शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी रत्नागिरीही खारीचा वाटा उचलणार

By admin | Updated: December 10, 2014 23:52 IST

राज्य शासनाच्या सहयोगाने जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी बियाणे पुरवण्यात येणार

रहिम दलाल - रत्नागिरी -समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील स्थिती समाधानकारक असताना आता जिल्ह्यातील शेतकरी विदर्भ, मराठवाड्याचे अश्रू पुसणार आहे. राज्य शासनाच्या सहयोगाने जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी बियाणे पुरवण्यात येणार असून त्याचा लाभ विदर्भ आणि मराठवाड्यातील भुकेने व्याकूळ जनावरांना होणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी जनावरांसाठी चारा उगवून ते दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी पुरवठा करणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात येणार आहे़ दुष्काळगस्त जिल्ह्यांना वैरण पुरवठा केल्यानंतर त्यातून स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल तर भुकेने व्याकूळ विदर्भ, मराठवाड्यातील जनावरांना चारा मिळेल. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडून वैरण बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे़ त्यासाठी पशुसंवर्धन विभाग जिल्हा वार्षिक योजनेकडे ७ लाख रुपयांची मागणी करणार आहे़ एक एकरच्या क्षेत्रात चारा उत्पादन घेण्यासाठी १०० टक्के अनुदानावर ६०० रुपयांच्या वैरणाच्या बियाणांचा किंवा ठोंब्याचा पुरवठा करण्यात येणार आहे़ दुष्काळग्रस्त गावांमधील पशुधनाला आवश्यक तो चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी वैरण बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून तसे परिपत्रक काढले आहे़ या शासन निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे़ त्यामुळे १०० टक्के अनुदानातून येथील शेतकरी जनावरांसाठी चाऱ्याचे उत्पादन करणार आहेत़जिल्ह्यात १०० टक्के अनुदानातून शेतकऱ्यांना बियाणे देण्यात येणार आहे़ त्यातून अतिरिक्त चारा उगवून टंचाईग्रस्त, दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने मागणी केल्यास चारा पुरवठा करण्यात येईल़-डॉ़ एस़ सी़ म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी चारा लागवडीने दुष्काळग्रस्त जिल्ह्याला पुरवठा करणार.जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार.जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन.स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तर विदर्भवासीयांना चारा.