शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

माळीण दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन रखडणार

By admin | Updated: April 23, 2015 05:03 IST

माळीण दुर्घटनेला तब्बल ९ महिने उलटूनही येथील ग्रामस्थांचा वनवास अद्याप संपला नाही. दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला घरकुलासाठी ५ लाख रुपयांच्या खर्चाचा आराखडा जिल्हा

सुषमा नेहरकर, पुणेमाळीण दुर्घटनेला तब्बल ९ महिने उलटूनही येथील ग्रामस्थांचा वनवास अद्याप संपला नाही. दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला घरकुलासाठी ५ लाख रुपयांच्या खर्चाचा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केला आहे. मात्र, शासनाने केवळ २ लाख रुपयांनाच मान्यता दिली आहे. त्यामुळे माळीण गावचे पुनर्वसन रखडणार आहे. पावसाळ्याआधी पुनर्वसन झाले नाही तर ग्रामस्थांचे हाल होणार आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने याची चुणूक दाखविली आहे. विशेष म्हणजे माळीण दुर्घटनेनंतर मदतीचा आणि निधीचा ओघ सुरू झाला होता. अनेक संस्था आणि कंपन्यांनी मदतीची तयारीही दर्शविली आहे. मात्र, हा निधी घेण्यास अद्याप सरकारने परवानगी दिलेली नाही. या निधीमध्येही संपूर्ण गावाचे पुनर्वसन होणे शक्य आहे. सध्या दुर्घटनाग्रस्त ७९ कुटुंबांचे अडिवरे आणि कशाळवाडी येथे तात्पुरते पत्र्यांच्या शेड टाकून पुनर्वसन करण्यात आले आहे. माळीणपासून दोन कि. म.वरील आंमडे गावांत दुर्घटनाग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी आठ एकर जमीन संपादीत करण्यात येणार आहे. पुनर्वसनासाठी ही जागा सुरंक्षित असल्याचा अहवाल जीएसआयने दिला आहे.माळीणच्या ७९ दुर्घटनाग्रस्त कुटुंबाचे शासनाच्या वतीने पुनर्वसन करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला ४९१ चौरस फुटाचे घर बांधून देण्यात येणार आहे. घरांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शासनाला पाठविण्यात आला आहे. विशेष बाब म्हणून पाच लाखांच्या घरकुलाला मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाला पाठविला आहे. याशिवाय सुमारे १८ प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागा मार्फत दहा कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. परंतु अद्याप जिल्हा प्रशासनाला हा निधी मिळालेला नसल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले.