शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्षांनी मिळाली शिधापत्रिका

By admin | Updated: November 28, 2015 00:10 IST

वासोटा किल्ल्याजवळचे कोकरे कुटुंब : बामणोलीतल्या शिबिराचा फायदा; जंगल तुडवत येऊन मानले आभार-गुड न्यूज

कुडाळ : कोयना खोऱ्यातील वासोटा किल्ल्याजवळ मालदेव गावचे कोयना धरणामुळे पुनर्वसन झाले आहे. मात्र आजही या अख्ख्या गावात शामराव कोकरे यांचे एकच कुटुंब येथे राहात आहे. ओस पडलेलं गाव तर भोवताली अभयारण्य वन्यप्राण्यामध्ये आजही हे कुटुंब येथेच राहून आपला उदरनिर्वाह करीत आहे. या गावची जावळी तालुक्यात शासन दफ्तरी नोंद असल्याने कोकरेंना शिधापत्रिका मिळत नव्हते. मात्र, सहा महिन्यांपूर्वी तहसीलदार रणजित देसाई यांनी बामणोलीत कॅम्प लावल्यामुळे व त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कोकरेंना साठ वर्षांनंतर शिधापत्रिका देण्यात आली. त्यामुळे कोकरे कुटुंबीय भारावून गेले.मालदेव गावाचे पुनर्वसन घेऊनही कोकरेंनी मात्र गाव सोडलेच नाही. ८५ वर्षीय शामराव कोकरे आपल्या पत्नीसमवेत गावात एकटेच राहतात. तर मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतात. अत्यंत कष्टमय जीवन जगताना किमान शासनाच्या योजनांचा लाभ तरी मिळावा, यासाठी कोकरे मेढ्याला पायी खेटे मारत होते. आजही वासोटाजवळ असलेल्या मालदेव गावातून ते पायी तीन दिवसांचा प्रवास करून मेढ्याला यायचे; मात्र शासनदफ्तरी या गावची नोंदच नसल्यामुळे त्यांना साधी शिधापत्रिकादेखील मिळत नव्हती.बामणोली येथे तहसीलदार देसाई यांनी कॅम्प लावला, त्यावेळी त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. तत्काळ त्यांनी आपल्या विशेष अधिकारातून तहसील कार्यालयाच्या रेकॉर्डरुममधून किमान आवश्यक पुरावे, अवश्यक कागदपत्रे काढून कोकरेंना प्रथम पिवळे शिधापत्रिका दिली. तर इतर नोंदीदेखील सापडल्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांना जातप्रमाणपत्र मिळण्यास यापुढे कोणतीच अडचणदेखील भासणार नाही. गावावरचे प्रचंड प्रेम आणि मातीशी असणारे मायेचे नाते म्हणून पुर्नवसन झाले असले तरीही कोकरे मायभूमीची सेवा करत राहिले. अजुनही त्यांना शहरीकरणाचा स्पर्श झालेला नाही.महाराजास्व अभियानांतर्गत तहसीलदार देसाई यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे साठ वर्षांनंतर या कोकरे कुटुंबाला शिधापत्रिका मिळाली. (प्रतिनिधी)रेशनचे धान्य पाहून डोळ्यात आले पाणीआजही ग्रामीण, दुर्गम भागात रेशनचे धान्य म्हणजे लोकांना आपल्या कुटुंबाचा आधार वाटतो. कोकरेंना शिधापत्रिका मिळाल्यानंतर दिवाळीपूर्वी नोव्हेंबर महिन्यात पावशेवाडी येथील दुकानातून दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ मिळाले. हे धान्य पाहून कोकरे यांनी कोयना खोऱ्यातून दोन दिवस चालत येऊन तहसीलदार देसाई यांचे आभारमानले. वासोटा परिसरात असलेला मालदेव गावच्या धरणामुळे पुनर्वसन झाले आहे. त्यामुळे येथील व्यवस्थाच रद्द करण्यात आले होती; परंतु केवळ येथील रहिवासी मानून कोकरेंना शिधापत्रिका दिली आहे. यापुढे त्यांचे जातीचे दाखले व इतर प्रश्न मार्गी लागण्यास त्यांना मदत होईल. तशा त्यांच्या जुन्या नोंदीदेखील तहसील रेकॉर्डरुममध्ये आढळल्या आहेत.-रणजित देसाई, तहसीलदार जावळीशिधापत्रिका मिळवून देण्यासाठी तहसीलदारांनी फार मोठी मदत केली. तर शासनाच्या योजनेत सहभागी होऊन रेशनच्या माध्यमातून जे धान्य मिळत आहे. या धान्याचा मोठा आधार वाटू लागला आहे. - शामराव कोकरे, ग्रामस्थ मालदेव