शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

दुर्मीळ हरणांना हक्काचे घर !

By admin | Updated: August 3, 2016 02:21 IST

ठाणे जिल्ह्यातील नेचर पार्क आॅफ तानसा येथील अरण्यात आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात हलविण्यात येणार आहेत.

मधुकर ठाकूर,

उरण- उरण नौदलाच्या अनधिकृत डिअरपार्क मध्ये मृत्यूच्या कचाट्यात सापडली ६१ चितळ जातीची दुर्मिळ हरणे आता सुरक्षिततेसाठी ठाणे जिल्ह्यातील नेचर पार्क आॅफ तानसा येथील अरण्यात आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात हलविण्यात येणार आहेत. सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्यांना हरणांना हक्काचे घर मिळणार आहेच. २३ वर्षांपासून कोंडलेल्या हरणांना आता मोकळा श्वास घेता येणार असल्याने नौदल अधिकाऱ्यांसह वनविभागाचे अधिकारीऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहेत. उरण येथील नौदल अधिकाऱ्यांनी २३ वर्षापूर्वी विरंगुळा म्हणून दुर्मिळ चितळ जातीच्या तीन हरणांच्या जोड्या राणीच्या बागेतून येथील डिअरपार्कमध्ये पाळण्यास आणल्या होत्या. हरणांना चारा पाणी देण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी एका मनुष्य बळाचीही तजवीज नौदल अधिकाऱ्यांनी केली होती. मागील २३ वर्षात तीन जोड्या हरणांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हरणांची संख्या या घडीला ६१ पर्यंत पोहचली आहे. हरणांची संख्या वाढल्याने त्यांना स्वैरविहार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. तसेच त्यांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. नौदलाकडे हरणांच्या देखभालीसाठी मनुष्यबळ वाढविण्यासाठी आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे हरणांच्या देखभालीकडे नौदलाचे अक्षम्य दुर्लक्षच होत आहे. नौदलाचा हा दुर्लक्षपणा हरणांच्या जीवावर बेतू लागला होता. काही दिवसांपूर्वी नौदलाच्या डिअरपार्क मधून बाहेर पडून केगाव नागरी वस्तीत शिरलेल्या दोन हरणे नाहक मृत्युमुखी पडली होती. तर एक हरिण मागील महिन्यात मृत पावला होता. हरणांच्या मृत्युमुळे व्यथित झालेले प्राणी मित्र, निसर्गप्रेमी नागरिकांनी नौदल आणि वनविभागालाच दोषी ठरविले होते. त्यामुळे अनधिकृत डिअरपार्क मधील दुर्मिळ हरणांचे संरक्षण, देखभाल शक्य होत नसल्याची कबुली देत नौदलाचे तत्कालीन लेफ्ट. कमांडर के. आर. खिल्लारे यांनी वनखात्याला पत्र लिहून दुर्मिळ हरणे सुरक्षित स्थळी हलविण्याची विनंतीही केली होती. वन विभागानेही हरणांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. तसेच हरणांच्या सुरक्षितेचा प्रश्न आमदारांनी विधानसभेत सभागृहात उठविला होता. विधानसभेतही हरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर वनअधिकाऱ्यांनी दुर्मिळ चितळ जातीची हरणे संचालक मुंबईच्या वीरमाता जिजाबाई उद्यान आणि बोरीवलीच्या नॅशनल पार्कमध्ये हलविण्याबाबत संबंधितांकडे विचारणा केली होती. >विधानसभेत हरणांचा सुरक्षेचा प्रश्ननौदलानेच डिअरपार्कमधील ६१ हरणे सुरक्षित नसल्याचे सांगत त्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षित जागी हलविण्याची मागणी वन विभागाकडे केल्यानंतर स्थानिक वन अधिकारी सुरेंद्र काळे यांनी हरणांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याने तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा अभिप्राय वरिष्ठांकडे सादर केला होता. विधानसभेतही हरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यातील नेचर पार्क आॅफ तानसा येथील अरण्यात हलविण्यात येणार आहे. २३ वर्षांपासून कोंडलेल्या हरणांना आता मोकळा श्वास घेता येणार असल्याने नौदल अधिकाऱ्यांसह वनविभागाचे अधिकारीऱ्यांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.>आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दुर्मिळ हरणांना ठाणे जिल्ह्यातील नेचर पार्क आॅफ तानसा येथील अरण्यात हलविण्यात येणार आहेत. याप्रकरणी ठाणे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी एम. एम. कुलकर्णी यांच्याशी पत्रव्यवहार झाला आहे. - डी. बी. गायकवाड, वनसंरक्षक अधिकारी