शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

अग्निशमन जवानांना भरपाईचा पुनर्विचार करा

By admin | Updated: August 2, 2016 05:56 IST

मृत्युमुखी किंवा जखमी अग्निशमन दलाच्या जवानांना व त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याबाबत असलेल्या धोरणाचा पुनर्विचार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले.

मुंबई : कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना किंवा त्यांच्या कुुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या भरपाईच्या रकमेबाबत तसेच त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याबाबत असलेल्या धोरणाचा पुनर्विचार करा, असे निर्देश सोमवारी उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले.महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन सुरक्षा कायदा, २००६ व त्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचा आदेश राज्य सरकार व मुंबई महापालिकेला द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका डॉ. शर्मिला घुगे यांनी उच्च न्यायालयात केली आहे.संबंधित कायद्याचे पालन करताच मुंबईत गगनचुंबी इमारती उभारण्यात येत आहे. महापालिकांचा यावर अंकुश नाही. कायद्याचे पालन न केल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे गगनचुंबी इमारतींत राहणाऱ्यांवर व मालकांवर नियमांचे पालन न केल्याबद्दल कारवाई करण्याचा आदेश संबंधित प्रशासनाला द्या, अशी विनंती डॉ. घुगे यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे.गेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या जवानांसाठी महापालिकेकडे काय धोरण आहे? अशी विचारणा महापालिकेकडे केली होती.सोमवारी यासंदर्भात सुनावणी झाली. त्यात महापालिकेने न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले. ‘कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या जवानांना किमान १० लाख रुपये तर कमाल १८ लाख रुपये देण्यात येतात. मात्र मृत्युमुखी पडलेल्या जवानाच्या कुटुंबीयांतील एकाला नोकरी देण्याची तरतूद २००९च्या धोरणात नाही,’ असे महापालिकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.‘भरपाईत वाढ करण्याची आवश्यकता आहे. शहिदांच्या कुटुंबीयांतील एका सदस्याला नोकरी देण्याची तरतूद असली पाहिजे,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने महापालिकेला या धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) >रकमेत वाढ करण्याची आवश्यकता!‘२००९च्या धोरणावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. जवानांना नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची आवश्यकता आहे. तसेच शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबीयातील एका सदस्याला नोकरी देण्याची तरतूद धोरणात असली पाहिजे,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने महापालिकेला या धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले.