शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत पाण्याचा पुनर्वापर

By admin | Updated: June 2, 2016 00:43 IST

रेल्वेच्या गाड्या, लोहमार्ग, स्थानक तसेच स्वच्छतागृहांसाठी वापरल्या जाणारे शुद्ध करून ते पुन्हा वापरले जाणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दोन मैलापाणी शुद्धीकरण

पुणे : रेल्वेच्या गाड्या, लोहमार्ग, स्थानक तसेच स्वच्छतागृहांसाठी वापरल्या जाणारे शुद्ध करून ते पुन्हा वापरले जाणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दोन मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असून या प्रकल्पांची क्षमता प्रतिदिन ३ लाख ५० हजार लिटरची आहे. त्यामुळे लाखो लिटर स्वच्छ पाण्याची बचत होणार आहे. रेल्वेच्या पुणे विभागाचे प्रबंधक बी. के. दादाभॉय यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी दादाभॉय यांनी गेल्या दोन वर्षांत रेल्वे प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेले प्रकल्प तसेच उपक्रमांची माहिती दिली.पुणे स्थानकासाठी दरदिवशी रेल्वे प्रशासनास सुमारे ५ लाख लिटर पाण्याची गरज भासते. हे पाणी रेल्वे घोरपडी येथे असलेली रेल्वेची विहीर, तसेच महापालिकेकडून घेतले जात होते. या पाण्यातील बहुतांश पाणी गाड्या तसेच ट्रॅक धुण्यासाठी जाते. हे पाणी नंतर वापरले जात नसल्याने हे सर्व पाणी नाल्यात वाहून जात होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे पाणी स्वच्छ करून पुन्हा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ मेटल डिटेक्टर म्हणजे सुरक्षा नाही या पत्रकार परिषदेत रेल्वे स्थानकातील बंद असलेले मेटल डिटेक्टर आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत विचारणा केली असता दादाभॉय यांनी हात झटकले, रेल्वे स्थानकावर मेटल डिटेक्टर चालू असेल तरच सुरक्षा असते का, स्थानकाचा परिसर सर्व बाजूंनी उघडा आहे. मग आम्ही काय तेवढेच काम करायचे का, अशा शब्दांत त्यांनी स्थानकाच्या सुरक्षेवरून हात झटकले. याशिवाय रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची सुरक्षा आणि प्रवाशांना होणारा त्रास आम्ही देत नाही. त्याची काळजी त्यांची त्यांनी घ्यावी, असे सांगत सुरक्षा तसेच स्वच्छतेचे खापर प्रवाशांवरच फोडले. एलईडी दिवे वाचविणार ५५ लाखांची वीजवीज बचत आणि पर्यावरणसंवर्धनासाठी रेल्वे मंत्रालयाकडून सर्व रेल्वे स्थानकांवर एलईडी बल्ब लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे विभागाने पुणे स्टेशन, तळेगाव तसेच शिवाजीनगर या स्थानकांवर एलईडी दिवे बसविले असून त्या माध्यमातून दर दिवशी १५ हजार रुपयांची वीज बचत होत आहे. वर्षाला ही रक्कम तब्बल ५५ लाखांची आहे. याशिवाय एका खासगी कंपनीच्या माध्यमातून पुणे स्टेशनवर सौरऊर्जेचे पॅनल बसविले जात असून त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर संपूर्ण स्थानक सौरऊर्जेवर चालणार असल्याचेही दादाभॉय यांनी सांगितले.मानवरहित अवघी दोन गेटपुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या रेल्वेच्या हद्दीत सुमारे १७० रेल्वे क्रॉसिंग गेट आहेत. त्यातील जवळपास १६ गेट मागील दोन वर्षांपर्यंत मानवरहित होती. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडत होते. त्यातील जवळपास १३ गेट विविध उपाययोजना करून बंद करण्यात आले असून आणखी २ गेट या वर्षभरात बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे विभाग रेल्वे गेटच्याबाबतीत पूर्णत: सुरक्षित होणार आहे.