शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

उजनीत पाणी सोडण्याबाबत फेरविचार करावा

By admin | Updated: November 11, 2015 02:50 IST

उजनी धरणात ६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, तसेच सोलापूर जिल्ह्णात तीव्र पाणीटंचाई नाही. अशावेळी पुणे जिल्ह्णातील भामा आसखेड, चासकमान, आंद्रा आणि मुळशी धरणांतून

पुणे : उजनी धरणात ६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, तसेच सोलापूर जिल्ह्णात तीव्र पाणीटंचाई नाही. अशावेळी पुणे जिल्ह्णातील भामा आसखेड, चासकमान, आंद्रा आणि मुळशी धरणांतून १० टीएमसी पाणी सोडल्यास कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने यासंदर्भात फेरविचार करावा, असे पत्र जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले आहे.१८ नोव्हेंबरपूर्वी पोलीस बंदोबस्ताअभावी कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडता येणार नाही, असेही त्यांनी पत्रात कळविले आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे विभागातील चासकमान धरणातून ३ टीएमसी, भामा आसखेडमधून ४, आंद्रा २ आणि मुळशी धरणातून १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय दिला आहे. सध्या उजनी धरणामध्ये ५३ टीएमसी मृत साठा व १३ टीएमसी उपयुक्त साठा असे एकूण ६७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. भामा आसखेड, चासकमान, आंद्र्रा आणि मुळशी धरणांत मिळून केवळ ४३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे या धरणांतून १० टीएमसी पाणी सोडल्यास ३० ते ४० टक्के पाणीसाठा कमी होणार आहे. याचा जिल्ह्णातील पिण्याचे पाणी व शेतीवर मोठा परिणाम होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे. उजनीत पाणी सोडण्यास खेड, शिरुर, आंबेगाव, मुळशी तालुक्यातून मोठा विरोध आहे. शिरुरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी प्राधिकरणाच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेल्या नसल्याने पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी पाचर्णे यांनी केली, तर खेडचे आमदार सुरेश गोरे यांनीही धरणातून पाणी सोडण्यास विरोध केला आहे. चासकमानमधून ३ टीएमसी पाणी सोडल्यास केवळ ३ टीएमसी पाणी शिल्लक राहील. त्यामुळे उन्हाळी दोन आवर्तने देता येणार नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र पाठविले आहे.