शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

गैरव्यवहारांबाबत आरबीआय अनभिज्ञ !

By admin | Updated: January 17, 2017 06:18 IST

नेमकी किती व कशाप्रकारे अनियमितता, गैरव्यवहार झाला, याबाबत रिझर्व्ह बॅँकेकडे कसलीही ठोस माहिती उपलब्ध नाही.

मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्य व जिल्हा सहकारी बँकांना नोटा बदलण्याच्या व्यवहारावर बंदी घातली तरी त्या ठिकाणी नेमकी किती व कशाप्रकारे अनियमितता, गैरव्यवहार झाला, याबाबत रिझर्व्ह बॅँकेकडे कसलीही ठोस माहिती उपलब्ध नाही. त्याबाबत आपण अनभिज्ञ असल्याची कबुली दस्तुरखुद्द आरबीआयने माहिती अधिकार कायद्यान्वये केलेल्या अर्जाच्या उत्तरात दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उपलब्ध केलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे सहकारी बॅँकेतील गैरव्यवहाराबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसताना त्यावर केंद्र सरकारने निर्बंध का घातले, त्यामागचा नेमका हेतू काय होता, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या बंदीचा मोठा फटका शेतकरी व ग्रामीण भागातील व्यवहारावर झाला होता. गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला ५०० व एक हजार रुपये चलनाच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर १४ नोव्हेंबरला केंद्राने राज्य व जिल्हा सहकारी बॅँकेत जुन्या व नव्या नोटांची देवाण-घेवाण करण्यास बंदी घातली. या बँकांमध्ये ठरावीक लोकांना हव्या तितक्या प्रमाणात नवीन नोटा पुरविल्या जात असून नोटा बदलण्याच्या व्यवहारात मोठा गैरव्यवहार केला जात असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले होते. त्यामुळे गलगली यांनी ८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१६ या कालावधीत राज्य व जिल्हा सहकारी बँकेमध्ये नवीन नोटांच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारात अनियमितता, गैरव्यवहार झाला, त्याबाबत संबंधित बँकेवर कोणती कारवाई करण्यात आली, याची तपशीलवार माहिती विचारली होती. त्याबाबत आरबीआयने त्यांना राज्य व जिल्हा सहकारी बँकांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची माहिती उपलब्ध नाही. शहरी सहकारी बँकांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत अन्य विभागांकडून माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असे कळविले आहे. सहकारी बँकांवरील निर्बंधांमुळे शेतकरी, मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा फटका बसला आहे, त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. जर या बँकांतील गैरव्यवहाराबाबत काहीही माहिती नसताना हा निर्णय का घेण्यात आला, असा सवाल गलगली यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)नव्या नोटा पुरविल्या८ नोव्हेंबरला नोटांवर बंदी घातल्यानंतर १४ नोव्हेंबरला केंद्राने राज्य व जिल्हा सहकारी बँकांमध्ये ठरावीक लोकांना हव्या तितक्या प्रमाणात नवीन नोटा पुरविल्या जात असून नोटा बदलण्याच्या व्यवहारात मोठा गैरव्यवहार केला जात असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले होते.