शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत पाणी सोडण्याबाबत फेरविचार करावा

By admin | Updated: November 11, 2015 02:50 IST

उजनी धरणात ६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, तसेच सोलापूर जिल्ह्णात तीव्र पाणीटंचाई नाही. अशावेळी पुणे जिल्ह्णातील भामा आसखेड, चासकमान, आंद्रा आणि मुळशी धरणांतून

पुणे : उजनी धरणात ६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, तसेच सोलापूर जिल्ह्णात तीव्र पाणीटंचाई नाही. अशावेळी पुणे जिल्ह्णातील भामा आसखेड, चासकमान, आंद्रा आणि मुळशी धरणांतून १० टीएमसी पाणी सोडल्यास कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने यासंदर्भात फेरविचार करावा, असे पत्र जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले आहे.१८ नोव्हेंबरपूर्वी पोलीस बंदोबस्ताअभावी कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडता येणार नाही, असेही त्यांनी पत्रात कळविले आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे विभागातील चासकमान धरणातून ३ टीएमसी, भामा आसखेडमधून ४, आंद्रा २ आणि मुळशी धरणातून १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय दिला आहे. सध्या उजनी धरणामध्ये ५३ टीएमसी मृत साठा व १३ टीएमसी उपयुक्त साठा असे एकूण ६७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. भामा आसखेड, चासकमान, आंद्र्रा आणि मुळशी धरणांत मिळून केवळ ४३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे या धरणांतून १० टीएमसी पाणी सोडल्यास ३० ते ४० टक्के पाणीसाठा कमी होणार आहे. याचा जिल्ह्णातील पिण्याचे पाणी व शेतीवर मोठा परिणाम होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे. उजनीत पाणी सोडण्यास खेड, शिरुर, आंबेगाव, मुळशी तालुक्यातून मोठा विरोध आहे. शिरुरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी प्राधिकरणाच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेल्या नसल्याने पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी पाचर्णे यांनी केली, तर खेडचे आमदार सुरेश गोरे यांनीही धरणातून पाणी सोडण्यास विरोध केला आहे. चासकमानमधून ३ टीएमसी पाणी सोडल्यास केवळ ३ टीएमसी पाणी शिल्लक राहील. त्यामुळे उन्हाळी दोन आवर्तने देता येणार नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र पाठविले आहे.