शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

उजनीत पाणी सोडण्याबाबत फेरविचार करावा

By admin | Updated: November 11, 2015 02:50 IST

उजनी धरणात ६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, तसेच सोलापूर जिल्ह्णात तीव्र पाणीटंचाई नाही. अशावेळी पुणे जिल्ह्णातील भामा आसखेड, चासकमान, आंद्रा आणि मुळशी धरणांतून

पुणे : उजनी धरणात ६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, तसेच सोलापूर जिल्ह्णात तीव्र पाणीटंचाई नाही. अशावेळी पुणे जिल्ह्णातील भामा आसखेड, चासकमान, आंद्रा आणि मुळशी धरणांतून १० टीएमसी पाणी सोडल्यास कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने यासंदर्भात फेरविचार करावा, असे पत्र जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले आहे.१८ नोव्हेंबरपूर्वी पोलीस बंदोबस्ताअभावी कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडता येणार नाही, असेही त्यांनी पत्रात कळविले आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे विभागातील चासकमान धरणातून ३ टीएमसी, भामा आसखेडमधून ४, आंद्रा २ आणि मुळशी धरणातून १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय दिला आहे. सध्या उजनी धरणामध्ये ५३ टीएमसी मृत साठा व १३ टीएमसी उपयुक्त साठा असे एकूण ६७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. भामा आसखेड, चासकमान, आंद्र्रा आणि मुळशी धरणांत मिळून केवळ ४३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे या धरणांतून १० टीएमसी पाणी सोडल्यास ३० ते ४० टक्के पाणीसाठा कमी होणार आहे. याचा जिल्ह्णातील पिण्याचे पाणी व शेतीवर मोठा परिणाम होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे. उजनीत पाणी सोडण्यास खेड, शिरुर, आंबेगाव, मुळशी तालुक्यातून मोठा विरोध आहे. शिरुरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी प्राधिकरणाच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेल्या नसल्याने पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी पाचर्णे यांनी केली, तर खेडचे आमदार सुरेश गोरे यांनीही धरणातून पाणी सोडण्यास विरोध केला आहे. चासकमानमधून ३ टीएमसी पाणी सोडल्यास केवळ ३ टीएमसी पाणी शिल्लक राहील. त्यामुळे उन्हाळी दोन आवर्तने देता येणार नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र पाठविले आहे.