शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘ती’ची हत्या झाल्याचा नातेवाइकांचा आरोप

By admin | Updated: March 16, 2015 03:20 IST

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अडीच वर्षीय ऋतुजा दुरकर हिचा शनिवारी तिच्याच घराजवळ मृतदेह आढळून आला.

मुंबई : मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अडीच वर्षीय ऋतुजा दुरकर हिचा शनिवारी तिच्याच घराजवळ मृतदेह आढळून आला. याबाबत ट्रॉम्बे पोलिसांनी घटनेची नोंद अपघाती मृत्यू अशी केली आहे. मात्र हा अपघात नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.महाराष्ट्र नगरातील शिवप्रेरणा चाळीत राहणारी ही चिमुरडी गुरुवारी सायंकाळी घराबाहेर खेळत होती. मात्र, बराच वेळ होऊनदेखील ती घरी न परतल्याने तिच्या आई-वडिलांनी तिचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठत अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस या मुलीचा शोध घेत असतानाच शनिवारी सकाळी पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना तिच्या घराशेजारील गटारात मृतदेह आढळून आला. ट्रॉम्बे पोलिसांना ही बाब समजताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक माहितीमध्ये तिचा मृत्यू गटारात पडूनच झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)