शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

दहावीचा रेकॉर्डब्रेक निकाल, राज्याचा निकाल ८८.३२ टक्के

By admin | Updated: June 17, 2014 13:09 IST

दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून राज्यातील ८८.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

ऑनलाइन टीम

पुणे, दि. १७- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून राज्यातील ८८.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीने नवा उच्चांक गाठल्याचे आकडा सर्वाधिक असल्याचे शिक्षण मंडळाच्या अधिका-यांनी सांगितले.
शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन १० वीचा निकाल जाहीर केला.  यंदा १० वीच्या परीक्षेत राज्यातील १३ लाख ८८ हजार विद्यार्थी बसले होते. बारावीच्या पाठोपाठ दहावीच्या निकालानेही यंदा उच्चांक गाठल्याचे मम्हाणे यांनी स्पष्ट केले. राज्याचा निकाल ८८.३२ टक्के लागल्याचे मम्हाणे यांनी जाहीर केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागानेच बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल ९५.५७ टक्के ऐवढा लागला असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. या विभागाचा निकाल ८१. ६८ टक्के लागला आहे. १०वीच्या परीक्षेतही मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात ९०.५५ टक्के मुली तर  ८६. ४७ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.  विद्यार्थ्यांना २६ जून रोजी दुपारी शाळांमार्फत गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार असून गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना २६ जून ते ५ जुलै याकालावधीपर्यंत अर्ज करता येणार आहे. 
 
विभागनिहाय निकाल
 
कोल्हापूर- ९३.८३ टक्के, औरंगाबाद-  ८७.०६ टक्के, नागपूर- ८२.९३ टक्के, पुणे- ९२.३५ टक्के, अमरावती - ८४.११ टक्के, कोकण - ९५.५७ टक्के, लातूर - ८१.६८ टक्के, नाशिक - ८९.१५ टक्के
 
ऑनलाइन निकाल या लिंकवर पाहता येईल
 
www.mahresult.nic.in
 
www.maharashtraeducation.com