शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

काँग्रेसचे बंडखोर ससाणे यांची माघार

By admin | Updated: December 22, 2015 02:37 IST

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस बाकी असताना सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयंत ससाणे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली.

अहमदनगर/मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस बाकी असताना सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयंत ससाणे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत बैठक झाल्यानंतर ससाणे यांना माघार घेण्याचे आदेश काँग्रेसकडून देण्यात आले. पक्षादेश मानून आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे ससाणे यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मुंबईसह राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे नगरमध्ये पक्षाने मला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यातील राजकारणात काही राजकीय तडजोडी झाल्या. यात नगरची जागा राष्ट्रवादीला गेली. पक्षाला मानणारा कार्यकर्ता असल्याने या निवडणुकीतून माघार घेत आहे. राज्याच्या राजकारणात पक्षाने माझा वापर केला असेल तर ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे ससाणे शेवटी म्हणाले.नगरमधून काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला असला तरी मुंबईत काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद लाड हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. तर कोल्हापुरात काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या विरोधात विद्यमान आमदार महादेवराव महाडिक निवडणूक रिंगणात आहेत. महाडिक यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले असले, तरी भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इथे काँग्रेसमध्येच लढत होत आहे.