शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

गूढ मृत्यूला फुटली वाचा

By admin | Updated: February 13, 2016 23:47 IST

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक तरुण व्याख्याती विजया देशमुख हिच्या गूढ मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आता औपचारिक गुन्हा

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक तरुण व्याख्याती विजया देशमुख हिच्या गूढ मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आता औपचारिक गुन्हा नोंदवून येत्या सहा महिन्यांत तपास पूर्ण करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे कॉलेजच्या कर्मचारी निवासस्थानांत विजयाच्या भाजून झालेल्या रहस्यमय मृत्यूला आता २५ वर्षांनी पुन्हा वाचा फुटणार आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या अमृतवाहिनी एज्युकेशन सोसायटीतर्फे हे कॉलेज चालविले जाते.संगमनेर येथील एक नागरिक हेमंत यशवंत ढगे यांनी केलेले अपील मंजूर करून न्या. एम.वाय. इक्बाल व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. इतकी वर्षे रेंगाळलेल्या या प्रकरणात पोलीस आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी याआधी केलेल्या चुका आता सुधाराव्यात. ढगे यांनी केलेल्या फौजदारी फिर्यादीवर पोलिसांनी आता गुन्हा नोंदवून सहा महिन्यांत तपास पूर्ण करावा व या तपासाचा अहवाल दंडाधिकाऱ्यांना सादर करावा; तसेच पोलिसांचा तपासी अहवाल आल्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी, याआधी वरिष्ठ न्यायालयांनी नोंदविलेल्या कोणत्याही मताने प्रभावित न होता, त्यावर कायद्यानुसार निर्णय करावा, असा आदेश खंडपीठाने दिला.ढगे यांच्या या फिर्यादीत संगमनेर येथील डॉ. सुधीर तांबे व इतरांना आरोपी करण्यात आले होते. दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना तपासाचा आदेश दिला होता. परंतु इतक्या वर्षांत औपचारिक गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. असे असले तरी आता गुन्हा नोंदवून तपास लवकरात लवकर पूर्ण केला जावा, यावर ढगे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी, डॉ. तांबे यांच्यासाठी ज्येष्ठ वकील पी. चिदंबरम आणि राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील या तिघांमध्येही एकमत झाले. ते लक्षात घेऊन खंडपीठाने वरील आदेश देताना असे नमूद केले की, गुन्हा नोंदला नव्हता म्हणून त्यामुळे आत्तापर्यंत केल्या गेलेल्या तपासाला कोणतीही बाधा येणार नाही.हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्याची ही दुसरी वेळ होती. ढगे यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने हा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन तो एस.एस. काळबांडे या उप अधीक्षक दर्जाच्या विशेष पोलीस अधिकाऱ्याकडे सोपविण्याचा आदेश दिला होता. त्याविरुद्ध डॉ. तांबे यांनी केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला होता. (विशेष प्रतिनिधी)नेमके काय घडले होते?विजया देशमुख आणि त्यांचे बंधू प्रतापराव देशमुख हे दोघेही अमृतवाहिनी कॉलेजात व्याख्याते होते व ते व्यवस्थापनाने दिलेल्या निवासस्थानात एकत्र राहात असत. २५ जानेवारी १९९१ रोजी या घरात विजया ८५ टक्के भाजली. सुरुवातीस तिला संगमनेर येथील डॉ. सुधीर भास्करराव तांबे यांच्या इस्पितळात व नंतर पुण्यात कसबा पेठेतील सूर्या इस्पितळात हलविले गेले. सुमारे तीन आठवड्यांच्या उपचारांनंतर १६ फेब्रुवारी १९९१ रोजी तिचे निधन झाले. संगमनेर पोलिसांनी त्या वेळी अपघाती मृत्यूची नोंद करून हे प्रकरण बंद केले होते.यानंतर तीन वर्षांनी जुलै ९४मध्ये दशरथ हासे व त्यानंतर १२ वर्षांनी आॅक्टोबर २००६मध्ये विजय ठाकूर यांनी या प्रकरणी दंडाधिकाऱ्यांकडे फौजदारी फिर्यादी दाखल केल्या होत्या. मात्र नंतर त्या मागे घेण्यात आल्या. त्यानंतर हेमंत ढगे यांनी तिसरी फिर्याद दाखल केली व तिचे कवित्व अद्याप सुरू आहे.