शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

मजबुतीकरण दहा वर्षे रखडले

By admin | Updated: August 10, 2016 01:04 IST

मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणाचे मजबुतीकरणाचे काम गेल्या 10 वर्षांपासून रखडले आहे.

पवनानगर : मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणाचे मजबुतीकरणाचे काम गेल्या 10 वर्षांपासून रखडले आहे. धरण उभारणीस ४१ वर्षे उलटून गेली, तरी पवना धरणग्रस्तांचे पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे धरण मजबुतीकरणास किती कालावधी लागेल, धरणाच्या सुरक्षेचे काय, टेमघर धरणासारखी गळती लागल्यानंतर किंवा धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झाल्यावर लक्ष देणार का, असे असे प्रश्न उपस्थित होत आहेत.तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत पाटबंधारेच्या अनेक योजना राबविण्यात आल्या. मावळ तालुक्यातील शेती, पिण्याचे पाणी व पिंपरी-चिंचवड, औद्योगिक वसाहतीसाठी पाणी आवश्यक असल्याने पवना धरण योजना आखण्यात आली. धरणाचे बांधकाम १९६३ मध्ये सुरू होऊन १९७२ला पूर्ण झाले. धरणाची लांबी ५५७७ फूट आहे, तर उंची ११९ फूट आहे. यात मातीचा बांध ४६२७, तर दगडी सिमेंट बांधकाम ९५० फूट लांबीचे आहे. धरणात १०,७४३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. या धरणातील पाणीसाठा पाहता पाणीगळती होऊ नये व बंधारा सुरक्षित राहावा यासाठी मजबुतीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी २००४ मध्ये धरणाच्या मजबुतीकरणासाठी २२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. धरणग्रस्तांचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही. तोपर्यंत काम मार्गी लागेल, असे सध्या तरी दिसत नाही. काम पूर्ण झाल्यावर पाणीवाढ होईल व त्यातून शासनाचे उत्पन्न वाढेल. शासनाच्या धोरणानुसार हे काम २००७ पर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, पवना धरणातून बंद जलवाहिनी नेण्याच्या अट्टहासात मजबुतीकरणाच्या कामाकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. या बाबत पुणे जिल्हा कृषी उत्पादन समितीचे माजी सभापती व बंद जलवाहिनी आंदोलनाचे नेते एकनाथ टिळे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने बंद जलवाहिनीचा हट्ट सोडून प्रथम धरणग्रस्ताच्या मुलांना महापालिकेत नोकऱ्या देण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे धरणग्रस्तांची एक मागणी पूर्ण होईल व राज्य सरकारने लवकरच पुनर्वसनाचा प्रश्न सोडवून पवना धरणाचा संभाव्य धोका टाळावा. २३ जानेवारी २०१० रोजी ‘लोकमत’ने पाच वर्षांपासून रखडले पवना धरणाचे मजबुतीकरण हे वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र तत्कालीन सरकारने मजबुतीकरणाकडे कानाडोळा केला. (वार्ताहर)