शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

रिफायनरी एक सुवर्णसंधी : कोकण करणार भारताचे प्रतिनिधीत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:44 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-नाणार येथे होऊ घातलेल्या भारतातील सर्वात मोठ्या रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल्स प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या मनात असलेले समज-गैरसमज दूर करण्याच्यादृष्टीने रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल्स कंपनीच्यावतीने नाणारवासीय

ठळक मुद्देरिफायनरीची गरज --युरो ६ इंधनाची होणार निर्मिती इंधन तुटवडा, वाढत्या महागाईवर पर्याय

महेश सरनाईक ।

रिफायनरी एक सुवर्णसंधी - भाग १रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-नाणार येथे होऊ घातलेल्या भारतातील सर्वात मोठ्या रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल्स प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या मनात असलेले समज-गैरसमज दूर करण्याच्यादृष्टीने रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल्स कंपनीच्यावतीने नाणारवासीय ग्रामस्थ, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी आणि अधिकारी यांचा संयुक्त अभ्यास दौरा हरियाणा राज्यातील पानिपत रिफायनरी येथे पार पडला. या अभ्यासात प्रत्यक्ष पाहणीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘रिफायनरी एक सुवर्णसंधी’ अशी मालिका देत आहोत.सिंधुदुर्ग : आपल्या देशाला २0२५ सालापर्यंत साधारपणपणे १५0 मिली मेट्रीक टन पेट्रोलियम पदार्थांची गरज भासणार आहे. त्यातील ६0 मिली मेट्रीक टन पेट्रोलियम इंधन बनविण्यासाठी नाणार येथे रिफायनरी प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे देशाला लागणाऱ्या इंधन निर्मितीमधील एक तृतीयांश इंधन निर्मिती होणार असल्याने कोकणाने जसे आजपर्यंत विविध पातळीवर राज्यासह, देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे तशीच काहीशी संधी नाणार रिफायनरी प्रकल्पातून मिळणार आहे.

रिफायनरी प्रकल्प होताना प्रामुख्याने त्याचे दोन भागात रूपांतर होणार आहे. त्यातील एक भाग आहे पेट्रोलियम पदार्थापासून इंधन निर्मिती. तर दुसरा भाग आहे पेट्रोकेमिकल्स म्हणजे इतर उद्योगांना लागणारी साधनसामुग्री. त्यातील पहिला भाग म्हणजे पेट्रोलियम पदार्थ. रिफायनरी प्रकल्पाची निर्मिती होताना पेट्रोलियम पदार्थ हा तिचा भाग अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पेट्रोलियम पदार्थ निर्मितीमध्ये इंधन म्हणून वापर करणारे पेट्रोल, डिझेल, रेल्वेसाठीचे इंधन डिझेल, जहाजामध्ये लागणारे इंधन तसेच विमानांसाठी लागणारे एटीएफ (एव्हीएशन टर्बाईन फ्ल्यूएल), वीज निर्मितीसाठी नाफ्ता, बॉयलरसाठीचा नाफ्ता आदींची निर्मिती करण्यात येणार आहे.

त्याचबरोबरीने एल.पी.जी (घरगुती गॅस) तयार होणार आहे. केंद्रशासनाच्या उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत देशभरात ९ कोटी घरांना घरगुती गॅस पुरविण्याचा मानस आहे. गेल्या चार वर्षांत ३ कोटी घरांना याची पूर्तता झाली आहे. त्यामुळे अजूनही ६ कोटी घरांना हा गॅस तातडीने देण्याची गरज आहे. याचा अर्थ ६ कोटी घरांमध्ये अद्यापही लाकडाचे सरपण वापरले जाते. या सरपणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. या प्रकल्पातून गॅसची निर्मिती करताना आपण सध्या सुरू असलेली वृक्षतोडही थांबवू शकणार आहोत.

युरो ६ इंधनाची होणार निर्मितीभारताप्रमाणेच जगभरात सर्वच ठिकाणी युरो ४ मानांकनाचे इंधन वापरले जाते. युरो ३ मध्ये १५० टक्के कार्बनचे प्रमाण पकडल्यास युरो ६ मध्ये ते प्रमाण १0 टक्क्यांवर येणार आहे. रिफायनरीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार युरो ६ मानांकनाच्या इंधनाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणावर रोख लावला जाईल. त्यामुळे भारतात होणारे प्रदूषण व जागतिक तापमान वाढ रोखण्यासही मदत होणार आहे. कारण युरो ६ च्या पेट्रोलियम उत्पादनातून हवेत मिसळणाºया आणि प्रदूषणाला धोका पोहोचविणाºया कार्बनचे विसर्जन फार कमी प्रमाणात होणार आहे.

(क्रमश:) (पुढील भागात उद्योगधंद्यांच्या हबची होणार निर्मिती)

जलमार्ग फायदेशीरया प्रकल्पासाठी लागणारे क्रूड आॅईल सौदी अरेबियाकडून मिळणार आहे. यासाठी सागरी मार्गाचा वापर होणार आहे. त्यामुळे विजयदुर्ग बंदराचा विकास होणार असून यातून या जेटीला आणि तेथील आजूबाजूच्या परिसरातील लोकांना मोठा रोजगार प्राप्त होणार आहे.

हरियाणा राज्यातील पानिपत रिफायनरीच्या अभ्यास दौऱ्यासाठी शेतकरी, बागायदार, पत्रकार, मिडिया प्रतिनीधी यांची टीम.

टॅग्स :konkanकोकण