शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

आमदार नितेश राणेंविरुद्ध खंडणीचा गुन्हा

By admin | Updated: May 20, 2017 03:39 IST

सांताक्रूझ पोलिसांनी आमदार नितेश राणेंसह तिघांविरुद्ध शुक्रवारी पहाटे खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. जुहू येथील हॉटेल एस्टेलामध्ये भागीदारीसाठी नितेश राणे

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सांताक्रूझ पोलिसांनी आमदार नितेश राणेंसह तिघांविरुद्ध शुक्रवारी पहाटे खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. जुहू येथील हॉटेल एस्टेलामध्ये भागीदारीसाठी नितेश राणे यांनी धमकावून महिन्याला १० लाख रुपयांची मागणी करत, हॉटेलमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.जुहू रोड परिसरात आॅक्टोबर २०१६ पासून निखिल मिराणी आणि हितेश केसवानी यांनी एस्टेला हॉटेल सुरू केले. त्यानंतर नितेश राणे यांनी त्या दोघांसमोर हॉटेलमध्ये भागीदारीचा प्रस्ताव ठेवला. मात्र, हॉटेल सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याने दोघांनीही हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून राणे त्यांच्याकडे भागीदारीसाठी मागे लागले होते.गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नितेश राणे यांनी त्यांना पुन्हा भागीदारीसाठी विचारले. मात्र, दोघांनीही नकार दिल्यावर राणेंनी त्यांना हॉटेल बंद करण्याची धमकी दिली, असा त्यांना पुन्हा भागीदारीसाठी विचारले. मात्र, दोघांनीही नकार दिला. तेव्हा राणेंनी त्यांना हॉटेल बंद करण्याची धमकी दिल्याचा आरोप हितेश केसवानी यांनी केला आहे. त्याच दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास दोघे जण हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी हॉटेलमध्ये असलेल्या जवळपास ६० ग्राहकांना धक्काबुकी करत बाहेर काढण्यास सुरुवात केली. राजकीय नेत्याच्या नावाने दोघे जण हॉटेलमध्ये तोडफोड करत असल्याची माहिती मिळताच, केसवानी, मिराणी यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. केसवानी यांच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिसांनी नितेश राणेंसह शेख आणि अन्सारीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नितेश राणेंनाही लवकरच या प्रकरणात अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रवक्त्या रश्मी करंदीकर यांनी दिली. पराग संघवींनाही भागीदारी दिल्याचा आरोपकेसवानींच्या आरोपानुसार, नोव्हेंबर २०१६ मध्ये सांताक्रुझमध्ये झालेल्या बैठकीत राणेंनी पी. बी. रिअ‍ॅल्टीचे पराग संघवी यांनाही या हॉटेलमध्ये ५० टक्के भागीदारी देण्यास सांगितले. नकार देताच धमकावून करारनाम्यावर जबरदस्तीने सह्या घेतल्या. दोघांनीही एकाही पैशांची गुंतवणूक न करता, करारनाम्यांवर सही करून घेतल्याचा आरोप केसवानी यांनी केला आहे. त्यानंतर, कामादरम्यान संघवी यांनी दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, व्यवसायात तोटा आल्यामुळे ते पैसे परत मागत असल्याचे जबाबात नमूद केले आहे.भागीदारीसाठी अशीही खटपट (जबाबात दिलेल्या माहितीनुसार)मे २०१६ - हॉटेलचे काम सुरू केलेआॅक्टोबर २०१६ - हॉटेलमध्ये भागीदारीसाठी प्रस्ताव(१० दिवसांत वरळी, सांताक्रुझ, नरिमन पॉइंट येथील नामांकित हॉटेलमध्ये राणेंसोबत तीन ते चार बैठका झाल्या. )नोव्हेंबर २०१६ - करारनाम्यावर जबरदस्तीने सह्याडिसेंबर २०१६ - धमकावणेमे २०१७ - हॉटेल खाली करण्यासाठी घुसखोरी