शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

गैरव्यवहारांबाबत आरबीआय अनभिज्ञ !

By admin | Updated: January 17, 2017 06:18 IST

नेमकी किती व कशाप्रकारे अनियमितता, गैरव्यवहार झाला, याबाबत रिझर्व्ह बॅँकेकडे कसलीही ठोस माहिती उपलब्ध नाही.

मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्य व जिल्हा सहकारी बँकांना नोटा बदलण्याच्या व्यवहारावर बंदी घातली तरी त्या ठिकाणी नेमकी किती व कशाप्रकारे अनियमितता, गैरव्यवहार झाला, याबाबत रिझर्व्ह बॅँकेकडे कसलीही ठोस माहिती उपलब्ध नाही. त्याबाबत आपण अनभिज्ञ असल्याची कबुली दस्तुरखुद्द आरबीआयने माहिती अधिकार कायद्यान्वये केलेल्या अर्जाच्या उत्तरात दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उपलब्ध केलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे सहकारी बॅँकेतील गैरव्यवहाराबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसताना त्यावर केंद्र सरकारने निर्बंध का घातले, त्यामागचा नेमका हेतू काय होता, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या बंदीचा मोठा फटका शेतकरी व ग्रामीण भागातील व्यवहारावर झाला होता. गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला ५०० व एक हजार रुपये चलनाच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर १४ नोव्हेंबरला केंद्राने राज्य व जिल्हा सहकारी बॅँकेत जुन्या व नव्या नोटांची देवाण-घेवाण करण्यास बंदी घातली. या बँकांमध्ये ठरावीक लोकांना हव्या तितक्या प्रमाणात नवीन नोटा पुरविल्या जात असून नोटा बदलण्याच्या व्यवहारात मोठा गैरव्यवहार केला जात असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले होते. त्यामुळे गलगली यांनी ८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१६ या कालावधीत राज्य व जिल्हा सहकारी बँकेमध्ये नवीन नोटांच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारात अनियमितता, गैरव्यवहार झाला, त्याबाबत संबंधित बँकेवर कोणती कारवाई करण्यात आली, याची तपशीलवार माहिती विचारली होती. त्याबाबत आरबीआयने त्यांना राज्य व जिल्हा सहकारी बँकांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची माहिती उपलब्ध नाही. शहरी सहकारी बँकांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत अन्य विभागांकडून माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असे कळविले आहे. सहकारी बँकांवरील निर्बंधांमुळे शेतकरी, मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा फटका बसला आहे, त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. जर या बँकांतील गैरव्यवहाराबाबत काहीही माहिती नसताना हा निर्णय का घेण्यात आला, असा सवाल गलगली यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)नव्या नोटा पुरविल्या८ नोव्हेंबरला नोटांवर बंदी घातल्यानंतर १४ नोव्हेंबरला केंद्राने राज्य व जिल्हा सहकारी बँकांमध्ये ठरावीक लोकांना हव्या तितक्या प्रमाणात नवीन नोटा पुरविल्या जात असून नोटा बदलण्याच्या व्यवहारात मोठा गैरव्यवहार केला जात असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले होते.