शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

माळीण दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन रखडणार

By admin | Updated: April 23, 2015 05:03 IST

माळीण दुर्घटनेला तब्बल ९ महिने उलटूनही येथील ग्रामस्थांचा वनवास अद्याप संपला नाही. दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला घरकुलासाठी ५ लाख रुपयांच्या खर्चाचा आराखडा जिल्हा

सुषमा नेहरकर, पुणेमाळीण दुर्घटनेला तब्बल ९ महिने उलटूनही येथील ग्रामस्थांचा वनवास अद्याप संपला नाही. दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला घरकुलासाठी ५ लाख रुपयांच्या खर्चाचा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केला आहे. मात्र, शासनाने केवळ २ लाख रुपयांनाच मान्यता दिली आहे. त्यामुळे माळीण गावचे पुनर्वसन रखडणार आहे. पावसाळ्याआधी पुनर्वसन झाले नाही तर ग्रामस्थांचे हाल होणार आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने याची चुणूक दाखविली आहे. विशेष म्हणजे माळीण दुर्घटनेनंतर मदतीचा आणि निधीचा ओघ सुरू झाला होता. अनेक संस्था आणि कंपन्यांनी मदतीची तयारीही दर्शविली आहे. मात्र, हा निधी घेण्यास अद्याप सरकारने परवानगी दिलेली नाही. या निधीमध्येही संपूर्ण गावाचे पुनर्वसन होणे शक्य आहे. सध्या दुर्घटनाग्रस्त ७९ कुटुंबांचे अडिवरे आणि कशाळवाडी येथे तात्पुरते पत्र्यांच्या शेड टाकून पुनर्वसन करण्यात आले आहे. माळीणपासून दोन कि. म.वरील आंमडे गावांत दुर्घटनाग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी आठ एकर जमीन संपादीत करण्यात येणार आहे. पुनर्वसनासाठी ही जागा सुरंक्षित असल्याचा अहवाल जीएसआयने दिला आहे.माळीणच्या ७९ दुर्घटनाग्रस्त कुटुंबाचे शासनाच्या वतीने पुनर्वसन करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला ४९१ चौरस फुटाचे घर बांधून देण्यात येणार आहे. घरांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शासनाला पाठविण्यात आला आहे. विशेष बाब म्हणून पाच लाखांच्या घरकुलाला मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाला पाठविला आहे. याशिवाय सुमारे १८ प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागा मार्फत दहा कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. परंतु अद्याप जिल्हा प्रशासनाला हा निधी मिळालेला नसल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले.