शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

रेल्वेत पाण्याचा पुनर्वापर

By admin | Updated: June 2, 2016 00:43 IST

रेल्वेच्या गाड्या, लोहमार्ग, स्थानक तसेच स्वच्छतागृहांसाठी वापरल्या जाणारे शुद्ध करून ते पुन्हा वापरले जाणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दोन मैलापाणी शुद्धीकरण

पुणे : रेल्वेच्या गाड्या, लोहमार्ग, स्थानक तसेच स्वच्छतागृहांसाठी वापरल्या जाणारे शुद्ध करून ते पुन्हा वापरले जाणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दोन मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असून या प्रकल्पांची क्षमता प्रतिदिन ३ लाख ५० हजार लिटरची आहे. त्यामुळे लाखो लिटर स्वच्छ पाण्याची बचत होणार आहे. रेल्वेच्या पुणे विभागाचे प्रबंधक बी. के. दादाभॉय यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी दादाभॉय यांनी गेल्या दोन वर्षांत रेल्वे प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेले प्रकल्प तसेच उपक्रमांची माहिती दिली.पुणे स्थानकासाठी दरदिवशी रेल्वे प्रशासनास सुमारे ५ लाख लिटर पाण्याची गरज भासते. हे पाणी रेल्वे घोरपडी येथे असलेली रेल्वेची विहीर, तसेच महापालिकेकडून घेतले जात होते. या पाण्यातील बहुतांश पाणी गाड्या तसेच ट्रॅक धुण्यासाठी जाते. हे पाणी नंतर वापरले जात नसल्याने हे सर्व पाणी नाल्यात वाहून जात होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे पाणी स्वच्छ करून पुन्हा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ मेटल डिटेक्टर म्हणजे सुरक्षा नाही या पत्रकार परिषदेत रेल्वे स्थानकातील बंद असलेले मेटल डिटेक्टर आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत विचारणा केली असता दादाभॉय यांनी हात झटकले, रेल्वे स्थानकावर मेटल डिटेक्टर चालू असेल तरच सुरक्षा असते का, स्थानकाचा परिसर सर्व बाजूंनी उघडा आहे. मग आम्ही काय तेवढेच काम करायचे का, अशा शब्दांत त्यांनी स्थानकाच्या सुरक्षेवरून हात झटकले. याशिवाय रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची सुरक्षा आणि प्रवाशांना होणारा त्रास आम्ही देत नाही. त्याची काळजी त्यांची त्यांनी घ्यावी, असे सांगत सुरक्षा तसेच स्वच्छतेचे खापर प्रवाशांवरच फोडले. एलईडी दिवे वाचविणार ५५ लाखांची वीजवीज बचत आणि पर्यावरणसंवर्धनासाठी रेल्वे मंत्रालयाकडून सर्व रेल्वे स्थानकांवर एलईडी बल्ब लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे विभागाने पुणे स्टेशन, तळेगाव तसेच शिवाजीनगर या स्थानकांवर एलईडी दिवे बसविले असून त्या माध्यमातून दर दिवशी १५ हजार रुपयांची वीज बचत होत आहे. वर्षाला ही रक्कम तब्बल ५५ लाखांची आहे. याशिवाय एका खासगी कंपनीच्या माध्यमातून पुणे स्टेशनवर सौरऊर्जेचे पॅनल बसविले जात असून त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर संपूर्ण स्थानक सौरऊर्जेवर चालणार असल्याचेही दादाभॉय यांनी सांगितले.मानवरहित अवघी दोन गेटपुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या रेल्वेच्या हद्दीत सुमारे १७० रेल्वे क्रॉसिंग गेट आहेत. त्यातील जवळपास १६ गेट मागील दोन वर्षांपर्यंत मानवरहित होती. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडत होते. त्यातील जवळपास १३ गेट विविध उपाययोजना करून बंद करण्यात आले असून आणखी २ गेट या वर्षभरात बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे विभाग रेल्वे गेटच्याबाबतीत पूर्णत: सुरक्षित होणार आहे.