअकोला, दि. ४- राज्यात महसूल विभागांतर्गत नायब तहसीलदारांकडे आधीच भरपूर कामांचा व्याप असताना, मृत्युपूर्व बयाण घेण्याच्या कामात वेळ द्यावा लागतो. त्यामुळे मृत्युपूर्व बयाण घेण्याच्या कामातून नायब तहसीलदारांना मुक्त करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने शासनाला साकडे घातले आहे.महसूल विभागांतर्गत राज्यातील तहसीलदारांना गौण खनिज, शासनामार्फत उपलब्ध होणारे विविध प्रकारचे अनुदान वाटप, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, राजशिष्टाचार, निवडणुका, कायदा व सुव्यवस्था, महसूल प्रकरणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दाखले वाटप अशी विविध प्रकारची कामे करावी लागतात. त्यातच मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याचे कामदेखील नायब तहसीलदारांना करावे लागत आहे. महसूल विभागांतर्गत विविध प्रकारची कामे करताना मृत्यू बयाण नोंदविण्याच्या कामासाठी वेळ देणे कठीण होते. त्यामुळे राज्यातील नायब तहसीलदारांकडून मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याचे काम काढून टाकण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने शासनाकडे करण्यात येत आहे. येत्या आठवडाभरात यासंदर्भात शासनाच्या महसूल व गृह विभागाकडे संघटनेच्यावतीने निवेदन दिले जाणार आहे.मृत्युपूर्व बयाणाचे काम विशेष कार्यकारी दंडाधिका-यांकडे द्या!मृत्यू बयाण नोंदविण्याचे काम नायब तहसीलदारांकडून काढण्यात यावे. या कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकार्‍यांची नेमणूक करून, त्यांच्याकडून मृत्यू बयाण नोंदविण्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेमार्फत शासनाकडे करण्यात येत आहे.------"नायब तहसीलदारांना विविध प्रकारची कामे करावी लागतात. त्यामध्येच मृत्युपूर्व बयाण घेण्याच्या कामासाठी नायब तहसीलदारांना वेळ देणे कठीण होते. त्यामुळे मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याच्या कामातून नायब तहसीलदारांना मुक्त करण्यात यावे आणि मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याच्या कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकार्‍यांची नेमणूक करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे."-सुरेश बगळेअध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटना