शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

दारू कारखान्यांचे पाणी बंद करण्यास नकार

By admin | Updated: May 25, 2016 03:55 IST

दुष्काळग्रस्त भागात पाणी वळते करण्यास दारू कारखाने व डिस्टिलरींना केला जाणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्याचा आदेश राज्य सरकारला देण्यास सुप्रीम कोर्टाने मंगळवारी नकार दिला.

नवी दिल्ली : दुष्काळग्रस्त भागात पाणी वळते करण्यास दारू कारखाने व डिस्टिलरींना केला जाणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्याचा आदेश राज्य सरकारला देण्यास सुप्रीम कोर्टाने मंगळवारी नकार दिला. न्या. पी.सी. पंत आणि डी.वाय. चंद्रचूड यांच्या अवकाशकालीन खंडपीठाने दारू कारखान्यांचा पाणीपुरवठा पूर्णपणे (१०० टक्के) बंद करण्याची मागणी करणारे याचिकाकर्ते संजय भास्करराव काळे यांची चांगलीच कानउघाडणी केली. आम्ही अशा प्रकारचा आदेश राज्य सरकारला देऊ शकत नाही. ते शक्य नसताना याचिकाकर्त्याने केवळ प्रसिद्धीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याआधीच अंतरिम आदेश दिला असताना तुम्ही त्या आदेशाविरुद्ध आमच्याकडे का आलात? उच्च न्यायालयाने ६० टक्के पाणीकपातीचा आदेश दिला आहे. तुम्हाला आता काय हवे आहे, असा सवालही खंडपीठाने केला. हा धोरणात्मक निर्णय असून, त्याबाबत संतुलन राखायला हवे, असेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.