शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

गूढ मृत्यूला फुटली वाचा

By admin | Updated: February 13, 2016 23:47 IST

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक तरुण व्याख्याती विजया देशमुख हिच्या गूढ मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आता औपचारिक गुन्हा

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक तरुण व्याख्याती विजया देशमुख हिच्या गूढ मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आता औपचारिक गुन्हा नोंदवून येत्या सहा महिन्यांत तपास पूर्ण करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे कॉलेजच्या कर्मचारी निवासस्थानांत विजयाच्या भाजून झालेल्या रहस्यमय मृत्यूला आता २५ वर्षांनी पुन्हा वाचा फुटणार आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या अमृतवाहिनी एज्युकेशन सोसायटीतर्फे हे कॉलेज चालविले जाते.संगमनेर येथील एक नागरिक हेमंत यशवंत ढगे यांनी केलेले अपील मंजूर करून न्या. एम.वाय. इक्बाल व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. इतकी वर्षे रेंगाळलेल्या या प्रकरणात पोलीस आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी याआधी केलेल्या चुका आता सुधाराव्यात. ढगे यांनी केलेल्या फौजदारी फिर्यादीवर पोलिसांनी आता गुन्हा नोंदवून सहा महिन्यांत तपास पूर्ण करावा व या तपासाचा अहवाल दंडाधिकाऱ्यांना सादर करावा; तसेच पोलिसांचा तपासी अहवाल आल्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी, याआधी वरिष्ठ न्यायालयांनी नोंदविलेल्या कोणत्याही मताने प्रभावित न होता, त्यावर कायद्यानुसार निर्णय करावा, असा आदेश खंडपीठाने दिला.ढगे यांच्या या फिर्यादीत संगमनेर येथील डॉ. सुधीर तांबे व इतरांना आरोपी करण्यात आले होते. दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना तपासाचा आदेश दिला होता. परंतु इतक्या वर्षांत औपचारिक गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. असे असले तरी आता गुन्हा नोंदवून तपास लवकरात लवकर पूर्ण केला जावा, यावर ढगे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी, डॉ. तांबे यांच्यासाठी ज्येष्ठ वकील पी. चिदंबरम आणि राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील या तिघांमध्येही एकमत झाले. ते लक्षात घेऊन खंडपीठाने वरील आदेश देताना असे नमूद केले की, गुन्हा नोंदला नव्हता म्हणून त्यामुळे आत्तापर्यंत केल्या गेलेल्या तपासाला कोणतीही बाधा येणार नाही.हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्याची ही दुसरी वेळ होती. ढगे यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने हा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन तो एस.एस. काळबांडे या उप अधीक्षक दर्जाच्या विशेष पोलीस अधिकाऱ्याकडे सोपविण्याचा आदेश दिला होता. त्याविरुद्ध डॉ. तांबे यांनी केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला होता. (विशेष प्रतिनिधी)नेमके काय घडले होते?विजया देशमुख आणि त्यांचे बंधू प्रतापराव देशमुख हे दोघेही अमृतवाहिनी कॉलेजात व्याख्याते होते व ते व्यवस्थापनाने दिलेल्या निवासस्थानात एकत्र राहात असत. २५ जानेवारी १९९१ रोजी या घरात विजया ८५ टक्के भाजली. सुरुवातीस तिला संगमनेर येथील डॉ. सुधीर भास्करराव तांबे यांच्या इस्पितळात व नंतर पुण्यात कसबा पेठेतील सूर्या इस्पितळात हलविले गेले. सुमारे तीन आठवड्यांच्या उपचारांनंतर १६ फेब्रुवारी १९९१ रोजी तिचे निधन झाले. संगमनेर पोलिसांनी त्या वेळी अपघाती मृत्यूची नोंद करून हे प्रकरण बंद केले होते.यानंतर तीन वर्षांनी जुलै ९४मध्ये दशरथ हासे व त्यानंतर १२ वर्षांनी आॅक्टोबर २००६मध्ये विजय ठाकूर यांनी या प्रकरणी दंडाधिकाऱ्यांकडे फौजदारी फिर्यादी दाखल केल्या होत्या. मात्र नंतर त्या मागे घेण्यात आल्या. त्यानंतर हेमंत ढगे यांनी तिसरी फिर्याद दाखल केली व तिचे कवित्व अद्याप सुरू आहे.