शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी रत्नागिरीही खारीचा वाटा उचलणार

By admin | Updated: December 10, 2014 23:52 IST

राज्य शासनाच्या सहयोगाने जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी बियाणे पुरवण्यात येणार

रहिम दलाल - रत्नागिरी -समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील स्थिती समाधानकारक असताना आता जिल्ह्यातील शेतकरी विदर्भ, मराठवाड्याचे अश्रू पुसणार आहे. राज्य शासनाच्या सहयोगाने जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी बियाणे पुरवण्यात येणार असून त्याचा लाभ विदर्भ आणि मराठवाड्यातील भुकेने व्याकूळ जनावरांना होणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी जनावरांसाठी चारा उगवून ते दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी पुरवठा करणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात येणार आहे़ दुष्काळगस्त जिल्ह्यांना वैरण पुरवठा केल्यानंतर त्यातून स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल तर भुकेने व्याकूळ विदर्भ, मराठवाड्यातील जनावरांना चारा मिळेल. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडून वैरण बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे़ त्यासाठी पशुसंवर्धन विभाग जिल्हा वार्षिक योजनेकडे ७ लाख रुपयांची मागणी करणार आहे़ एक एकरच्या क्षेत्रात चारा उत्पादन घेण्यासाठी १०० टक्के अनुदानावर ६०० रुपयांच्या वैरणाच्या बियाणांचा किंवा ठोंब्याचा पुरवठा करण्यात येणार आहे़ दुष्काळग्रस्त गावांमधील पशुधनाला आवश्यक तो चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी वैरण बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून तसे परिपत्रक काढले आहे़ या शासन निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे़ त्यामुळे १०० टक्के अनुदानातून येथील शेतकरी जनावरांसाठी चाऱ्याचे उत्पादन करणार आहेत़जिल्ह्यात १०० टक्के अनुदानातून शेतकऱ्यांना बियाणे देण्यात येणार आहे़ त्यातून अतिरिक्त चारा उगवून टंचाईग्रस्त, दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने मागणी केल्यास चारा पुरवठा करण्यात येईल़-डॉ़ एस़ सी़ म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी चारा लागवडीने दुष्काळग्रस्त जिल्ह्याला पुरवठा करणार.जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार.जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन.स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तर विदर्भवासीयांना चारा.