शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

काँग्रेसचे बंडखोर ससाणे यांची माघार

By admin | Updated: December 22, 2015 02:37 IST

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस बाकी असताना सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयंत ससाणे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली.

अहमदनगर/मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस बाकी असताना सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयंत ससाणे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत बैठक झाल्यानंतर ससाणे यांना माघार घेण्याचे आदेश काँग्रेसकडून देण्यात आले. पक्षादेश मानून आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे ससाणे यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मुंबईसह राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे नगरमध्ये पक्षाने मला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यातील राजकारणात काही राजकीय तडजोडी झाल्या. यात नगरची जागा राष्ट्रवादीला गेली. पक्षाला मानणारा कार्यकर्ता असल्याने या निवडणुकीतून माघार घेत आहे. राज्याच्या राजकारणात पक्षाने माझा वापर केला असेल तर ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे ससाणे शेवटी म्हणाले.नगरमधून काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला असला तरी मुंबईत काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद लाड हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. तर कोल्हापुरात काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या विरोधात विद्यमान आमदार महादेवराव महाडिक निवडणूक रिंगणात आहेत. महाडिक यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले असले, तरी भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इथे काँग्रेसमध्येच लढत होत आहे.