शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

निलंबन रद्द करण्यास नकार

By admin | Updated: March 30, 2017 03:36 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या आठवड्यातही विधानसभेत विरोधकांचा बहिष्कार कायम

अतुल कुलकर्णी / मुंबई शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या आठवड्यातही विधानसभेत विरोधकांचा बहिष्कार कायम राहिला. बुधवारी विधानसभेच्या विरोधकांनी कामकाजाकडे पाठ फिरवत काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, रिपाइं (कवाडे गट), युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष आणि एमआयएमच्या सदस्यांनी कर्जमाफीसाठीच्या संघर्ष यात्रेत सहभागी होण्यासाठी आपला मोर्चा चंद्रपूरकडे वळवला. दरम्यान, कर्जमाफीवरून सभागृहात गोंधळ घालणाऱ्या १९ आमदारांचे निलंबन झाल्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला होता. पण त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल असे आश्वासन मी दिलेले नव्हते, आम्ही सकारात्मक आहोत, एवढेच मी म्हणालो होतो. निलंबन दोन टप्प्यांत मागे घेतले जाईल. एकाचवेळी मागे घेतले जाणार नाही, असे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. विरोधकांची मागणी एकाचवेळी मागे घेण्याची आहे त्याचे काय? असे विचारले असता बापट यांनी त्यास स्पष्ट नकार दिला.दरम्यान, विधान परिषदेत विरोधकांनी कामकाजात सहभाग घेतला. जर कामाकाजात सहभागी व्हायचेच होते तर मग दोन आठवडे कामकाज का बंद पाडले? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारला असता ते म्हणाले, संघर्ष यात्रेचा आराखडा ठरवण्यासाठी झालेल्या सर्व विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीतच असे ठरले होते. विधानसभेच्या सदस्यांनी संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे आणि विधानपरिषदेच्या सदस्यांनी सरकारला कामकाजात जाब विचारावा म्हणून आम्ही आज सहभागी झालो आहोत.मात्र विरोधकांनी एकदम बहिष्कार शस्त्र म्यान करण्यामागे दोन कथा आज विधानभवनात रंगल्या होत्या. त्यातली पहिली होती ती सभापती आणि मुख्यमंत्र्यांचे बोलणे झाल्याने आणि सरकारने सभापतींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामार्फत दबाव आणला. त्यातून विरोधक शांत झाले. तर दुसरी कथा आमदारांच्या दबावाची सांगितली जाते. विधान परिषदेच्या आमदारांना त्यांचे स्वत:चे अनेक प्रश्न कामकाजात मांडायचे आहेत, सभागृह चालतच नसल्याने त्यांचे प्रश्न पडून आहेत. त्यामुळे काही करून सभागृह चालू द्या असा दबाव त्यांनी सभापतींवर आणला. मुख्यमंत्र्यांची कबुली आणि विरोधकांचे आभारराज्यात सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर जिल्हा बँकांचे नुकसान होईल, विविध सेवा सोसायट्या, पतसंस्थाही अडचणीत येतील असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. याआधी तुम्हीच म्हणत होता की कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचा नाही तर बँकांचा फायदा होतोय, आणि आज तुम्हीच म्हणत आहात की यामुळे बँकांचे नुकसान होत आहे. बरे झाले उशिरा का होईना तुम्ही बँकांचे नुकसान होत आहे हे मान्य केले... त्यावर परिषदेत काही काळ जोरदार खडाजंगी रंगली.