शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

भातआवणीच्या कामं जोरात

By admin | Updated: July 20, 2016 00:59 IST

भातआवणीची पारंपरिक गाणी गुणगुणत आदिवासी शेतकरी भातआवणीच्या कामात गुंतले आहेत.

चटक चांदण्यांचा, पलंग काय हाकला अंगणातइथं नाही करमत, चला जाऊ लाल बागेतलाल बागेची, हवा गं लय न्यारी,फुलाचा येत वास सुंदरी, मांडवर बस,तुला ग बंगला बांधून देतो,आता घेतल्या भाताच्या पाट्या,घेतल्या मोत्याच्या चुंभळा,पहिल्या वनाला लागले पाहिजे बार्ईजी,आपण मागून गौराईला जाऊ जी...

भीमाशंकर : भातआवणीची पारंपरिक गाणी गुणगुणत आदिवासी शेतकरी भातआवणीच्या कामात गुंतले आहेत. पश्चिम आदिवासी भागात मुसळधार पावसामुळे भातखाचरे पाण्याने भरली आहेत. भातरोपेही तरारून आली असून, वाऱ्यावर सळसळ करीत आहेत. सध्या भातआवणीला पोषक वातावरण आहे.आंबेगाव तालुक्यात सुमारे ४,८०० हेक्टर भातक्षेत्र असून, त्यापैकी ४० टक्के आवण्या पूर्ण झाल्या आहेत. या भागात जिर, रायभोग, इंद्रायणी, तांबडा रायभोग, आंबेमोहोर, साळ, कोळंबा, नानपुडा, झिनी, खडक्या, ढवळाभात, कुसळ्या या जातीचे भात घेतले जातात. भात आवणीदरम्यान पाऊस पडत असल्यामुळे रोगाचे प्रमाणही कमी राहणार आहे. भाताबरोबर आदिवासी भागात पावसाळ्यात नाचणी, वरई, सावा, तूर, वाटाणा इत्यादी कडधान्यांची शेती केली जाते. यांचीही लागवड डोंगरउतारावर जोरात सुरू आहे. मात्र, गेल्या आठवड्यातील पावसामुळे काही ठिकाणी भातरोपे सडलेली दिसून आली आहेत.(वार्ताहर)