शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

पाली प्रवेशद्वारावरील कमान पुन्हा बांधा

By admin | Updated: October 8, 2016 02:20 IST

अनेक गावांमध्ये ही सीमा दर्शविण्यासाठी व शोभा वाढविण्यासाठी उंच आणि भव्य प्रवेशद्वार तयार केले जाते.

पाली : प्रत्येक गावाची एक सीमारेषा ठरलेली असते. अनेक गावांमध्ये ही सीमा दर्शविण्यासाठी व शोभा वाढविण्यासाठी उंच आणि भव्य प्रवेशद्वार तयार केले जाते. पाली गावच्या सीमेवर देखील अशाच प्रकारची भव्य दगडी कमान पाच दशकांपूर्वी उभारण्यात आली होती. परंतु आता फक्त त्याचे भग्न अवशेषच शिल्लक राहिले आहेत. तेव्हा ही कमान पुन्हा बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.बल्लाळेश्वराचे स्थान म्हणून पाली गाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. या गावच्या सीमेवर पाली-खोपोली रस्त्यावर उंबरवाडीनजीक १९६५-६७ मध्ये रायगड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब लिमये यांनी पुढाकार घेऊन प्रवेशव्दारावर भव्य दगडी नक्षीकाम के लेली कमान उभारली होते. त्यानंतर कित्येक वर्षे ही कमान पालीची शान राखत रु बाबात उभी होती. परंतु नागोठणे येथे जेव्हा आयपीसीएल (सध्याची रिलायन्स) कंपनीची उभारणी सुरू झाली तेव्हा यासाठी लागणारी साधने, यंत्रे ही मुंबई-पुणे मार्गे पालीवरून नेण्यात येऊ लागली. परिणामी या अजस्त्र वाहनांस या कमानीखालून जाता येत नव्हते. त्यामुळे नाइलाजास्तव ही कमान तोडावी लागली. सध्या याच्या उरलेल्या भागावर झाडे उगवली आहेत. त्यामुळे पालीच्या शिरपेचातील एक मोती निखळला. त्यानंतर ही कमान पुन्हा उभी करण्याचे स्वारस्य कोणीच दाखविले नाही. परिणामी आज ही कमान भग्नावस्थेत तशीच उभी आहे. ही कमान पुन्हा उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)>शिक्षणमहर्षी दादासाहेब लिमये १९६५-६७ ला जिल्हा परिषद अध्यक्ष असताना शासकीय खर्चाने ही कमान उभारण्यात आली होती. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. रोज असंख्य भाविक येथे येत असतात. इतर गावांमध्ये जसे प्रवेशद्वार त्या गावची शोभा वाढवित असते, त्याचप्रमाणे पाली गावासाठी पुन्हा भव्य प्रवेशद्वार उभारण्यात यावे. - रवींद्रनाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते, पाली